शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

पेण अर्बन बँके च्या ठेवीदारांचा निवडणुकीवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 23:57 IST

पेण अर्बन बँक कृती समिती आक्रमक; खोपोली येथे खातेदारांची बैठक

पेण : सप्टेंबर २०१० पासून आर्थिक घोटाळा झाल्याने बंद पडलेल्या पेण अर्बन को. बँकेच्या दीड लाखांच्या वर खातेदारांना अद्याप न्याय मिळालेला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री अनंत गीते, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील या सर्वांनी वेळोवेळी पेण बँकेतील खातेदारांना सरकार न्याय देईल, असे आश्वासन दिले. मात्र, अद्याप न्याय मिळाला नाही, म्हणून संघर्ष समितीसह खातेदारांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानासमोर जबरदस्त घोषणाबाजी करीत निदर्शने केल्याने या सर्व खातेदारांना अटक व सुटका करण्यात आली आहे. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळाबरोबर चर्चा करून पुन्हा एकदा आश्वासन दिले आहे. मात्र, अद्याप कोणत्याही प्रकारचा तोडगा न निघाल्याने संतप्त खातेदारांनी आपल्या कुटुंबासह लोकसभेला मतदानच करायचे नाही, असा निर्णय घेतला आहे. या संदर्भात खोपोली येथे खातेदारांची बैठक पार पडली असून राज्य व केंद्र शासनाबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.पेण अर्बन बँक घोटाळ्याने १ लाख ९८ हजार खातेदार देशोधडीला लागल्याने अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. ठेवीच्या व्याजावर उदरनिर्वाह करणाऱ्या ज्येष्ठांचे जगणे मुश्कील झाले. तरीही ठेवीदार संघर्ष समिती न्यायासाठी गेली नऊ वर्षे प्रत्यक्षात रस्त्यावर उतरून व न्यायालयीन लढा देत आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी गेली वेळा आंदोलन निदर्शने अशी भूमिका घेत असताना आश्वासन खेरीज या सरकारने काही दिले नाही म्हणून संघर्ष समितीच्या वतीने थेट मुख्यमंत्र्यांचे मुंबईतील शासकीय वर्षा निवासस्थान गाठून जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने केल्याने संघर्ष समितीच्या सर्व पदाधिकारी वर्गाला ताब्यात घेऊन अटक करून राजभवनात घेऊन गेल्याने या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिष्टमंडळाबरोबर चर्चा करण्याचे पाचारण केले. मात्र, फक्त आश्वासना खेरीज काहीही या शासनाने दिले नाही, असा सवाल उपस्थित करीत राज्य व केंद्र शासनाचा निषेध व्यक्त करीत आगामी लोकसभा निवडणुकांसाठी होणाºया मतदानावर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा घेतला.न्याय न मिळाल्याने संताप२०१० मध्ये बँक बंद पडली, त्यानंतर बँकेचे ठेवीदार मात्र आजतागायत न्यायाच्या प्रतीक्षेत असून ठेवीदार आणि असंख्य खातेदार देशोधडीला लागले आहेत. ठेवीदाराच्या पैशातून घेतलेल्या जमिनी विकल्या जात नाहीत, बोगस कर्जवसुली होत नाही, १३१ एकर जमिनीवर शासनाने विक्रीय निर्बंध घातले असले तरी ठेवीदारांना त्याचा उपयोग नसून या जमिनीचा लिलाव होणे जरुरीचे आहे. शेतकऱ्यांनी आपल्या मालकीच्या जमिनी विकून ५० लाखांपर्यंतच्या प्रत्येकी ठेवी ठेवल्या होत्या. तसेच विविध क्षेत्रातील सेवानिवृत्त कर्मचाºयांनी जादा व्याजाच्या लोभापोटी बँकेत ठेवी ठेवून व्याजावर कुटुंबाचा गाडा हाकला होता; परंतु बँक अचानक बंद पडल्याने ठेवीदाराच्या तोंडचे पाणी पळून त्याच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे संघर्ष समिती मार्फत २०१० पासून वारंवार बैठका आंदोलने निदर्शने करीत असताना मुख्यमंत्री यांच्यासह अन्य मंत्री गणांनी फक्त आश्वासनाखेरीज काही दिले नाही त्यामुळे संघर्ष समिती आक्रमक झाली आहे. यामुळे मतदानावर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा घेण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती संघर्ष समितीच्या वतीने चिंतामणी पाटील यांनी माहिती दिली आहे.

टॅग्स :Raigadरायगडbankबँक