शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

जोरदार बरसणार; दोन दिवसांचा यलो अलर्ट!

By निखिल म्हात्रे | Updated: June 20, 2024 21:24 IST

लोकमत न्युज नेटवर्क अलिबाग - सध्या जिल्ह्यात काही भागात सकाळ पासूनच पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी ये-जा करीत ...

लोकमत न्युज नेटवर्कअलिबाग - सध्या जिल्ह्यात काही भागात सकाळ पासूनच पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी ये-जा करीत रिमझीम पाऊस पडत आहे. मागील पाच दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळे भात पेरणीच्या कामांना वेग आला आहे. तर कोळी बांधवांनी जाळी विनण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. जिल्ह्यात दोन दिवसाचा यलो अर्लट असून पुढचा एक दिवस ग्रीन अर्लट आहे.

मागील काही दिवस ऊन पाऊस पडत होता, त्यामुळे जिल्ह्यातील बळीराजा हवालदिल झाला होता. मात्र मागील पाच दिवसापासून पाऊस चांगलाच बरसल्याने सध्या शेतीच्या कामांना वेग आला आहे.

तर काहीनी भात पेरणी केल्यावर काहींनी भात रोपाला पाणी देऊन भाताच्या रोपटे वाढविले होते. काही ठिकाणी भात पेरलेल्या ठिकाणची बेननी काढण्याच्या कामांनाही वेग आला आहे. अलिबाग, महाड, पोलादपूर, नागोठणे, खोपोली, पेण या भागांत सतत पावसाच्या सरी कोसळत होत्या. पावसाच्या आगमनामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.

भात पेरणीसाठी ज्या पावसाची अपेक्षा बळीराजाला होती. तसा पाऊस मात्र पडत नव्हता. पण, मागील पाच दिवसापासून जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. त्यामुळे बळीराजाला ज्या दमदार पावसाची अपेक्षा होती. तो, पाऊस गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात चांगलाच बरसत आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला असून, आता भात लावणीच्या कामांना वेग आला आहे. 

टॅग्स :Rainपाऊस