शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

Raigad: मुसळधार पावसामुळे उरणमधील अनेक रस्ते पाण्याखाली,अनेक गावात, घरात पावसाचे पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 11:39 AM

Raigad Rain Update: मागील पाच सहा दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे चिरनेरला पुराच्या पाण्याने वेढले असुन पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.पावसाचे पाणी गावातील अनेक नागरिकांच्या घरात शिरले आहे.

- मधुकर ठाकूरउरण -  मागील पाच सहा दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे चिरनेरला पुराच्या पाण्याने वेढले असुन पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.पावसाचे पाणी गावातील अनेक नागरिकांच्या घरात शिरले आहे. उरण परिसरात मागील पाच -सहा दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे.कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे विंधणे-दिघोडे,वशेणी-दिघाटी-केळवणे, नवघर फाटा- जेएनपीए वसाहत,केगाव-विनायक, कोप्रोली-खारपाडा, कंठवली - वेश्वी,जासई -गव्हाणफाटा  आदी रस्ते जलमय झाले आहेत. परिणामी या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

चिरनेर गावात पाणी शिरल्याने गावाला पुराचा वेढा पडला आहे.सुमारे ३५०-४०० घरात पुराचे पाणी शिरल्याने रहिवाशांना रात्र जागुन काढावी लागली आहे. उरण शहरातील कुंभारवाडा , इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय, गणपती चौक, पालवी,आपला बाजार परिसरातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

तालुक्यातील नवघर,पागोटे, जेएनपीए कामगार वसाहत,करळ-सोनारी, जसखार,नागाव,म्हातवली, केगाव,भेंडखळ,मोठीजुई आदी अनेक गावात पावसाचे पाणी शिरले आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे उरण परिसरातील अनेक कंटेनर यार्डही पाण्याखाली गेले आहेत. कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे जेएनपीए बंदराकडे ये-जा करणाऱ्या कंटेनर मालाच्या वाहतूकीवरही विपरीत परिणाम झाला आहे.कंटेनर मालाची वाहतूक मंदावली असल्याची माहिती उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भाटे यांनी दिली.

चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत. मुसळधार पावसामुळे मात्र उरण परिसरातील नागरिकांचे जनजीवन पार विस्कळीत झाले आहे. उरण परिसरातील शाळा महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आली आहेत.अनेक ठिकाणच्या गावातील मंगळवारी रात्रीपासून बत्ती गुल झाली आहे.बुधवारी सकाळपर्यंत तरी वीजेचा थांगपत्ता नाही.त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली आहे.

उरण तालुक्यात मंगळवारपासुन बुधवारी  सकाळपर्यंत अवघ्या २४ तासात १६५ मिमी  पावसाची नोंद झाली आहे. चिरनेर,जासई, जसखार,कंठवली,वैश्विक,विंधणे आदी गावातील अनेक घरात पावसाच्या पुराचे पाणी शिरले आहे. काही मार्गावरील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे धोकादायक ठरू पाहाणारे रस्ते तुर्तास वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.पावसाचा जोर वाढत चालला आहे. त्यामुळे पुरसदृश्य गावातील नागरिकांच्या नुकसानीचा आढावा घेऊन पंचनामे करण्यासाठी मंडळ अधिकारी,तलाठी, कोतवाल , ग्रामसेवक तैनात करण्यात आले आहेत.सद्यस्थितीत वित्तहानी वगळता कुठेही जीवितहानी झालेली नाही.पुरसदृश स्थीतीकडे प्रशासन  बारकाईने लक्ष ठेवून असल्याची माहिती उरण तहसीलदार उध्दव कदम  यांनी दिली.

टॅग्स :RainपाऊसRaigadरायगड