शहरं
Join us  
Trending Stories
1
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
3
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
4
रतन टाटा यांचे कलाटणी देणारे धाडसी निर्णय; जेएलआरचे अधिग्रहण ते एअर इंडियाची घरवापसी
5
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
6
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
7
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
8
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
9
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध
10
‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; १ हजार कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती
11
विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग्ज हटवा; उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश
12
धनगर ऐवजी धनगड वाचावे, शुद्धीपत्रक एका रात्रीत रद्द; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
13
अक्षय शिंदेसाठी ‘ते’च वाहन का निवडले? पोलिस चकमकप्रकरणी सीआयडीचा पोलिसांना सवाल
14
चीनने आपल्या ताकदीचा वापर शांततेसाठी करावा: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते
15
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
16
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
17
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
18
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
19
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
20
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?

पुणे - कामाख्या गाडीचा कर्जतला थांबा द्या

By admin | Published: September 13, 2016 2:38 AM

नवरात्री आणि दसऱ्या निमित्त बाहेरी गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने पनवेलमार्गे पुणे ते कामाख्या दरम्यान स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला

कर्जत : नवरात्री आणि दसऱ्या निमित्त बाहेरी गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने पनवेलमार्गे पुणे ते कामाख्या दरम्यान स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला. यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची सोय केली परंतु या गाडीला कर्जतला थांबा न देऊन मध्य रेल्वे प्रशासन कर्जतकरांवर अन्याय करीत असल्याचा आरोप कर्जत रेल्वे प्रवासी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या विशेष गाडीचा कर्जतला थांबा देण्यात आला होता तसाच थांबा या गाडीला देण्यात यावा अशी कर्जतकर प्रवाशांची इच्छा आहे. ही गाडी ६ आॅक्टोबर पासून सुरू करण्यात येणार आहे. कर्जतला थांबा मिळण्यासाठी खासदारांनी रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची व वेळ पडल्यास रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन या गाडीचा व या पुढे प्रत्येक गाडीचा, जाता - येता, कर्जतला थांबा असावा हे किती आवश्यक आहे? ते रेल्वे प्रशासनास पटवून द्यावे व प्रत्येक गाडीचा कर्जतला थांबा मिळवून घ्यावा अशी विनंती कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे पंकज ओसवाल यांनी केली आहे. या गाडीच्या अप आणि डाऊन मार्गावर प्रत्येकी ७ -७ फे ऱ्या चालविण्यात येणार आहेत. ही गाडी ६ आॅक्टोबर ते १७ नोव्हेंबर दरम्यान दर गुरूवारी पुण्याहून सकाळी १० वाजून ३० मिनीटांनी सुटणार असून कामाक्याला तिसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी दुपारी ३ वाजून २५ मिनीटांनी पोहचणार आहे. परतीच्या प्रवासासाठी ८२५०६ कामाख्या -पुणे सुविधा स्पेशल ट्रेन ३ सप्टेंबरपासून सुरु असून १४ नोव्हेंबरपर्यंत दर सोमवारी रात्री १२ वाजता सुटणार आहे. तिसऱ्या दिवशी पनवेलला रात्री ११.३५ मिनीटांनी पोहचणार आहे. चौथ्या दिवशी म्हणजे गुरूवारी मध्यरात्री २ वाजून ४५ मिनीटानी पुण्याला पोहोचणार आहे. या गाडीचा पनवेल, नाशिक रोड, भुसावळ, नागपूर , गोंदिया, दूर्ग, रायपूर, बिलासपूर, झारखंड, रूरकेला, चक्र धर, आसनसोल, मालदा, किसनगंज या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.