शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

धर्मनिरपेक्ष विचारशक्ती एकत्र येण्याची गरज - सुनील तटकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 01:02 IST

धर्मनिरपेक्ष विचारशक्ती एकत्र येणे काळाची गरज आहे, असे उद्गार गोरेगाव येथे आयोजित प्रचाररॅलीत सुनील तटकरे यांनी काढले.

माणगाव : विचाराची लढाई धर्माच्या नावावर भाजप व शिवसेनेने चालू केली आहे. धर्म आणि जात यांचे भावनिक आवाहन करीत या जिल्ह्यामध्ये मतभेद करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न ज्या वेळी जातीयवादीशक्ती माध्यमातून होत असतो. धर्मनिरपेक्ष विचारशक्ती एकत्र येणे काळाची गरज आहे, असे उद्गार गोरेगाव येथे आयोजित प्रचाररॅलीत सुनील तटकरे यांनी काढले.गेली दहा वर्षे ज्यांना संधी दिली, याच भागातून त्यांना मताधिक्य दिले त्यात देवळी, नागाव, भिंताड, हरकोल, मांजरोणे यांचा सामावेश आहे. मात्र, त्यांनी काढलेल्या सिंहावलोकन विकासपुस्तिकेत एकही काम या भागातील केलेल्याचा उल्लेख नसल्याचा तटकरे यांनी सांगितले. गोरेगावमध्ये मी पक्षाच्या माध्यमातून धारणाचे काम, साडेतीन कोटींचे फिल्टर प्लांट, साडेतीन कोटींचे गाव तलाव सुशोभीकरण, बौद्ध समजासाठी विहार, चर्मकार समाजासाठी समाजभवन आणि सर्वात महत्त्वाचे गोरेगावचे मानबिंदू असलेले विष्णू तलावाकरिता सभागृहात वाद घालून पर्यावरणमंत्री यांच्याकडून विष्णू तलावाचे सुशोभीकरण मंजूर केल्याचे या वेळी तटकरे यांनी आवर्जून सांगितले.या वेळी राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष माजी आमदार माणिकराव जगताप कार्यकर्त्यांना घराघरांत जाऊन प्रचार करीत, दोन लाख मताधिक्यांने निवडून आणू, असे आवाहन करीत गोरेगाव व परिसराचा विकास करून घ्या, असे म्हणाले. प्रचार रॅलीकरिता माजी आमदार माणिक जगताप, राष्ट्रवादी राष्ट्रीय महिला अध्यक्षा चित्रा वाघ, काँग्रेस नेते श्रीनिवास बेंडखळे, जिल्हा अध्यक्ष प्रमोद घोसळकर राष्ट्रवादी जिल्हा प्रवक्ते विजयराव खुळे आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019raigad-pcरायगडsunil tatkareसुनील तटकरे