शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पोलादपुरातील दरडग्रस्त वाऱ्यावर, प्रशासन ढिम्म; निधी, जागा मंजूर असतानाही पुनर्वसन रखडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 08:37 IST

गेल्या आठवड्यात दरडग्रस्तांनी प्रशासनाकडे निवेदन देऊन पुनर्वसनाबाबतची मागणी केली

लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: महाड तालुक्यात तळीये व पोलादपूर तालुक्यात केवनाळे आणि साखर सुतारवाडी गावावर २१ व २२ जुलै २०२१ रोजी दरड कोसळली होती. यातील तळीये दरडग्रस्तांसाठी ६६ घरे बांधून पूर्ण झाली. ती दरडग्रस्तांना दिली, तर २०६ घरांची उभारणी सुरू आहे. मात्र, केवनाळे आणि साखर सुतारवाडीतील दरडग्रस्तांना शासनाने वाऱ्यावर सोडले आहे. येथील काही ग्रामस्थ जुन्याच घरात जीव मुठीत घेऊन राहत आहेत, काहींनी शेजारच्या गावात आसरा घेतला असून, काहींनी मुंबई गाठली आहे.

गेल्या आठवड्यात दरडग्रस्तांनी प्रशासनाकडे निवेदन देऊन पुनर्वसनाबाबतची मागणी केली. तीन वर्षे उलटूनही या गावांच्या पुनर्वसनाबाबत शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे आमची घरे कधी बांधून देणार, असा सवाल दरडग्रस्तांकडून उपस्थित होत आहे.

२४ जुलै २०२३ रोजी केवनाळे आणि साखर सुतारवाडी येथील १७२ घरांसाठी ३ कोटी ९५ लाख ६० हजार इतका निधी घरबांधकामास मंजूर केल्याचे परिपत्रक काढले होते. मात्र, वर्ष उलटूनही प्रत्यक्ष घरबांधकामास सुरुवात झाली नाही. मात्र, याठिकाणी शाळा, अंगणवाडी बांधण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. २२ जुलै २०२१ रोजी महाड, पोलादपूर तालुक्यात अतिवृष्टी झाली. यात तळीये, केवनाळे, साखर सुतारवाडी गावांवर दरड कोसळली. या दुर्घटनेत ९८ जणांचा मृत्यू झाला होता.  येथील १७२ कुटुंबांचे पुनर्वसन प्रशासनाकडून केले जाणार होते.

केवनाळे गावची स्थिती 

  • केवनाळे येथील १६३ कुटुंबे आहेत. १२८ घरांचे पुनर्वसन केले जाणार आहे. या कुटुंबांच्या घरासाठी ९ खासगी व्यक्तींची ३.७६.९१ हे. आर. जागा प्रस्तावित आहे. 
  • जागेची पाहणी करून भूवैज्ञानिकांकडून तपासणी करून घेतली आहे. ती पुनर्वसनासाठी योग्य असल्याचा अहवाल दिला आहे. पुनर्वसन जागेचा लेआउट नगररचना विभागाने मंजूर केला आहे.
  • खासगी एजन्सीमार्फत सीमांकनही केले आहे. पुनर्वसन जागेचा ताबा प्रशासनाने घेतला असून, जागामालकांना मोबदलाही दिला आहे. केवनाळे येथील भूसंपादनासाठी ६४ लाख २६ हजार रुपये निधी मंजूर केला होता.

साखर सुतारवाडी गावची स्थिती

  • साखर सुतारवाडी येथे ३८ कुटुंबे आहेत. ४४ घरे बांधली जाणार आहेत. यासाठी २.२७.९० हे. आर. खासगी जागा पुनर्वसनासाठी निश्चित केली आहे.
  • जागा प्रशासनाने ताब्यात घेतली असून, नगररचना विभागाने लेआउट तयार केला आहे. भूसंपादनासाठी ३८ लाख ४१ हजार ७८६ रुपये निधी मंजूर केला होता. 
  • केवनाळे येथील प्रत्येक कुटुंबाला दीड गुंठे, तर सुतारवाडी येथील कुटुंबाला तीन गुंठे जागा दिली जाणार आहे.
टॅग्स :Raigadरायगडalibaugअलिबाग