शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

इर्शाळवाडी दुर्घटना: आतापर्यंत काय काय घडलं, जिल्हा प्रशासनाने दिली सविस्तर माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 15:58 IST

Raigad Irshalwadi Landslide Incident: रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात इर्शाळगडाच्या खाली असलेल्या इर्शालवाडी येथे बुधवार १९ जुलै रोजी डोंगराचा काही भाग कोसळून  मोठी दुर्घटना झाली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला आहे

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात इर्शाळगडाच्या खाली असलेल्या इर्शालवाडी येथे बुधवार १९ जुलै रोजी डोंगराचा काही भाग कोसळून  मोठी दुर्घटना झाली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८१ जण बेपत्ता आहेत. या दुर्घटनेनंत घटनास्थळावर आतापर्यंत काय काय घडलं, याचा आज दुपारी १२.३० वाजेपर्यंतचा अहवाल रायगड जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध केला आहे. त्यात दिलेली माहिती पुढील प्रमाणे.

दिनांक १९ जुलै २०२३ रोजी रात्री मौजे चौक मानिवली ता. खालापूर या महसूली गावाच्या हद्दीतील इरशालवाडी या ठिकाणी दरड कोसळल्याने आदिवासीवाडीतील घरे मातीच्या ढिगा-याखाली गेल्याची प्राथमिक माहिती रात्री ११.३५ वाजताच्या सुमारास जिल्हा नियंत्रण कक्षास प्राप्त झाली. प्रशासकीय यंत्रणेमार्फत सर्व बचाव पथकांना तात्काळ पाचारण करण्यात आले. परंतु दुर्गम भाग व मुसळधार पाऊस यामुळे बचावपथक घटनास्थळी रात्री १२.४० वा. पोहचले व बचाव कार्यास सुरवात केली. सलग चौथ्या दिवसी आज सकाळी ७.०० वाजल्यापासून शोध व बचाव कार्याची सुरवात झाली.

इरसालवाडी हे ठिकाण भारतीय भूवैज्ञानिक सव्हेक्षण (GSI) विभागाच्या अहवालानुसार संभाव्य दरडग्रस्त ठिकाणाच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेले नाही. खालापूर तालुक्यामध्ये दि. १७/०७/२०२३ ते दि.१९/०७/२०२३ या ३ दिवसामध्ये एकूण ४९९ मिमि पावसाची नोंद झालेली आहे.

त्यानंतर चौक महसूली मंडळातील पावसाची नोंद दि. २०/०७/२०२३-२२४.८ मि.मि. दि. २१/०७/२०२३ - सदर ठिकाण हे अत्यंत दुर्गम भागात स्थित असून, सदर ठिकाणी वाहने जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसून, मौजे चौक मानिवली या गावातून पायी चालत जावे जागते. सद्यस्थितीत घटनास्थळाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी तसेच अद्यापही काही प्रमाणात भूस्खलन होत असल्याने बचाव कार्यात अडथळा निर्माण होत आहे. तथापि NDRF पथकाच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने बचावकार्य अविरहीतपणे सुरु आहे. 

- आज रोजी बचाव पथकात NDRF पथकासह विविध संस्था व स्वंयसेवक, आपदामित्र इ. सहभागी झालेल्याची एकुण संख्या - १९७५- वाडीचे नांव इरशालवाडी- कुटुंबसंख्या - ४३- लोकसंख्या २२९ (मयत- २५, हयात १२४, बेपत्ता ( अंदाजे ८०) - मयत व्यक्ती २४ • जखमी २१ (उपचार करुन सोडलेले- ११ + उपचार घेत असलेले १० )

- उपचार घेत असलेले १० (ग्रामीण रुग्णालय चौक -५ + MGM रुग्णालय नवी मुंबई ४ + पनवेल SDH-१) हयात व्यक्ती १२४ ( निवारा केंद्र- पंचायतन मंदिर नढाळ ६५, आश्रमशाळेमधील विद्यार्थी ३३, उपचार घेत असलेले- १०, नातेवाईकांकडे गेलेले १६ )- बेपत्ता व्यक्ती ८१ अंदाजित- मृत जनावरे दुधाळ जनावरे ( गाय- १ म्हैस - ० ) .- लहान जनावरे ( बकरी० शेळी २ मेंढी ० ) - • वैद्यकिय सुविधा बेस कॅम्प मानिवली- तात्पुरते पुनर्वसन आपादग्रस्त कुंटुंबाच्या तात्पुरत्या निवासासाठी सूर्या हॉटेल समोर चौक येथे ३४ पोर्टेबल कंटेनर उपलब्ध करुन दिले असून सदर ठिकाणी विज, पाणी, टॉयलेट इत्यादी मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत.

- मा. मुख्यमंत्री, मा. पालकमंत्री, मा. विरोधी पक्ष नेते, इतर सन्मानीय मंत्री, मा. खासदार मा. आमदार व इतर लोकप्रतिनिधी यांनी सदर घटनास्थळी भेट देवून जखमी व वाचवलेल्या व्यक्तींचे तसेच शोध व बचावकार्य करणाऱ्या जवान व स्वयंसेवकांचे भेट देवून मनोधैर्य वाढवले, अशी माहिती संदेश शिर्के, निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी रायगड-अलिबाग यांनी दिली. 

टॅग्स :Raigad Irshalwadi Landslide Incidentरायगड इर्शाळवाडी दुर्घटना प्रकरणRaigadरायगड