शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

उपजिल्हा रुग्णालयाकडे डॉक्टरांची पाठ; कर्जतमधील विदारक सत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2020 1:04 AM

एमबीबीएस डॉक्टरांना अपेक्षेपेक्षा कमी मानधन मिळत असल्याने सेवा देण्यास नकार

- विजय मांडे कर्जत : शासनाकडून शासकीय रुग्णालयांमध्ये रुजू होणाऱ्या एमबीबीएस डॉक्टरला सुरुवातीस जेमतेम ४५ हजार इतके मानधन तर काहींना श्रेणीनुसार थोडे जास्त मानधन मिळते. मात्र, डॉक्टरांच्या अपेक्षेपेक्षा ते मानधन फारच कमी असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे; त्यामुळे ते कर्जत उपजिल्हा रुग्णालयात सेवा देण्यास तयार होत नसल्याचे विदारक सत्य समोर आले आहे. याबाबतची माहिती जिल्हा चिकित्सक डॉ. अजित गवळी यांनी दिली.उपजिल्हा रुग्णालयाबाबत कर्जतचे सामाजिक कार्यकर्ते पंकज मांगीलाल ओसवाल यांनी ‘आपले सरकार वेब पोर्टल’च्या माध्यमातून माहिती विचारली होती, त्या वेळी उत्तर देताना, कर्जत उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची एकूण आठ पदे मंजूर असून, पाच वैद्यकीय अधिकारी व एक दंत शल्यचिकित्सक अशी सहा पदे भरलेली आहेत व दोन पदे रिक्त आहेत. एमबीबीएस डॉक्टर हे ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालय येथे येण्यास तयार नाहीत. एमबीबीएस डॉक्टरांना देण्यात येणारे मानधन फक्त ४५ हजार असल्याने डॉक्टरांच्या अपेक्षेपेक्षा फारच कमी आहे. त्यामुळे ते डॉक्टर शासन सेवेत यायला उत्सुक नाहीत. परिणामी, वैद्यकीय अधिकारी कमी असल्यामुळे उपलब्ध वैद्यकीय अधिकारी यांच्यावर रुग्णसेवेचा अतिरिक्त ताण पडतो व मनुष्यबळ कमी असल्यामुळे रुग्णांना अपेक्षेप्रमाणे सेवा देणे इच्छा असूनही शक्य होत नाही, असा खुलासा जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अजित गवळी यांनी लेखी पत्राद्वारे केला आहे. यामुळे कर्जत उपजिल्हा रुग्णालयाला तज्ज्ञ डॉक्टर मिळणार की नाही, असा प्रश्न कर्जतकरांना पडला आहे.शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ५० बेडचे कर्जत उपजिल्हा रुग्णालय आहे. मात्र, सध्या स्थितीत त्यातील किती बेड शिल्लक आहेत हा विषयच वेगळा. मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर असल्याने रेल्वे अपघातातील जखमींनाही येथे आणले जाते. तसेच कर्जत-मुरबाड, कर्जत-कल्याण मार्गावरील अपघातातील जखमींना येथे उपचारासाठी आणले जाते. मात्र, अद्ययावत सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या कमतरतेमुळे रुग्णांना या उपजिल्हा रुग्णालयात उपचार न करताच, पुढे हलविण्याचा सल्ला देऊन उपस्थित डॉक्टर जबाबदारी ढकलतात. त्यामुळे संबंधित रुग्णाला पनवेल, मुंबई येथील रुग्णालयात न्यावे लागते. यामध्ये वेळ जात असल्याने प्रसंगी रुग्णाच्या जीवावरही बेतण्याची शक्यता असते.तालुक्यात १७० पेक्षा अधिक गावेपावसाळ्यात धरणात बुडालेले, धबधब्या वरून पडलेले, गिर्यारोहण करताना घसरून पडलेले असेही रुग्ण येथे येतात. मात्र, तज्ज्ञ डॉक्टरांअभावी तात्पुरते प्राथमिक उपचार करून त्यांनाही पुढचा रस्ता दाखवण्यात येतो.तालुक्यात सुमारे १७० पेक्षा अधिक गावे, वाड्या, पाडे आहेत. उपजिल्हा रुग्णालय सुरू झाले, तेव्हा सगळ्यांना येथे मोफत चांगले उपचार मिळतील, अशी नागरिकांना अपेक्षा होती.मात्र, डॉक्टरांची रिक्त पदे, डिजिटल एक्स-रे, सोनोग्राफी आदी सुविधांची उणीव, औषंधाचा अपुरा पुरवठा यामुळे होतो त्रास.एमबीबीएस डॉक्टरांना अधिक मानधनाची अपेक्षा असते. ती पूर्ण होत नसल्याने ते रुजू होण्यास तयार होत नाहीत आणि उपजिल्हा दर्जाच्या रुग्णालयात बीएएमएस डॉक्टरांची नेमणूक करू नये, असे शासकीय धोरण असल्याने पदे रिक्त राहतात. मात्र, जिल्ह्यात प्राथमिक आरोग्यकेंद्रात बीएएमएस डॉक्टरांची पदे भरून उणीव भरून काढली आहे.- डॉ. अजित गवळी, शल्य चिकित्सक,जिल्हा रुग्णालय, अलिबागवैद्यकीय अधिकारी कमी असल्यामुळे उपलब्ध वैद्यकीय अधिकारी यांच्यावर रुग्णसेवेचा अतिरिक्त ताण पडतो व मनुष्यबळ कमी असल्यामुळे रुग्णांना अपेक्षेप्रमाणे सेवा देणे इच्छा असूनही शक्य होत नाहीमी, आपले सरकार वेब पोर्टलच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाकडे डॉक्टरांच्या रिक्त पदाबाबत पत्रव्यवहार केला होता. त्यावर अधिक मानधनाभावी डॉक्टर रुजू होत नाहीत, असा लेखी खुलासा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. तरी शासनाने यावर योग्य ती सकारात्मक पावले उचलून उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांची नेमणूक करावी.- पंकज ओसवाल, सामाजिक कार्यकर्ते, कर्जत