शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

जागा वाचवण्यासाठी ग्रामस्थांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 23:00 IST

जमीन विक्रीचा व्यवहार रद्द करा; मोजणीला विरोध करणाऱ्यांना पोलिसांनी रोखले

अलिबाग : तालुक्यातील विर्त-सारळ ग्रामस्थांची कोट्यवधी किमतीची गुरचरण जमीन खासगी बिल्डरच्या घशात घालण्यात आली आहे. संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी या जागेच्या मोजणीला बुधवारी विरोध केल्याने पोलिसांनी ग्रामस्थांनाच रोखल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गुरचरण जमीन ही गावठाण विस्तारासाठी वापरण्यात येत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने जमीन विक्रीचा व्यवहार रद्द करावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.विर्त-सारळ हे रेवस आणि मांडवा या बंदराला खेटून असणारे गाव आहे. प्रत्येक गावासाठी गुरचरण जमिनी दिलेली असते. विर्त-सारळ गावासाठी तब्बल साडेतेरा एकर जमीन वाट्याला आलेली आहे. या जमिनीवर सुमारे दीडशे वर्षांपासून ग्रामस्थांचा हक्क आहे. मध्यंतरी काही दलालांनी पंचांची नावे वगळून आपली नावे सातबारावर लावली. त्यानंतर ग्रामस्थांना अंधारात ठेवून एका खासगी बिल्डरला विकण्यात आली असे आगरी शेतकरी प्रबोधिनीचे अध्यक्ष राजाराम पाटील यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.अलिबाग तालुका हा एमएमआरडीए क्षेत्रामध्ये आहे. त्यामुळे येथील जमिनीला मुंबई-नवी मुंबई सारखा कोट्यवधी रुपयांचा दर आला आहे. हेच उद्दिष्ट डोळ््यासमोर ठेवून दलालांनी गुरचरण जमिनीचा व्यवहार करून जमीन खासगी बिल्डरच्या घशात घातल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या या जमिनीचा बाजारभावानुसार सुमारे २६० कोटी रुपयांचे मूल्य होत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. यामध्ये विविध सरकारी अधिकारी, दलाल यांचे हात ओले झाले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी तातडीने जमिनी विक्रीचा व्यवहार रद्द करून ग्रामस्थांना द्यावी, अशी मागणी राजाराम पाटील यांनी यावेळी केली.बुधवारी लावण्यात आलेल्या जमीन मोजणीला ग्रामस्थ विरोध करणार असल्याचे लक्षात घेऊन प्रचंड पोलीस फौजफाटा तैनात केला होता. ग्रामस्थांनी याही परिस्थितीत मोजणीला प्रखर विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना रोखून तो हाणून पाडला. त्यामुळे त्या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते.गाव विस्तारासाठी केली होती जागेची मागणीगुरचरण जमीन ही संबंधित गावाच्या विस्तारासाठी असते. त्याचप्रमाणे याच जमिनीचा वापर पिढ्यानपिढ्या गुरांना चरण्यासाठी, गोठे बांधणे, काही प्रमाणात शेतीचा व्यवसायही करण्यासाठी केला जातो. गावातील कुटुंबांची संख्या वाढली आहे. त्यामुळे गावाचे विस्तारीकरण गुरचरण जागेत करावा अशी मागणी जिल्हा प्रशासन आणि भूमिअभिलेख विभागाकडे केली होती मात्र त्यांनी त्यावर काहीच कारवाई केली नाही, असे विर्त सारळ ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष प्रवीण वार्डे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.ग्रामस्थांवर खोट्या तक्रारी दाखल करून त्रास दिला जात आहे. या जागेबाबत न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे असे असताना प्रशासनाने जमिनीची मोजणी करणे बेकायदेशीर असल्याचे अ‍ॅड.राकेश पाटील यांनी लोकमतला सांगितले.

टॅग्स :alibaugअलिबाग