शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पर्यावरण रक्षणासाठी पेण वनविभाग सरसावला; इकोफ्रेंडली होळीसाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 23:37 IST

वनराई संरक्षणासाठी वनक्षेत्रावर करडी नजर

पेण : पृथ्वीच्या तापमानात होणाऱ्या बदलांमुळे नैसर्गिक चक्रावर ठिकठिकाणी अनिष्ट परिणाम झालेले दिसून येतात. सतत येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे मानवी समूहांना अनेक राष्ट्रात जीवितहानीसह मोठ्या आर्थिक हानीचा सामना करावा लागतो. पृथ्वीवर येणारी ही नैसर्गिक संकटे रोखण्यासाठी झाडे वाचली पाहिजे, वनराईचे संरक्षण करण्याबरोबर सतत होणारी वृक्षतोड थांबली पाहिजे. सध्या कोकणात होळीच्या सणासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जाते यासाठी पेणचा वनविभागाने आपल्या कार्यक्षेत्रातील वनक्षेत्रात कडक प्रतिबंधक उपाययोजना केल्या आहेत. नागरिकांनी इक ोफ्रेंडली होळीचा सण साजरा करून राष्ट्राची संपत्ती असलेल्या वनांचे रक्षणाची जबाबदारी वनखात्याकडे आहे. हौसेपोटी वृक्षावर कुºहाडीचे घाव घालणारे हात थांबवावे. त्याचबरोबरीने झाडांचा पालापाचोळा, केळीची पाने, गोवºया याद्वारे पर्यावरणपूरक अशाप्रकारे होळीचा सण साजरा करावा, असे आवाहन पेण वनक्षेत्रपाल प्रसाद गायकवाड यांनी केले.पेण वनविभागाची व्याप्ती सुमारे ९ हजार ९०० चौ. मी. असून या क्षेत्रात पानझडी जंगलाचा समावेश आहे. या क्षेत्रात सात राऊंड असून सात वनपाल व २५ वनरक्षकांद्वारे या वनांचे संरक्षण केले जाते. गेल्या काही वर्षांपासून शतकोटी वृक्षलागवडीमुळे, नागरिकांमध्ये वृक्षप्रेम वाढीस लागले आहे. हौसमौज व उत्साहामुळे होळी सणाच्या वेळी विशेषत: कोकणात मोठ्या प्रमाणावर जी वृक्षतोड होत होती ते प्रमाण आता कित्येक पटीने कमी झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. सध्या लोकांचा दृष्टिकोन बदलला असून पर्यावरणाला मारक ठरणाºया अनेक गोष्टी लोकांकडून बहिष्कृत होवू लागल्यात. हे चांगले सुलक्षण असून पर्यावरणपूरक पद्धतीने होळीचा सण साजरा करण्यावर शहरी भागातील नागरिकांनी भर दिला आहे. गेल्या सात ते आठ वर्षांपासून पर्यावरणपूरक होळीचा सण साजरा करण्यासाठी पेण वन विभागाच्या कार्यालयीन ग्राऊंडमध्ये गोवºया, पालापाचोळा, केळीची पाने यांचा वापर करून होळी सणाच्या इकोफे्रं डली डेमोचे प्रात्यक्षिक सादरीकरण वनविभाग व वृक्षप्रेमींतर्फे केले जात आहे.पर्यावरणपूरक होळी सण साजरा करण्यासाठी आम्ही व्यापक मोहीम हाती घेतली असून पेण शहर व ग्रामीण परिसरातील सरपंच, नागरी संकुलातील सोसायट्यांचे प्रमुख, माध्यमिक व उच्च माध्यमिक शालेय विद्यार्थी, शिक्षक तसेच त्या क्षेत्रातील जिल्हा परिषद सदस्यांना निमंत्रित करून शालेय विद्यार्थ्यांसमवेत पर्यावरणपूरक होळी डेमो सादरीकरणातून दिवसात जनजागृती करण्यावर भर दिला जात आहे. या मोहिमेद्वारे वृक्षतोड थांबविणे हाच उद्देश आहे.- प्रसाद गायकवाड,वनक्षेत्रपाल पेणवृक्ष हे मानवी जीवनाला आवश्यक असे प्राणवायू देणारे प्राणसंजीवक मित्र असल्याने सतत बदलणारे तापमान, येणाºया नैसर्गिक आपत्ती हे सर्व थांबवायचे असेल तर वृक्षतोड करू नये. होळीचा सण इकोफ्रेंडली साजरा करावा.- प्रा. उदय मानकवळे, वृक्षप्रेमी सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :Holiहोळीforest departmentवनविभाग