शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

रायगडमध्ये युतीला आघाडीचे तगडे आव्हान; भवितव्यासाठी १६ जण रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 05:29 IST

शेतकरी कामगार पक्षाने युतीऐवजी आघाडीला पाठींबा देण्याची भूमिका घेतल्याने यंदाच्या रायगडमधील लढतीचे चित्र बदलले आहे.

अलिबाग : शेतकरी कामगार पक्षाने युतीऐवजी आघाडीला पाठींबा देण्याची भूमिका घेतल्याने यंदाच्या रायगडमधील लढतीचे चित्र बदलले आहे. प्रचाराची रणधुमाळी संपेपर्यंत आरोप-प्रत्यारोपांची राळ उडाल्याने युतीतर्फे लढत देणारे शिवसेनेचे अनंत गीते आणि आघाडीतर्फे रिंगणात असलेले राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्यातील लढत यावेळी प्रचंड चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.युती-आघाडीतील मातब्बर नेत्यांच्या प्रचारसभांनी गजबजलेल्या रायगड लोकसभा मतदारसंघातील प्रचार रविवारी थंडावला. मंगळवारी, २३ ला येथे मतदान पार पडेल. त्यामुळे रायगडचा ‘राजा’ कोण? याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्याने, गेले २० दिवस रायगड मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते. आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे आणि युतीचे अनंत गीते यांच्यामध्येच खऱ्या अर्थाने लढत होणार आहे. गीते हे हॅट्ट्रिक साधण्यासाठी, तर तटकरे हे मागील पराभवाचे उट्टे काढण्याच्या तयारीत आहेत. परंतु मतदारराजा नेमका कोणाच्या पाठीशी उभा राहतो? हे निकालाअंती स्पष्ट होईल. रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये तब्बल १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अखेरच्या दिवशी उमेदवारांच्या काही प्रमुख सभा वगळता काही ठिकाणी रॅली पार पडल्या आणि उन्हाच्या झळा सोसत सायंकाळी प्रचाराची सांगता झाली.छुप्या प्रचाराला वेग?नियमानुसार प्रचार थांबला असला, तरी आता खºया अर्थाने छुप्याप्रचाराला जोर येण्याची चिन्हे आहेत. मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेण्यासाठी उमेदवारांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आता बाहेर पडतील. मतदारांचे मन आणि मतपरिवर्तन करण्यासाठी सर्वच पक्षांनी आपले कार्यकर्ते कामाला लावल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019raigad-pcरायगडsunil tatkareसुनील तटकरेAnant Geeteअनंत गीते