शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

पर्यावरण संवर्धनात खारीचा वाटा.., एक हजार कागदी पिशव्या करून केले वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2018 9:17 PM

प्लॅस्टिक कॅरी बॅग बंदी ही आपल्याच भविष्यासाठी अत्यावश्यक आहे आणि त्यासाठी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने आपण आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे, या भावनेतून शाळेतील शिक्षक आणि पालक यांनी सुचवलेल्या कल्पनेची अंमलबजावणी शाळेची परीक्षा संपल्यावर सुट्टीची सदुपयोग करून इयत्ता सातवीमधील सात विद्यार्थिनींनी कागदी पिशव्या तयार करून केली आहे.

- जयंत धुळपअलिबाग- प्लॅस्टिक कॅरी बॅग बंदी ही आपल्याच भविष्यासाठी अत्यावश्यक आहे आणि त्यासाठी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने आपण आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे, या भावनेतून शाळेतील शिक्षक आणि पालक यांनी सुचवलेल्या कल्पनेची अंमलबजावणी शाळेची परीक्षा संपल्यावर सुट्टीची सदुपयोग करून इयत्ता सातवीमधील सात विद्यार्थिनींनी कागदी पिशव्या तयार करून केली आहे. केवळ पिशव्या तयार केल्या नाहीत तर अलिबाग शहरातील भाजी विक्रेत्या आणि मेडिकल शॉप्स मध्ये ४० पिशव्याचा एक गठ्ठा प्रत्यक्ष जाऊन त्यांना सुपूर्त करून या मुलींनी या सर्वाना अंतर्मुख होण्यास भाग पाडले आहे.येथील चिंतामणराव केळकर विद्यालयाच्या इयत्ता सातवीची परीक्षा दिलेल्या या सात विद्यार्थिनींमध्ये मृणालिनी चंद्रशेखर-कीर्ती साठ्ये, मृण्मयी मंगेश-मृदुला टिबे, प्रीती प्रभू-शकुन मेहता, आसावरी प्रल्हाद-प्रणिता म्हात्रे, श्रावणी राकेश-यशवंती सरतांडेल, तन्वी रुपेश-ऋजुता पाटील आणि पर्णवी दिनेश-दर्शना पाटील यांचा समावेश आहे.आमच्या आयुष्यात आम्हाला प्रदूषणमुक्त पर्यावरण हवे आहे, ते निर्माण करण्याची जबाबदारी आमचीच आहे आणि म्हणूनच आम्ही हा उपक्रम करित आहोत, असा सुप्त संदेश देणा-या या सातही विद्यार्थिनी आपला हा उपक्रम पुढेही सुरू ठेवणार आहेत. रविवारी अलिबाग बाजारपेठेत त्यांनी तयार केलेल्या पिशव्याचे वाटप केले, त्यावेळी नागरिकांनी त्यांचे आवर्जून कौतुक केले.

टॅग्स :Raigadरायगड