शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पोलिसांनी केला लाखो रुपये किंमतीचा गांजा चरस नष्ट 

By निखिल म्हात्रे | Updated: April 16, 2025 18:29 IST

या गुन्ह्यात जप्त करण्यात आलेले ८ लाखाचे अंमली पदार्थ कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत तळोजा येथे नष्ट करण्यात आले.

निखिल म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग - रायगड जिल्हा पोलीस हद्दीतील कर्जत, नागोठणे, नेरळ, पोयनाड, मांडवा सागरी, रेवदंडा, महाड, वडखळ, गोरेगाव, रसायनी, मुरुड, खोपोली अशा १२ पोलीस ठाण्यांमध्ये एन.डी.पी.एस. अॅक्ट अंतर्गत १५ गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्यात जप्त करण्यात आलेले ८ लाखाचे अंमली पदार्थ कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत तळोजा येथे नष्ट करण्यात आले.

मागील काही दिवसामध्ये पोलिसांनी कारवाईमध्ये जप्त केलेले एकूण ५२ किलो ३९ ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ, त्यामध्ये ५० किलो ९९२ ग्रॅम गांजा आणि १ किलो ४७ ग्रॅम चरस, ज्याची एकूण किंमत ८ लाख, 48 हजार, 18 रुपये इतकी आहे, तो मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमीटेड, तळोजा, नवी मुंबई येथे कायदेशीर प्रक्रिया पार पाडून मंगळवारी (१५ एप्रिल) नष्ट करण्यात आला.

ही कार्यवाही एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ५२ अ (२) नुसार करण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, पोलीस उपअधीक्षक मुख्यालय तथा पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्यासह न्यायवैद्यकीय प्रयोगशाळा, कलीना, मुंबईचे सहायक रासायनिक विश्लेषक अ. स. गावकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ रायगड क्षेत्र अधिकारी डॉ. गजानन खडकीकर, वैद्यमापन शास्त्र, अलिबाग विभाग रायगड निरीक्षक सुरेश देवकाते तसेच दोन शासकीय पंच उपस्थिती होते.

ही कारवाई अंमली पदार्थ विरोधातील धोरणबद्ध प्रयत्नांचे उदाहरण असून, यामुळे जिल्ह्यातील समाजातील सुरक्षितता आणि कायदा व सुव्यवस्था बळकट होण्यास मदत होणार आहे. - सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलिस अधिक्षक.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी