शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: इम्तियाज जलील यांची घोषणा; विधानसभेसह नांदेड लोकसभा पोटनिवडणूकही लढवणार
2
"हे कुठून आले?"; किरीट सोमय्यांचं आकडेवारी बोट, व्होट जिहादबद्दल काय बोलले?
3
"या निवडणुकीत उद्धव ठाकरेंना पूर्ण संपवण्याचा मविआचा कट, आतातरी बुद्धी यायला हवी"
4
"कॅनडाला प्रत्यार्पणसाठी २६ जणांची यादी पाठवली, लॉरेन्स टोळीच्या..." भारताने ट्रुडोंना पुन्हा सुनावले
5
मविआत २६० जागांचा तिढा सुटला, २८ जागांवर प्रचंड रस्सीखेच; आजच जागावाटप फायनल होणार?
6
भारतात लवकरच Flying Taxi सर्व्हिस सुरू होणार, जाणून घ्या किती असेल भाडे?
7
"रोहितसाठी 'ही' चिंतेची बाब; कोहलीने 'हा' मोह टाळावा"; मुंबईकर माजी क्रिकेटपटूचं रोखठोक मत 
8
सुजय विखेंना धक्का?; भाजप संगमनेरमधून तिकीट नाकारण्याची शक्यता, कारणही आलं समोर!
9
"निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देऊ"; शरद पवारांचं नाव न घेता धनंजय मुंडे बरसले
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : ठाकरे गटाचा झिशान सिद्दिकींविरोधात उमेदवार ठरला! वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई विधानसभा लढवणार
11
मालाडमध्ये रिक्षाचालकांकडून मनसे कार्यकर्त्याच्या मुलाची हत्या; राज ठाकरेंनी घरी जाऊन केलं सांत्वन
12
Ashwin समोर रिव्हर्स स्वीपचा नाद केला अन् वाया गेला; Devon Conway 'नर्व्हस नाईंटी'चा शिकार
13
"लोकांमध्ये आक्रोष, प्रचंड चीड, ही लाट देवेंद्र फडणवीसांचा कार्यक्रमच लावणार’’, जरांगेंचा पुन्हा इशारा
14
"आमचे सरकार आल्यास दारूबंदी हटवली जाईल", प्रशांत किशोर यांची मोठी घोषणा
15
मुंबईतील 'या' ३ जागा वगळता ३३ जागांवर एकमत; तिढा सोडवण्यासाठी मविआ नेत्यांची बैठक
16
Raj Thackeray: मनसेला मुंबईत यंदा नवनिर्माणाची संधी? काय सांगतं राजकीय गणित?
17
बहराइच हिंसाचारातील ५ आरोपी अटकेत, एन्काऊंटरमध्ये दोन आरोपी जखमी
18
राज्य सरकारकडून २७ महामंडळांवर नियुक्त्या: भाजपच्या वासुदेव काळेंनाही निष्ठेचं फळ; कॅबिनेट मंत्रि‍पदाचा दर्जा!
19
नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर 
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live: राजकीय घडामोडींना आला वेग! हितेंद्र ठाकूर मविआला पाठिंबा देणार?

जिल्ह्यात ३ हजार ३६ घरांना आॅनलाइन मंजुरी

By admin | Published: October 11, 2016 3:18 AM

निराधार आणि घर नसलेल्यांकरिता देशात अमलात आणण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सन २०१५-१६ मध्ये रायगड जिल्ह्यात ३ हजार ३६ ग्रामस्थांच्या

जयंत धुळप / अलिबागनिराधार आणि घर नसलेल्यांकरिता देशात अमलात आणण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सन २०१५-१६ मध्ये रायगड जिल्ह्यात ३ हजार ३६ ग्रामस्थांच्या घरांना आॅनलाइन मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी २ हजार २६५ ग्रामस्थांना वित्त साह्याचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे, तर १ हजार ६७ जणांना घरांसाठी दुसरा हप्ता देखील देण्यात आला असल्याची माहिती रायगड जिल्हा प्रशासनाने दिली आहे. प्रधानमंत्री आवास योजना ही प्रत्येक भारतीयासाठी स्वत:चे हक्काचे घर असावे यासाठी केलेली महत्त्वपूर्ण योजना असून या योजनेअंतर्गत सन २०२२ पर्यंत शहरी गरिबांसाठी २ कोटी घरे बांधण्यात येणार आहेत. यात ९५ टक्के लाभार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बलस्तरातील असतील. तर महत्त्वाचे म्हणजे देशात अतिशय अल्प काळात ६ लाख घरांच्या बांधकामास प्रारंभ देखील झालेला आहे. पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यात ३ लाख ५ हजार ०२४ लाभधारक सहभागी झाले आहेत. ही संख्या आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. १ जून २०१५ पासून संपूर्ण देशभर पंतप्रधान सुरक्षा विमा योजना सुरू करण्यात आली. भारतातील गरिबांसाठी सामाजिक सुरक्षेचे कवच असलेली, जन सुरक्षा असलेली ही लाभदायक अशी योजना आहे. देशपातळीवर या योजनेमध्ये १३ मे २०१६ अखेर ९ कोटी ४३ लाख लोकांची नोंदणी झाली आहे. केवळ १२ रु पये भरून एक वर्षाचे विमा संरक्षण असणारी ही एक अपघात विमा योजना आहे. दरवर्षी नूतनीकरण आवश्यक असणाऱ्या या योजनेची बँका व सार्वजनिक क्षेत्रातील इन्शुरन्स कंपन्या यांच्या सहयोगाने या अंमलबजावणी करण्यात येत आहे.१८ ते ७० वर्षे वयोगटातील सर्व बचत बँक खातेधारक या योजनेत सहभागी होऊ शकतात. एकाच व्यक्तीची अनेक बचत खाती असतील तर अशी व्यक्ती कुठल्याही एका बचत खात्याद्वारे हा विमा उतरवू शकते. विमा उतरविणाऱ्या व्यक्तीला आधार क्र मांकाद्वारे योजनेत सहभागी होता येईल. विमा हप्ता बँक खात्यात परस्पर टाकला जाईल. पुढील वर्षाच्या नूतनीकरणाचा अर्ज ३१ मेपर्यंत देणे आवश्यक राहील. या योजनेत विमा संरक्षण हे ३0 जून ते ३१ मे अशा एक वर्षाच्या काळासाठी लागू असते.