शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

Irshalwadi Raigad News आई, बाबा, भाऊ नाय...कोण नाय राहिला: इर्शाळवाडी दुर्घटनेतील पीडितांचा आक्रोश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 10:33 AM

Raigad Irshalwadi Landslide: रात्री ११ वाजता ही घटना घडल्यानंतर जवळपासच्या गावातील तरूण मदतीसाठी धावले.

रायगड – खालापूरनजीक इर्शाळवाडीवर रात्री दु:खाचा डोंगर कोसळला, सततच्या अतिवृष्टीमुळे या परिसरात दरड कोसळली आणि त्यात ४०-५० घरे ढिगाऱ्याखाली गाडले गेले. २५० लोकांची वस्ती असलेल्या या भागात सुमारे १०० हून अधिक लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे राज्यभरात हळहळ व्यक्त होत आहे. रात्रीपासून याठिकाणी मदत कार्य सुरू आहे. NDRF ची टीम मलब्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेत आहे.

या घटनेनंतर पीडितांचा आक्रोश पाहायला मिळत आहे. आई, बाबा, भाऊ कोण नाय राहिला म्हणत महिलेने हंबरडा फोडला. अनेकांच्या डोळ्यात अश्रू आहेत. बेपत्ता नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी याठिकाणी लोकांनी गर्दी केली आहे. नणंद, पोरगं कुणीच उरले नाही. इर्शाळवाडीतील या दुर्घटनेत ५ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर बचाव पथकाला ८० जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. दुर्घटनेतील जखमींवर नवी मुंबईच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रात्री ११ वाजता ही घटना घडल्यानंतर जवळपासच्या गावातील तरूण मदतीसाठी धावले. रसायनी येथील काही तरूणांनी घटनास्थळी धाव घेतली. या वस्तीपर्यंत जाण्यासाठी खूप कठीण रस्ता आहे. जवळपास २ तास वरती पोहचायला लागले. आम्ही मदतीसाठी वर पोहचताना माझ्यासमोर बेलापूर येथील अग्निशमन दलातील एक कर्मचारी वाटेतच कोसळले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. याठिकाणी ५०-६० घरांची वस्ती आहे. आम्ही इथं ट्रेकला यायचो. आता याठिकाणी केवळ १०-१२ घरे उरल्याची दिसून येते. बाकी काहीच दिसत नाही असं मदतीसाठी आलेल्या तरूणांनी म्हटलं.

दरम्यान, सुरुवातीला आम्ही एका लहान मुलाला बाहेर काढला. NDRF ची टीम पोहचल्यानंतर आम्ही त्यांना मदत केली. मंदिरात ५ लहान मुले मोबाईलवर खेळत होती. त्यांनी काही जणांना फोन करून घटनेची माहिती दिली. ५० फूटाचा गाळ याठिकाणी तयार झाला आहे. ही घरे १० फूट गाळात अडकली असावी अशी विदारक स्थिती वरती आहेत. जी घरे शिल्लक आहेत त्यात अनेकांची पडझड झालेली आहे. डोंगरदऱ्यात ही दुर्घटना झाल्याने शोधपथकाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे.

 

टॅग्स :Raigad Irshalwadi Landslide Incidentरायगड इर्शाळवाडी दुर्घटना प्रकरण