शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

पाच किमीसाठी दीड तास; मुंबई-गोवा मार्गावर वाहनचालकांना ‘ताप’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 08:07 IST

टेमपाले हद्दीत काम अर्धवट

महाड : होळीनंतर पुढील पाच दिवस कोकणातील गावांमध्ये पालख्या काढण्यात येतात. यासाठी शुक्रवारी हजारो चाकरमानी कोकणातील त्यांच्या मूळगावी निघाले. त्यामुळे शुक्रवारी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या रांगांच रांगा लागल्या होत्या. माणगाव आणि टेमपाले या दोन ठिकाणी तर तब्बल पाच किमी प्रवासासाठी दीड तासाचा कालावधी चाकरमान्यांना लागत होता. 

होळी दहन गुरुवारी रात्री करण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी धुलिवंदन सण साजरा करून पुढील पाच दिवस   कोकणातील प्रत्येक गावी संपूर्ण गावात गावदेवीची पालखी मिरवणूक निघणार आहे. आता सलग तीन दिवस शासकीय सुट्या असल्याने मोठ्या संख्येने नागरिक या सणासाठी कोकणात दाखल होत आहेत. त्यामुळे महामार्गावर छोट्या वाहनांचीही मोठ्या प्रमाणात वर्दळ होती.  

माणगाव, टेमपाले येथे वाहतूक कोंडी झाल्यानंतर महामार्ग वाहतूक पोलिस मदत केंद्र, महाड आणि टेमपाले येथील काही मुस्लिम तरुणांनी सकाळी ८ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत वाहतूक सुरळीत करण्याचे काम केले.

वाहने जोड रस्ता मार्गाने 

महामार्गावरील दुसऱ्या टप्प्याचे काम जवळपास पूर्ण झाले असले तरी माणगाव आणि टेमपाले या दोन ठिकाणचा वाहतूक कोंडीचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. शुक्रवारी दिवसभर मोठ्या संख्येने वाहनांची वर्दळ होती. माणगाव येथे पाच किमीपर्यंतच्या प्रवासासाठी एक ते दीड तास लागत होता. याच भागातील टेमपाले या गाव हद्दीत महामार्गाचे काम अर्धवट असल्याने वाहने जोड रस्ता मार्गे जात होती. त्यामुळे एक किमीच्या प्रवासाला खूप वेळ लागत होता.

पाहणी केली, पण...

माणगाव बाहेरून नवीन मार्ग संपादित केला असला तरी काम अर्धवट आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, यांच्यासह आदी मंत्र्यांनी याची पाहणी केली आहे. 

मुंबई-गोवा महामार्गाने नेहमी प्रवास करतो. यावेळी महाड-मुंबई यादरम्यान माणगाव येथे वारंवार वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. ही वाहनचालकांसाठी  डोकेदुखी ठरत आहे- इक्बाल म्हेस्कर, वाहनचालक.

टॅग्स :Raigadरायगडkonkanकोकण