शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

आरसीएफ विरोधात प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन

By admin | Published: August 24, 2015 2:33 AM

आरसीएफ प्रशासनाने गेली ३० वर्षे १४२ प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीच्या प्रश्नांचे घोंगडे भिजत ठेवले आहे. कंपनीचे विस्तारीकरण न झाल्याने प्रश्न

अलिबाग : आरसीएफ प्रशासनाने गेली ३० वर्षे १४२ प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीच्या प्रश्नांचे घोंगडे भिजत ठेवले आहे. कंपनीचे विस्तारीकरण न झाल्याने प्रश्न अजून गंभीर बनला आहे. आरसीएफ प्रशासन आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारपासून प्रकल्पग्रस्तांनी कंपनीसमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. जमीन नाही आणि नोकरीही नाही अशी अवस्था प्रकल्पग्रस्तांची झाली आहे. अलिबाग तालुक्यातील बोरीस, गुंजीस, थळ, वायशेत अशा सुमारे १२ गावांतील शेतकऱ्यांनी आपापल्या जमिनी थळ प्रकल्पासाठी दिल्या होत्या. यातील १४२ प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आजही कायम आहेत. मागण्यांसाठी त्यांनी वेळोवेळी उपोषण, मोर्चे आंदोलने केली. त्यांच्या आंदोलनाला विविध राजकीय पक्षांनी स्वत:च्या स्वार्थापुरता पाठिंबाही दिला मात्र प्रश्न काही सोडविले नाहीत, अशी धारणा प्रकल्पग्रस्तांची झाली आहे. खासदार तथा अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांच्या अध्यक्षतेखाली आरसीएफ प्रशासनासोबत बैठक झाली होती. त्या बैठकीत प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्याचा निर्णय झाला होता, तरीही कंपनीने तो निर्णय धाब्यावर बसविला. हे प्रकरण न्यायालयात गेल्यावर कंपनीच्या विस्तारीकरणानंतर प्रकल्पग्रस्तांना सामावून घेतले जाईल, असे आश्वासन आरसीएफ प्रशासनाने दिले होते. प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याचे सुनील सप्रे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)