शहरं
Join us  
Trending Stories
1
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
2
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
3
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
4
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
5
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
6
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
7
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
8
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
9
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
10
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
11
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
12
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
13
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
14
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
15
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
16
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
17
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
18
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
19
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
20
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?

माणूस जपणाऱ्या साहित्याला जात नसते

By admin | Published: October 09, 2016 2:52 AM

माणसाला माणसाशी माणुसकीनं वागायला आणि माणूसपण जपायला शिकवतं ते खरं साहित्य. साहित्याला जात नसते. साहित्यिकाने जातीपलीकडे जाऊन माणूसपण जपण्याकरिता

अलिबाग : माणसाला माणसाशी माणुसकीनं वागायला आणि माणूसपण जपायला शिकवतं ते खरं साहित्य. साहित्याला जात नसते. साहित्यिकाने जातीपलीकडे जाऊन माणूसपण जपण्याकरिता साहित्यनिर्मिती करावी. माणसाला जरी जन्माने जात चिकटली असली तरी साहित्याला जात नसते. साहित्यिक कोणत्याही जातीचा असला तरी त्याने माणूसपण जपण्याकरिता निर्माण केलेले साहित्य हे नेहमीच आनंद देणारे आणि उद्बोधक असते. जातीच्या चौकटीत न अडकता साहित्यिकांनी सर्जनशीलता जपली पाहिजे. साहित्य हा समाजाचा आरसा आहे. त्यात माणूसपणाचे स्वच्छ प्रतिबिंब उमटले पाहिजे, असे प्रतिपादन कवयित्री स्मिता सहस्रबुद्धे यांनी केले.अलिबाग तालुक्यातील पोयनाड येथील भ. ल. पाटील साहित्य व सामाजिक संस्थेच्या वतीने ज्येष्ठ नाटककार भ. ल. पाटील यांच्या जयंती दिनानिमित्त शुक्रवारी पोयनाडमधील गणेश मंदिर सभागृहात आयोजित कार्यक्रमात कवयित्री सहस्रबुद्धे यांना ‘भ. ल. पाटील काव्यभूषण पुरस्कार’ संस्थेचे मुख्य सल्लागार तथा रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ क्रीडा संघटक नथुरामभाऊ पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रायगड जि. प. आदर्श पुरस्कार प्राप्त कोलाड येथील सुएसो शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक अजय पाटील होते; तर विशेष अतिथी म्हणून कामार्ले ग्रामपंचायतीचे सरपंच संदीपभाऊ वाघपंजे उपस्थित होते. या वेळी प्रा. चंद्रकांत मढवी यांना ‘कादंबरी भूषण’, कवी पुंडलिक म्हात्रे यांना ‘काव्यभूषण पुरस्कार’ व मोहन भोईर यांना ‘नाट्यभूषण पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. कामार्ले ग्रामपंचायत उभारणार समाज भवन कामार्ले ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप वाघपंजे यांनी, कामार्ले ग्रामपंचायत लवकरच भ. ल. पाटील यांच्या नावाने, समाज भवनाची निर्मिती करेल, एक महान नाटककार ग्रामपंचायत हद्दीमध्ये निर्माण झाला. याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो, असे त्यांनी नमूद केले. स्थानिक माणसाच्या उत्कर्षासाठी व त्याला प्रेरणा मिळावी, त्याच्या हातून सत्कार्य घडावे, यासाठी पुरस्कार वितरणासारखे कार्यक्रम होणे गरजेचे असल्याचे मत अजय पाटील यांनी या वेळी मांडले. पुरस्कार प्राप्त कवी पुंडलिक म्हात्रे यांनी मनोगत व्यक्त केले.