शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
3
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
4
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
5
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
6
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
7
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
8
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
9
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
10
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
11
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  
12
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
15
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
16
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
17
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
18
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
19
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
20
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!

Raigad: पाण्याची चिंता मिटली; १३ धरणे शंभर टक्के भरली, सर्व धरणांत ७४.७६ टक्के पाणीसाठा

By निखिल म्हात्रे | Published: July 11, 2024 3:04 PM

Raigad News: रविवारी मध्यरात्री व सोमवारी दिवसभर रायगड जिल्ह्यात सरासरी १०८ मिमी पाऊस झाला आहे. हा पाऊस हा प्राधान्याने धरण क्षेत्रात अधिक पडल्याने धरणांतील पाणीसाठा झपाट्याने वाढला आहे. २८ धरणांपैकी १३ धरणे ही शंभर टक्के भरली आहेत.

- निखिल म्हात्रेअलिबाग _ रविवारी मध्यरात्री व सोमवारी दिवसभर रायगड जिल्ह्यात सरासरी १०८ मिमी पाऊस झाला आहे. हा पाऊस हा प्राधान्याने धरण क्षेत्रात अधिक पडल्याने धरणांतील पाणीसाठा झपाट्याने वाढला आहे. २८ धरणांपैकी १३ धरणे ही शंभर टक्के भरली असून, सर्व धरणांत मिळून ७४.७६ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे धरणावर अवलंबून असणाऱ्यांची पाण्याची चिंता मिटली आहे.

तेरा धरणे भरली असून, दोन धरणांत ९० टक्के पाणीसाठा आहे. तेरा धरणांमध्ये ७० टक्क्यांहून कमी पाणीसाठा आहे. रायगड २० दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाने सुरुवात चांगली केली होती. त्यानंतर काही काळ विश्रांती घेतली होती. मात्र, रविवारी मध्यरात्री अलिबाग, मुरुड, म्हसळा, तळा, श्रीवर्धन या तालुक्यांत अतिवृष्टी झाली. ९ जुलैपर्यंत जिल्ह्यात एकूण तीन हजार ८९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सरासरी ३५ टक्के पाऊस पडला आहे. धरण क्षेत्रातही पावसाचे प्रमाण चांगले आहे.

शंभर टक्के पाणीसाठारायगड पाटबंधारे विभाग कोलाड यांच्याअंतर्गत २८ लहान धरणे येतात. त्यापैकी तळा तालुक्यातील वावा, सुतारवाडीमधील रोहा, सुधागडमधील कोंडगाव, कवेळे, उन्हेरे, म्हसळामधील पाबरे, संदेरी, महाडमधील वरंध, खिंडवाडी, कोथुर्डे, खैरे, खालापूर भिलवले, पनवेलमधील मोरबे ही तेरा धरणे शंभर टक्के भरली आहेत. मुरुड तालुक्यातील फणसाड ९९ टक्के, पनवेलमधील उसरण ९० टक्के भरले आहे. श्रीवर्धनमधील कुडकी ८३ टक्के, पेणमधील अंबेघर ८० टक्के भरले.

टॅग्स :RaigadरायगडWaterपाणी