शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पोलादपूर तालुक्यात भातलावणीच्या कामाला वेग, शेतकरी सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 00:27 IST

विसावलेल्या पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावून सुरुवात केल्यानंतर, शेतामध्ये सर्वत्र आवश्यक तेवढे पाणी असल्याने भातलावणीच्या कामाने वेग घेतला आहे.

पोलादपूर : पोलादपूर तालुक्यात दडी मारलेला पाऊस शनिवारी दमदार कोसळला. त्याच्या आगमनाने बळीराजा सुखावला आहे. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे डोंगरदऱ्यांत शेतामध्ये भातलावणीच्या कामाने वेग घेतला आहे.यंदा जून महिन्यात मान्सूनच्या पावसाने वेळेवर हजेरी लावून भाताचे तरवे लावणीयोग्य झाले असताना मध्यंतरी दडी मारली. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतातुर झाला होता. मात्र, आता विसावलेल्या पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावून सुरुवात केल्यानंतर, शेतामध्ये सर्वत्र आवश्यक तेवढे पाणी असल्याने भातलावणीच्या कामाने वेग घेतला आहे.दरम्यान, तालुक्यात दमदार पावसामुळे कशेडी परिसरातील धामणदेवी, भोगाव, कोंढवी, महालगुर, पळचिल, खडकणे, गोलदरा, कातळी बंगला, दत्तवाडी, मोरेवाडी, तामसडे, देवळे पंचक्रोशी, ढवली, सावित्री आदी परिसरांसह तालुक्यात कामथे खोरा, तुर्भे खोरा, कोतवाल विभाग आदी ठिकाणी भातलावण्यांच्या कामाने वेग घेतला असून, बैलजोडीच्या साह्याने शेतात चिखल करून भातलावणी सुरू केली आहे.पाऊस असाच बरसत राहिला, तर येत्या आठ दिवसांत भातलावणीची कामे पूर्ण होतील, असे जाणकार शेतकºयांनी सांगितले.वाºयाच्या वेगाने ग्रामस्थ भयभीतरेवदंडा : मागील महिन्याच्या ३ तारखेला निसर्ग चक्रीवादळाने चांगलाच तडाखा दिला असल्याच्या ताज्या आठवणी समोर असताना, शनिवारी पावसाचा जोर वाढल्यानंतर काही वेळ सोसाट्याचा वारा सुरू झाल्याने बागायतदार भयभीत झाले. पावसाचा जोर वाढला असून, किनारपट्टीवर पाण्याची पातळी काही प्रमाणात वाढली होती. लाटा उसळी घेत असल्याने किनारपट्टीवर ग्रामस्थ सावध झाले होते.तळा तालुक्यात लावणीला सुरुवाततळा : आषाढी एकादशीपासून पावसाने जोरदार बरसणे सुरू केल्याने बळीराजा सुखावला असून, शेतात पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्याने शेतकºयांनी लावणीला सुरुवात केली आहे. पाण्याअभावी दुबार पेरणीचे संकट बळीराजावर ओढवले होते. शनिवारी जोरदार पावसामुळे शेतात भरपूर प्रमाणात पाणी झाल्याने तळा तालुक्यातील शेतक ºयांनी आपल्या कुटुंबासह शेती लावणीला सुरुवात केली आहे.

टॅग्स :Raigadरायगड