शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

किल्ले रायगड परिसरातील उत्खनन कोणाच्या आशीर्वादाने? जैवविविधता, नैसर्गिक साधनसंपत्तीला धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 07:03 IST

सिकंदर अनवारे  लोकमत न्यूज नेटवर्क  महाड : ऐतिहासिक किल्ले रायगड परिसरामध्ये काही विकासकांकडून जमीन सपाटीकरण, उत्खननाची कामे मोठ्या प्रमाणात ...

सिकंदर अनवारे लोकमत न्यूज नेटवर्क महाड : ऐतिहासिक किल्ले रायगड परिसरामध्ये काही विकासकांकडून जमीन सपाटीकरण, उत्खननाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. यामुळे या परिसरातील जैवविविधता, ऐतिहासिक वास्तू नष्ट होण्याचा धोका आहे. यामुळे कामे कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

  मध्यंतरीच्या रायगड प्राधिकरण या स्वतंत्र विभागाची स्थापना होऊन येथे सरकारने कोट्यवधी खर्च केले आहेत. याद्वारे शिवकाळात ज्या पद्धतीने वास्तू उभ्या होत्या तशा ऐतिहासिक वास्तू उभ्या करण्याचा प्रयत्न होता.  परंतु आता येथे पर्यटक, शिवभक्तांसाठी लागणाऱ्या सोयी-सुविधा तयार करणे, पाणी योजना राबविणे आदी कामांवर भर देण्यात आला आहे.  मात्र स्थानिकांसह अन्य काही व्यावसायिकांनी येथे टोलेजंग इमारती बांधण्यासाठी, हॉटेल व्यवसाय उभे करण्यासाठी जमिनीचे सपाटीकरण सुरू केले आहे. यामुळे हिरकणी वाडीसह अन्य गावांना भूस्खलन होण्याचा धोका निर्माण झाला आहे. रायगड परिसरातील नेवाली, हिरकणी वाडी परिसरात तडे जाण्याचे प्रकार घडले आहेत. त्यानुसार भूगर्भशास्त्र विभागाने काही उपाय सुचवले होते, अशी माहिती पाचाडचे माजी सरपंच रघुवीर देशमुख यांनी दिली. 

...तरीही उत्खनन का? किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी वाडीमध्ये काही वर्षांपूर्वी जमिनीला भेगा गेल्या होत्या. रस्ता खचला होता. सातत्याने या ठिकाणी महसूल प्रशासन लक्ष देऊन आहे. भूगर्भशास्त्र विभागाने याची पाहणी केल्यानंतर हा भाग धोकादायक असल्याचे सांगितले. 

रायगड परिसरातील अनधिकृत बांधकामांना नोटिसा आणि  उत्खननांवर कारवाई करण्यात येईल. रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी प्रशासन महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.डॉ. ज्ञानोबा बानापुरे, उपविभागीय अधिकारी, महाड 

किल्ले रायगड परिसरातील १००, २०० आणि ५०० मीटरपर्यंतचा भाग संरक्षित भाग आहे. किल्ला, परिसराला हानिकारक असे उत्खनन होत असेल ते थांबविणे हे काम पुरातत्त्व संशोधन विभागाचे आहे. वरुण भामरे, वास्तुसंवर्धक, रायगड प्राधिकरण

रायगड किल्ला आणि परिसराचा विकास होत आहे, ही आनंदाची बाब आहे. मात्र निसर्गसौंदर्याला बाधा होऊ न देता विकास झाला तर उत्तम. मात्र उत्खनन, टोलेजंग इमारती होत असतील तर ऐतिहासिक महत्त्व कसे राहील? असा प्रश्न आहे.अंजय धनावडे, इतिहास अभ्यासक

टॅग्स :Raigadरायगड