शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

राष्ट्रीय सेवा योजना : महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी बांधले १० बंधारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 05:12 IST

युवकांचे प्रभावी व्यक्तिमत्त्व घडविण्याचे काम महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेताना होत असते, तर हे प्रभावी व्यक्तिमत्त्व घडवत असताना तरु णांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाण व सेवाभाव निर्माण करण्याचे काम महाविद्यालयीन स्तरावर ‘राष्ट्रीय सेवा योजना’ (एनएसएस) युवा चळवळीतून होत असते.

- जयंत धुळपअलिबाग : युवकांचे प्रभावी व्यक्तिमत्त्व घडविण्याचे काम महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेताना होत असते, तर हे प्रभावी व्यक्तिमत्त्व घडवत असताना तरु णांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाण व सेवाभाव निर्माण करण्याचे काम महाविद्यालयीन स्तरावर ‘राष्ट्रीय सेवा योजना’ (एनएसएस) युवा चळवळीतून होत असते. त्याद्वारे युवाशक्ती मोठे कार्य उभे करत असते, हे रायगड जिल्ह्यातील दहा महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवा योजनेच्या ६११ युवती आणि ४०० युवक अशा एकूण १ हजार ११ स्वयंसेवकांनी अथक कष्ट करून तब्बल दहा वनराई बंधारे बांधून सिद्ध करून दाखविले आहे. यामध्ये युवती आघाडीवर होत्या, हे विशेष उल्लेखनीय मानले जात आहे. परिणामी, यंदाच्या राष्ट्रीय युवक दिनी या सर्व युवक -युवतींच्या मनात जलसंवर्धनाच्या राष्ट्रीय प्रयत्नात आम्हीही कमी नाही, अशी समाधानाची आणि गर्वाची भावना आहे.शिक्षण क्षेत्रात कनिष्ठ स्तरापासून ते उच्चशिक्षण क्षेत्रातील राष्ट्रीय सेवा योजना या उपक्र मापर्यंत राष्ट्रसेवेची व्याप्ती वाढत आहे. त्यास युवा पिढीचा सकारात्म प्रतिसाद लाभत असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट होत असल्याची भावना राष्ट्रीय सेवा योजनेचे रायगड जिल्हा समन्वयक डॉ. एम. एन. वाणी यांनी व्यक्त केली आहे.जिल्ह्यातील पाणीसमस्येवर उपाययोजना करण्याकरिता आपणही आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे, अशा हेतूने जिल्ह्यातील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकाºयांच्या बैठकीत वनराई बंधारे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबई विद्यापीठानेही वनराई बंधारे उपक्रमास प्राधान्य दिले आहे. अलिबागच्या जेएसएम कॉलेजची ५० मुले आणि ४४ मुली, अशा एकूण ४९ एनएसएस स्वयंसेवकांनी अलिबाग जवळच्या मानिभुते येथे, उरण येथील केडी उरण कॉलेजच्या २३ मुले आणि २६ मुली, अशा एकूण ४९ एनएसएस स्वयंसेवकांनी उरण तालुक्यातील पिरकोन येथे, सीकेटी कॉलेज(नवीन पनवेल)ची २५ मुले आणि ९३ मुली, अशा एकूण ११८ एनएसएस स्वयंसेवकांनी पनवेल तालुक्यातील नेरे येथील आदिवासी आश्रमशाळे जवळच्या नदीत, पेण येथील भाऊसाहेब नेने महाविद्यालयाच्या ३२ मुले आणि ५२ मुली, अशा एकूण ८४ एनएसएस स्वयंसेवकांनी पेण तालुक्यातील वाक्रुळ येथे, मुरुडच्या वसंतराव नाईक कॉलेजच्या ३६ मुले आणि ६६ मुली, अशा एकूण १०२ एनएसएस स्वयंसेवकांनी मुरुड जवळच्या तेलवडे गावात, पाली-सुधागड येथील जे.एन.पालीवाला कॉलेजची ४६ मुले आणि १०५ मुली, अशा एकूण १५१ एनएसएस स्वयंसेवकांनी सिद्धेश्वर गावी, रोहा येथील को.ए.सो. देशमुख-ताम्हाणे कॉलेजची ५४ मुले आणि ९९ मुली, अशा एकूण १५३ एनएसएस स्वयंसेवकांनी भागिरती खार येथे, तळा येथील दत्ताजीराव तटकरे कॉलेजची ५५ मुले आणि ५१ मुली, अशा एकूण १०६ एनएसएस स्वयंसेवकांनी खैराट गावी, तळा येथीलच वेदक कॉलेजची ४६ मुले आणि ३१ मुली, अशा एकूण ७७ एनएसएस स्वयंसेवकांनी भागकोंड येथे तर किहिम-चोंढी येथील एलएसपीएम कॉलेजची ३३ मुले आणि ४४ मुली, अशा एकूण ७७ एनएसएस स्वयंसेवकांनी आवास येथे वनराई बंधारे बांधले आहेत.दहा लाख गॅलन पाणी अडविलेया सर्व दहा वनराई बंधा-यांच्या माध्यमातून सुमारे दहा लाख गॅलन पाणी अडविण्यात यश आले आहे. अडवलेले पाणी जमिनीत मुरून बंधाºयांच्या परिसरातील भूजलपातळीत येत्या काळात वाढ होणे अपेक्षित आहे, तर विहिरींच्या पातळीत यंदा लवकर घट होणार नाही, असा अंदाज स्थानिक जाणकार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.महाविद्यालयीन विश्वातील विधायक युवा चळवळडॉ. डी. एस. कोठारी शिक्षण आयोगाने शिक्षणाच्या सर्वच टप्प्यांवर विद्यार्थी समाजसेवेशी जोडला जावा, अशी शिफारस १९६४-६६च्या दरम्यान केली होती. १९६७मध्ये राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांच्या परिषदेत एनसीसी सोबत राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) असावी, हे मान्य झाले. त्यानंतर झालेल्या कुलगुरूंच्या परिषदेत राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वागत होऊन २४ सप्टेंबर १९६९ रोजी महात्मा गांधीजी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने तेव्हाचे शिक्षणमंत्री व्ही. के. आर.व्ही. राव यांनी देशातील ३७ विद्यापीठांत प्रायोगिक तत्त्वावर राष्ट्रीय सेवा योजना सुरू केली. आज देशातील सर्व विद्यापीठांतील सर्व महाविद्यालये व लक्षावधी विद्यार्थी या योजनेत सहभागी झाले असून, राष्ट्रीय सेवा योजना ही महाविद्यालयीन विश्वातील मोठी विधायक युवा चळवळ बनली आहे.

टॅग्स :Raigadरायगड