शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणी वेगळं वळण; हृदयविकारानं मृत्यू नाही, तर...
2
‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक देवाण-घेवाण करू नका!
4
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
5
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
6
पुतिन यांना सिक्रेट गर्लफ्रेंडपासून दोन मुलं ! गर्लफ्रेंड एलिना कबेवा आंतरराष्ट्रीय दर्जाची रिदमिक जिम्नॅस्ट
7
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
8
श्रीमंतांचा मोठा दबदबा, ५ वर्षांत विक्रमी कमाई; वर्षाला १० कोटी कमावणाऱ्यांची संख्या ३१,८०० वर
9
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
10
कामात समाधान नसल्यास दोन वर्षांत सोडणार नोकरी; ४७% तरुण नोकरी सोडण्याच्या तयारीत
11
गडकरी दिल्लीत सगळ्यांना आवडतात; ते का?
12
आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला
13
आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय; ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेला सुरुवात
14
महामुंबईत गणरायाला भावपूर्ण निरोप, पुढच्या वर्षी लवकर येण्याची भक्तांची गळ
15
मुंबई विमानतळावर एक कोटीचे सोने जप्त; पाच विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
16
मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’वर वाटमारी, पाच अटकेत; तीन फरार; पनवेल पोलिसांची कारवाई
17
नवी मुंबईतील १२ हजार कोटींच्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन, उद्योजकांना त्रास दिल्यास तुरुंगात टाकू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
18
रेल्वे अधिकाऱ्याची नऊ लाखांची फसवणूक; गैरव्यवहारात अटक करण्याची भीती दाखवून फसवले
19
शासकीय रुग्णालयांत आता सौर ऊर्जेचा उजेड; वैद्यकीय शिक्षण विभागाची मंजुरी
20
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!

"अंडरवेअरचं रिटर्न गिफ्ट मीही देऊ शकतो"; राज ठाकरेंचा सरकारला थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2023 11:13 PM

मुंबई-गोवा महामार्गाचं रखडलेलं काम आणि रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे राजकारण पेटलं आहे

मुंबई/रायगड - मनसेप्रमुख राज ठाकरे आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेने महामार्गाच्या प्रश्नावरून आज जागर यात्रा काढली. या यात्रेनंतर कोकणवासीयांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून राज्यकर्त्यांवर घणाघाती टीका केली आहे. कोकणातील जनतेलाही महत्त्वाचं आवाहन केलं आहे. यावेळी, आंदोलक मनसैनिकांना पोलिसांनी अंडरवेअरवर बसवल्याबद्दल संताप व्यक्त केला. तसेच, मी रिटर्न गिफ्ट देऊ शकतो, असे म्हणत राज यांनी थेट इशाराही दिला.

मुंबई-गोवा महामार्गाचं रखडलेलं काम आणि रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे राजकारण पेटलं आहे. राज ठाकरेंनी जागर यात्रेनंतर कोकणवासीयांना संबोधित करताना म्हटले की, सरकारला जाग यावी म्हणून ही पदयात्रा काढली आहे.  खरंतर मी पण पदयात्रेत सहभागी झालो असतो, पण काही महिन्यांपूर्वी माझं ऑपरेशन झालं त्यामुळे इतकं चालण्याची मला अजून परवानगी नाही. पदयात्रा हा तसा सभ्या मार्ग असतो. आपल्या पक्षाचा मार्ग आहे तो म्हणजे पहिल्यांदा हात जोडून आणि नंतर हात सोडून सांगायचं आहेच, असे म्हणत राज यांनी सरकारला थेट इशारा दिला. यावेळी, मुंबई-गोवा रस्त्यावरुन आंदोलन करणाऱ्या मनसैनिकांना पोलिसांनी अंडरवेअरवर बसवल्याचा संताप व्यक्त केला.

''परवा माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आंदोलन केलं तर माझ्या महाराष्ट्र सैनिकांना, पोलीस स्टेशनमध्ये सरकारने अंडरवेअरवर बसवलं, ह्या सरकारला मला एकच सांगायचं आहे ते मग आधीचं असो की आत्ताच, सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणी आलेला नसतो, अंडरवेअरची रिटर्न गिफ्ट मी पण देऊ शकतो'', अशा शब्दात राज यांनी सरकारला इशाराच दिला आहे. 

कोकणी बांधव शांत कसा राहू शकतो?

गेली १७ वर्ष हा मुंबई-गोवा महामार्ग रखडला आहे. ह्या काळात ह्या रस्त्यावर २५०० माणसं गेली, गाड्यांचं किती नुकसान झालं असेल त्याची मोजदादच नाही. दरवेळेला खड्डे भरून सगळ्या सरकारांनी वेळ मारून नेली आहे. इथे येताना तर मी एक अजबच प्रकार पाहिला तो म्हणजे ह्या महामार्गावर मध्येच पेव्हरब्लॉक टाकलेत. अहो जगात सर्वत्र रस्ते सिमेंट काँक्रीटचे असतात आणि फुटपाथ पेव्हरब्लॉकचे. इथे सगळं उलटंच. आणि असं तुमच्या आयुष्याशी खेळून पण कोकणी बांधवाला काही वाटत नाही, तो शांत कसा राहू शकतो ? त्याच त्याच लोकांना कसं निवडून देऊ शकतो हे मला कळत नाही. 

दबाव आणला तरी जमिनी विकू नका

राज्यातील एक महामार्ग १७ वर्ष का रखडतो? ह्या मागे मला एक षडयंत्र जाणवतंय. आज कोकणातील बांधवांच्या जमिनी स्वस्तात विकत घ्यायच्या आणि पुढे रस्ता चांगला झाला की अव्वाच्या सव्वा भावाने व्यापाऱ्यांना विकायच्या. आणि हे आपलीच लोकं करत आहे. कुंपणच शेत खात असेल तर करायचं काय ? माझी कोकणातील बांधवांना हात जोडून विनंती आहे की जमिनी विकू नका. कितीही आमिषं दाखवली, कितीही दबाव आणला तरी विकू नका. बाकी ह्या व्यापाऱ्यांचे काय करायचं ते आम्ही बघून घेतो. तुम्ही जमीन सोडू नका म्हणजे झालं, असं आवाहनही राज यांनी कोकणवासीयांना केलंय.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेMumbaiमुंबईhighwayमहामार्ग