शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पंचनामे २२ कोटींचे, वाटप मात्र १२ कोटींचेच; निसर्ग चक्रीवादळ अपादग्रस्तांमध्ये संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 07:09 IST

नुकसानभरपाईस विलंब, वादळामुळे १५ हजार ५७९ दुर्घटना

उदय कळसम्हसळा : निसर्ग चक्रीवादळामुळे म्हसळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. प्रशासनाने २२ कोटी रुपयांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले आहेत, पैकी आतापर्यंत ११ कोटी ८७ लाख २० हजार २६१ रुपयांचे अनुदान प्रशासनामार्फत वितरीत करण्यात आले आहे. अद्यापही नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात विलंब होत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी १०० कोटींची तातडीची मदत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर केली. चक्रीवादळाच्या तडाख्यात उद्ध्वस्त झालेल्या रायगड जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारने आणखी ३०१ कोटींची मदत जाहीर केली आहे.एकत्रीत ३७३ कोटी रुपयांची रक्कम जिल्हा प्रशासनाकडे जमा झाली आहे.

म्हसळा तालुक्यातील म्हसळा नगरपंचायत व ३९ ग्रामपंचायतीतील प्रत्येक गाववाडींत एकूण १५ हजार ५७९ दुर्घटना घडल्या.त्यामध्ये प्रामुख्याने एक जीवित हानी, ३१ मृत जनावरे, ३ पोल्ट्री फॉर्म, १८३ पूर्णत: पडलेली घरे, १४ हजार ४९४ अशंत: पडलेली घरे, २३ झोपड्या, ७८१ गुरांचे गोठे, ६३ दुकान टपऱ्यांचा समावेश आहे. अशा प्रकारे ७ हजार ८३ लाभार्थ्यांचे अपरिमीत नुकसान झाले. सुमारे २१ कोटी ९८ लाख २८ हजार ३३९ नुकसानीचे पंचनामे करण्यात प्रशासनाला यश आले. प्रशासनाने आता मदत वाटपाला सुरुवात केली आहे. तालुक्यातील काही अपादग्रस्ताना ११ कोटी ८७ लाख २० हजार २६१ रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. मात्र मदत वाटपामध्ये विलंब होत असल्याने आपादग्रस्तांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.१८६३.६१ हेक्टर क्षेत्रांतील फळबागायतीचे नुकसानम्हसळा तालुक्यांतील ४४२५ बाधित शेतकऱ्यांचे १८६३.६१ हेक्टर क्षेत्रांतील फळबागायतीचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये आंबा क्षेत्र १३४८.०९ हेक्टर, काजू ३८९.५ १ हेक्टर, नारळ ५ ०.२० हेक्टर, सुपारी २९.३१ हेक्टर इतर फळपिके ४६.५० या बागायती क्षेत्रात नुकसान झाले आहे. फळपिकांसाठी पूर्वी १८ हजार रुपये प्रति हेक्टरी नुकसान देण्यात येत होते. सरकार बागायतदारांना ५० हजार प्रति हेक्टरी नुकसान देणार आहे.वाढीव नुकसान भरपाईचे काय झाले?पहिल्या जीआरनुसार नुकसानग्रस्तांना प्रत्येकी १५ हजार नुकसान भरपाई देण्याचे आदेश प्राप्त झाले होते; परंतु त्यानंतर सरकारच्या नवीन आदेशानुसार नुकसानग्रस्तांना १५ हजार रुपये अधिक १० हजार वाढीव असे एकूण प्रत्येकी २५ हजार रुपये देण्याचे आदेश असतानाही वाटप का करण्यात आले नाही?असा प्रश्न उपस्थित केला आहे. म्हसळा तहसील कार्यालयातील संबंधित कर्मचाºयाजवळ विचारणा केली असता काहीही सांगण्यास नकार देण्यात आला. याबाबत पालकमंत्री, खासदार, आमदार यांनी पाठपुरावा करून नुकसानग्रस्तांना न्याय देण्याची मागणी करण्यात येत आहे.तालुक्यातील अपादग्रस्ताना ११ कोटी ८७ लक्ष २० हजार २६१ रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. उर्वरित अनुदानही उपलब्ध आहे. लाभार्थींच्या खात्यावर अनुदान जमा होण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोणीही पात्र लाभार्थी अनुदानापासून वंचित राहणार नाही.-शरद गोसावी, तहसीलदार, म्हसळा

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळRaigadरायगड