शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

Panvel: पनवेलच्या तहसिलदारांचे निलंबन करा, उपोषणकर्त्या पळस्पे ग्रामस्थांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

By वैभव गायकर | Published: August 26, 2023 4:22 PM

Panvel: पळस्पे गावासभोवताली असलेले गोडाऊन तसेच बांधकाम प्रकल्पांमुळे याठिकाणी भातशेती धोक्यात आली आहे.

- वैभव गायकर पनवेल - पळस्पे गावासभोवताली असलेले गोडाऊन तसेच बांधकाम प्रकल्पांमुळे याठिकाणी भातशेती धोक्यात आली आहे.आवश्यक असलेला 9 मीटरचा रस्ता देखील हे बांधकाम व्यावसायिक तसेच गोदाम मालक शेतकऱ्यांना देत नसल्याने मागील पाच दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या पळस्पे ग्रामस्थांनी पनवेलचे तहसीलदार विजय पाटील यांच्या निलंबनाची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

 गावाभोवती असलेली जेडब्ल्यूसी कंपनीअरिहंत गृहप्रकल्प या प्रकल्पामुळे शेतीला धोका निर्माण होत आहे.गोदामाच्या दूषित सांडपाण्यामुळे ग्रामस्थांना त्रास होत आहे.तसेच ग्रामस्थांच्या वहिवाटीचा रस्ता अडवला गेला असताना तहसीलदार चुकीचा अहवाल देऊन ग्रामस्थांचा उपोषणच दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप उपोषणकर्त्या दमयंती भगत यांनी केला आहे.एकीकडे गोदामांच्या दूषित पाण्यामुळे भातशेती नष्ट होत चालली असताना तहसीलदार विजय पाटील या प्रकरणात संबंधितांना क्लीन चिट देत असल्याचा आरोपही शेकापचे नेते अनिल ढवळे यांनी केला आहे.12 ग्रामस्थ उपोषणाला बसत असताना प्रशासनाची भूमिका बिल्डर धार्जिणी असल्याचा आरोप ढवळे यांनी केला आहे.

सल्ला देण्याऐवजी कारवाई का नाही ?पळस्पे मधील पाण्याचे प्रदूषण,रस्त्याची अडवणूक हे सर्व प्रकरण डोळ्या देखत असताना तहसीलदार विजय पाटील स्थळ पाहणी करून  मामलेदार कोर्टात कमल 1906 कायद्याप्रमाणे दावा दाखल करण्याचा सल्ला ग्रामस्थांना देतात मात्र स्वतः सुमोटो म्हणुन याबाबत काहीच कारवाई करीत नसल्याने सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच याबाबत दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी 32 ग्रामस्थांनी सह्यांची पत्र मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

टॅग्स :panvelपनवेल