शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

रायगडमध्ये मागील निवडणुकीच्या तुलनेत टक्का घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 00:21 IST

तुरळक घटना वगळता मतदान शांततेत; १६ उमेदवारांचे भवितव्य मशिनबंद

अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघात संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ५८.०६ टक्के मतदान झाले आहे. अंतिम मतदान ६० टक्केपर्यंत होईल असा अंदाज रायगड लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे. २०१४ साली लोकसभेसाठी ६४.५७ टक्के मतदान झाले होते. आता २०१९ मध्ये सुमारे ६० टक्के मतदान झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यानुसार गेल्या वेळच्या तुलनेत चार टक्क्यांनी मतदानाची आकडेवारी घसरली आहे. अद्यापही उशिरापर्यंत काही मतदान केंद्रावर मतदान सुरू असल्याने ही आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे. सेना-भाजप युतीचे उमेदवार अनंत गीते आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शेकाप आघाडीचे सुनील तटकरे यांच्यासह एकूण १६ उमेदवारांचे भवितव्य मशिनबंद झाले आहे.अलिबाग विधानसभा मतदारसंघातील मतदान संध्याकाळी ६ वाजता संपले आणि अंतिम मतदान ६२.२३ टक्के झाले आहे. दरम्यान संध्याकाळी ६नंतर पेण, श्रीवर्धन, महाड, दापोली आणि गुहागर येथे मतदान सुरू होते, ते पूर्ण झाल्यावर अंतिम मतदान आकडेवारी उपलब्ध होऊ शकेल, असे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. संध्याकाळी ५वाजेपर्यंत रायगड लोकसभा मतदारसंघात एकूण ५३.१५ टक्के मतदान झाले. यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघांपैकी अलिबाग विधानसभा मतदारसंघात ६२.२३ टक्के मतदान पूर्ण झाले आहे. रायगडमध्ये निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी १५६ पोलीस अधिकाऱ्यांसह ८०० होमगार्ड व ९० दंगा प्रतिबंध दल, सीआरपीएफ, एसआरपीएफ दलाच्या जवानांचा बंदोबस्त होता.दापोलीमध्ये महिला मतदार आघाडीवररायगड लोकसभा मतदारसंघातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदारसंघात २ लाख ७९ हजार २३८ पैकी ५४.१० टक्के म्हणजे १ लाख ५१ हजार ७३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.गुहागर विधानसभा मतदारसंघात २ लाख ३९ हजार ४१५ पैकी ५२.३२ टक्के म्हणजे १ लाख २५ हजार २५४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.रायगड लोकसभा मतदारसंघातील एकूण १६ लाख ५१ हजार ५६० मतदारांपैकी ४ लाख ४१ हजार ७३६ पुरुष तर ४ लाख ३६ हजार ६० महिला अशा ५३.१५ टक्के म्हणजे ८ लाख ७७ हजार ७९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.रोह्यात मतदारांना पैसे वाटणाऱ्यांना पिटाळलेरोहा : रायगड लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी रोह्यात धिम्या गतीने मतदान झाले. परिणामी, मतदानाचा टक्का घसरला. यंदा लोकसभा निवडणुकीत प्रथमच मतदारांना आमिषे दाखवत पैसे वाटण्याचे प्रकार घडले. रोहा शहरात तर ठिकठिकाणी हे प्रकार घडले. उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड आणि पोलीस निरीक्षक परदेशी यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. परिणामी, रोहा पोलीस आणि निवडणूक भरारी पथकाने अनेक ठिकाणी गस्त देत मतदारांना पैसे वाटण्यासाठी गेलेल्यांना पिटाळून लावले.अधिकृत आकडेवारी आली नसली, तरी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अंदाजे ५२.७८ टक्के मतदान श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात झाले आहे. सकाळपासून लोकांनी मतदानासाठी रांगा लावल्याचे चित्र होते. केंद्र ठिकाणी महिला वपुरु षांना मिळून एकच बूथ असल्याने मतदानासाठी विलंब होत होता. त्यामुळे नेहरूनगर शाळा क्र मांक आठ येथे मतदारांनी संबंधित अधिकाºयांकडे दुपारी नाराजी व्यक्त केली.महाडमध्ये वादावादीच्या किरकोळ घटनामहाड : महाड शहरात एकूण २३ मतदान केंद्रांवर सरासरी ५८ टक्के मतदान झाले. शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी मतदान केंद्राबाहेर शिवसेना-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वादावादीच्या किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत पार पडले. अनेक ठिकाणी सकाळपासूनच सर्व मतदान केंद्रांवर मतदारांची मोठी गर्दी दिसून आली. मुस्लीमबहुल भागातील मतदान केंद्रांवर मुस्लीम मतदारांचा चांगला उत्साह असल्याचे दिसून आले. कुठलाही गैरप्रकार वा अनुचित घटना घडू नये, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात होता. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019raigad-pcरायगड