शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
2
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
3
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
4
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
5
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
6
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
7
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
8
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
9
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
10
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
11
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
12
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
13
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
14
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
15
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
16
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
17
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
18
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
19
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
20
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात

मान्सूनपूर्व कौलारू घरे छावणीला आला वेग

By निखिल म्हात्रे | Published: June 03, 2024 9:43 AM

ग्रामीण भागात आजही चंद्रमौळी कौलारू घरांचे अस्तित्व कायम टिकून आहे.

निखिल म्हात्रे, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग - मानवाच्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांपैकी निवारा ही गरज अतिशय महत्त्वाची आहे. बदलत्या काळानुसार सिमेंट, काँक्रिटची छत असलेली पक्की घरे भरपूर प्रमाणात पाहायला मिळतात. मात्र, ग्रामीण भागात आजही चंद्रमौळी कौलारू घरांचे अस्तित्व कायम टिकून आहे.

जिल्ह्यात पावसाला सुरु होताच कौलारू घरांचे छत छावणीला वेग आला आहे. ग्रामीण भागात पूर्वी कुडा-मातीच्या भिंती व त्यावर गवताचे किंवा कवेलूचे छत असलेली घरे मोठ्या प्रमाणात दिसायची. मात्र, आधुनिकीकरणामुळे दिवसेंदिवस काळ बदलत गेला. हळूहळू मातीच्या घरांऐवजी सिमेंट काँक्रिटचे छत असलेली पक्की घरे बांधण्याकडे नागरिक वळू लागले. गावखेड्यात माकडांचा उच्छाद असतो. त्यामुळे माकडे कौलारू घरांच्या छताचे नुकसान करीत असतात. त्यासाठी मान्सूनपूर्व छत दुरुस्ती करणे गरजेचे असते.

उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तिन्ही ऋतूत कवेलूची छत असलेली घरे आल्हाददायक असतात. छत दुरुस्ती करताना जुने मोडकळीस आलेले लाकूड फाटे बदलणे, पावसाळ्यात पावसाचे पाणी घराच्या छतातून टपकून घरात शिरू नये, यासाठी तुटफूट झालेली कवेलू बदलून त्याऐवजी नवीन कवेलू बसविणे, अशी दुरुस्ती कामे करावी लागतात. त्यासाठी दरवर्षी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. सध्या सिमेंटची पक्की घरे बांधकामाच्या साहित्याच्या किमती गगनाला भिडल्याने आपली कवेलूची छत असलेली झोपडीच बरी, असे म्हणण्याची वेळ आली आहे.घरांची संख्या अधिक - 

ग्रामीण भागात कौलारु घरांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. शहर सारख्या ठिकाणी सिमेंटी घरांची बांधणी मोठ्या प्रमाणात असते. तर कौलारु घरे थंड असतात. त्यामानाने सिमेंटचे बांधकाम असल्यामुळे उष्णता अधिक जाणवते. त्यामुळे ग्रामीण भागात आजही कौलारु घरांची संख्या अधिक दिसून येते.

टॅग्स :alibaugअलिबागmonsoonमोसमी पाऊस