शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी तुटण्याच्या दिशेने?; भास्कर जाधव कडाडले, काँग्रेसला करून दिली आठवण
2
जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला; गांदरबल इथं गोळीबारात ३ मजूर ठार तर ५ जखमी
3
समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन; कपिल पाटील यांचा दिल्लीत पक्षप्रवेश
4
नाशिकमध्ये सीमा हिरेंच्या उमेदवारीला पक्षातच विरोध; महायुतीत बंडखोरीची शक्यता
5
"आमच्यात वाद नव्हताच..."; उमेदवारी न मिळालेल्या भाजपा आमदार अश्विनी जगपात यांचं विधान
6
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
7
पक्षफुटीनंतरही एकनिष्ठ राहिलेल्या आमदाराचा शरद पवारच करणार 'करेक्ट कार्यक्रम'?
8
कुटुंबवादामुळे तरुणांचे नुकसान; 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार, PM मोदींची घोषणा
9
Video - मोबाईलवर बोलत रेल्वे ट्रॅक ओलांडत होता 'तो'; अचानक समोरून आली ट्रेन अन्...
10
कडक सॅल्यूट! पतीचा मृत्यू झाला पण 'तिने' हार नाही मानली; ई-रिक्षा चालवून भरतेय कुटुंबाचं पोट
11
दारुण पराभवानंतर BCCI चा मोठा निर्णय; उर्वरीत मालिकेसाठी स्टार खेळाडूला मिळाली संधी
12
नात्याला काळीमा! नातवाने त्रिशूळाने वार करून केली आजीची हत्या, शिवलिंगावर रक्ताचा अभिषेक
13
मुंबईतल्या 'या' १४ जागांवर भाजपाचे उमेदवार ठरले; ३ विद्यमान आमदार प्रतिक्षेत 
14
ज्योती मेटे यांचा शरद पवार गटात प्रवेश, विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत म्हणाल्या...
15
महिलेशी मैत्री, हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं अन्...; कसा पकडला गेला शार्प शूटर सुक्खा?
16
जास्तीत जास्त मुले जन्माला घाला, अन्यथा..; CM चंद्रबाबू नायडूंचे आवाहन, कारण काय?
17
महाराष्ट्रात हरयाणामध्ये झालेल्या त्या चुका काँग्रेस टाळणार, राहुल गांधी घेताहेत अशी खबरदारी
18
शेलार बंधू विधानसभेच्या रिंगणात; आशिष शेलारांसह त्यांच्या मोठ्या भावालाही भाजपची उमेदवारी
19
दिल्लीतील प्रदूषणाला उत्तर प्रदेश आणि हरयाणा सरकारवर जबाबदार; CM आतिशी यांचा आरोप
20
Ranji Rrophy: रिंकूची चौकार-षटकारांची 'बरसात'; बॅटिंगमध्ये Yuzvendra Chahal ही ठरला 'फर्स्ट क्लास'

जिल्ह्यात आंबा प्रक्रिया केंद्रासाठी निधीची तदतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 11:40 PM

फलोत्पादनमंत्र्यांचे आश्वासन : पंडित पाटील यांच्या पाठपुराव्यास यश; बेरोजगारांना मिळणार रोजगार

अलिबाग : रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आंबा उत्पादक आहेत. जिल्ह्यात प्रक्रिया करण्यासाठी शासनाकडून कोणतेही उद्योग उभारण्यात आले नाहीत. शासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन आंबा प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी निधीची तरतूद करावी, अशी मागणी विधिमंडळाच्या चालू हिवाळी अधिवेशनात अलिबागचे आ. पंडित पाटील यांनी केली.

पाटील यांच्या मागणीची दखल घेऊन आंबा प्रक्रिया केंद्रासाठी निधीची तरतूद केली जाणार असून, वेगवेगळ्या संस्था, संघटना, व्यक्तीला प्रकल्प उभारणीसाठी अर्थसाहाय्य केले जाईल, असे कृषी व फलोत्पादनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आंबा उत्पादनासाठी अधिक प्रोत्साहन तसेच बेरोजगारांना रोजगार संधी उपलब्ध होईल.

रायगड जिल्ह्यात भातशेतीबरोबरच आंब्याची लागवड करणारे शेतकरीही मोठ्या प्रमाणात आहेत. ज्याप्रमाणे कोकणातील आंब्याला मागणी असते, त्याप्रमाणे रायगड जिल्ह्यातील आंब्याला राज्य, देश-विदेशात मागणी असते. जिल्ह्यात आंबा उत्पादक शेतकºयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे; परंतु या आंब्यावर प्रक्रिया करणारे केंद्र उभारण्यासाठी शासनाकडून निधी मिळत नसल्याने आंबा उत्पादकांच्या व्यवसायाला पाहिजे तशी गती नाही. रायगड जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकºयांना व्यवसायासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. त्यामुळे शासनाने आंबा प्रक्रिया केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी आपण केल्याचे आ. पाटील यांनी सांगितले.

रायगड जिल्ह्यामध्ये आंबा पिकाखाली सुमारे ११ हजार ६३२ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. आंब्याची उत्पादकता ३.३५ मे. टन प्रतिहेक्टर आहे. जिल्ह्यात व्यावसायिक तत्त्वावर चालणारे आंबा प्रक्रिया केंद्र उपलब्ध नसल्याचे कृषी व फलोत्पादनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नमूद करून, केंद्र शासनाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेमध्ये प्राथमिक किंवा फिरते फळ प्रक्रिया केंद्रास अनुदान उपलब्ध आहे. या योजनेअंतर्गत सर्वसाधारण क्षेत्रातील शेतकºयांसाठी प्रकल्प खर्चाच्या ४० टक्के ( १० लाख रुपये) व डोंगराळ क्षेत्रातील ३५ टक्के (१३.७५ लाख रुपये) इतका निधी देय असल्याचे सांगितले.दोन योजनेअंतर्गत प्रकल्प उभारणीसाठी निधी देणारशेतीमालाचे मूल्यवर्धन व कृषी प्रक्रिया उद्योगास चालना देण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री कृषी अन्न प्रकिया योजना राबविण्यात येत आहे. योजनेअंतर्गत शेतीमालाचे मूल्यवर्धन ग्रामीण भागातील लघू व मध्यम अन्न प्रक्रिया उद्योगास प्रोत्साहन प्रकल्पाचे आधुनिकीकरण, तसेच मनुष्यबळ निर्मिती व विकास याकरिता शासकीय सार्वजनिक उद्योग सक्षम शेतकरी उत्पादन कंपनी, महिला स्वयंसाहाय्यता गट, खासगी उद्योग क्षेत्र, ग्रामीण बेरोजगार युवक, सहकारी संस्था यांना प्रकल्प उभारणीसाठी येणाऱ्या खर्चाच्या ३० टक्के कमाल ५० लाख रुपयांपर्यंत अनुदान देय आहे. दोन्ही योजनेअंतर्गत प्रकल्प उभारणीसाठी तसेच रायगड जिल्ह्यात फळ प्रक्रिया केंद्रासाठी निधीची तरतूद करण्यात येणार असल्याचे कृषी व फलोत्पादनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटल्याचे आ. पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :MangoआंबाRaigadरायगड