शहरं
Join us  
Trending Stories
1
'शिवसेनेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळाली', ठाकरेंचा नेता मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलला?
2
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
3
अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला; 'मातोश्री'वर २ तास बैठक, काय घडलं?
4
'...ही चूक पुन्हा झाल्यास कठोर कारवाई होणार'; Suzlon Energy ला BSE, NSE चा इशारा
5
स्वत:च शिवली वर्दी, पैशांबाबत बोलला खोटं; २ लाखांत IPS झालेल्या मिथिलेशच्या कहाणीत नवा ट्विस्ट
6
गोविंदाला गोळी लागल्यानंतर रात्री उशिरा कृष्णा अभिषेकची सोशल मीडिया पोस्ट; म्हणाला, 'मामा...'
7
Video - संतापजनक! फी न भरल्याची तालिबानी शिक्षा; शाळेतून काढून टाकलं, उन्हात बसवलं अन्...
8
"PM मोदींचा फोन आला, पण 'त्या' अटींमुळे बोलले नाही"; विनेश फोगटचा खुलासा
9
नवरात्रोत्सव का साजरा करतात? नवरात्रात नेमके काय करावे? वाचा, प्राचीन लोकोत्सवाचे महात्म्य
10
युद्ध पेटलं! इराणचा इस्त्रालयवर मिसाईल हल्ला; अमेरिकन सैन्यानं दिलं चोख उत्तर
11
कथोरे, आव्हाड, केळकर यांची प्रश्नांची सरबत्ती; चौदाव्या विधानसभेत आघाडीवर; नाईक, जैन तळाशी
12
नवरात्र: भक्तांसाठी स्वामींनी घेतले गृहलक्ष्मीचे रुप; अन्नपूर्णा होऊन दर्शन दिले, खाऊही घातले
13
Navratri 2024: मंचकी निद्रा संपवून सिंहारूढ होण्यासाठी आई तुळजाभवानी झाली सज्ज!
14
अनिल अंबानींचं नशीब पालटलं, 'अच्छे दिन'ची सुरुवात? आता ₹२९३० कोटींचा फंड उभारायला मंजुरी
15
हरियाणा निवडणुकीदरम्यान राम रहीम तुरुंगातून बाहेर; २० दिवस बागपत आश्रमात राहणार
16
"२०२४ मध्ये जिंकू शकत नाही मान्य केल्यामुळे..."; अमित शाहांच्या 'त्या' विधानावर काँग्रेसचा पलटवार
17
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
18
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
19
बिग बॉस ओटीटी फेम अदनान शेखने मराठी मुलीशी केलं लग्न, पत्नीने लग्नानंतर बदलला धर्म?

रंग दे महाराष्ट्र अभियानाअंतर्गत रंगल्या शाळांच्या भिंती, जिल्हाधिकारी बनले चित्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2018 7:59 PM

मुख्यमंत्र्यी देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून रायगड जिल्ह्यात ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियान राबवण्यात येत आहे. मात्र  सामाजिक परिवर्तन घडवून प्रगती साधायची असेल तर गावात एकोपा असणे आवश्यक आहे.

जयंत धुळप

रायगड - मुख्यमंत्र्यी देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून रायगड जिल्ह्यात ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियान राबवण्यात येत आहे. मात्र  सामाजिक परिवर्तन घडवून प्रगती साधायची असेल तर गावात एकोपा असणे आवश्यक आहे. गाव एक झालं तर काहीही साध्य करता येवू शकते. सामाजिक एकोपा हीच खरी परिवर्तनाची गुरु किल्ली आहे , असा विश्वास रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शनिवारी (28 एप्रिल) माणगांव तालुक्यांतील मुठवली गावांतील ग्रामस्थांमध्ये जागविला आहे. यावेळी ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सुब्रह्मण्यम तसेच वरिष्ठ अधिकार्यांचे पथक उपस्थित होते.

अधिकाऱ्यांच्या संवादाने भारावले ग्रामस्थ

ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत निवडलेल्या जिल्ह्यातील निवडक गावातील कामांची पाहणी करु न ग्रामस्थांशी चर्चा या पथकाने केली. सकाळी मुठवली ग्रामस्थांशी सर्व अधिकार्यांनी संवाद साधला,आणि ग्रामस्थ भारवून गेले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्यासह जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, प्रांताधिकारी ए.आर.देगावकर, तहसिलदार उर्मिला पाटील, गटविकास अधिकारी खेडकर,उपविभागीय कृषि अधिकारी येवले तसेच स्वदेस फाऊंडेशचे तुषार ईनामदार, ग्राम सामाजिक परिवर्तक लहू दोलताडे यांच्यासह ग्रामस्थ महिला, पुरु ष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गाव करी ते राव न करी

जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी व मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रह्मण्यम यांनी गावात विविध उद्योग व्यवसाय करणार्या कुटूंबांना प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी व विचारपूस केली. यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधतांना डॉ. सूर्यवंशी म्हणाले की,  गाव करी ते राव न करी अशी एक म्हण आहे. त्याप्रमाणोच गावाने एकत्न येऊन ठरवावे,त्यांना हवा तो विकास ते करु  शकतात. त्यासाठी शासनाची यंत्रणा नेहमी त्यांना सहयोग करेल. गावच्या शाळेचा विकास करा. त्यासाठी ग्रामस्थांनी योगदान द्या. हे योगदान आपल्या मुलांच्या विकासासाठी आज केलेली मोठी गुंतवणूक ठरेल. गावकऱ्यांनी मिळून गावात नियमत स्वच्छता अभियान राबवावे,जेणे करु न स्वच्छतेची सवय मुलांच्या अंगी बाणावेल.

गावकरी आणि शासन एकत्र, विकासाचे नवे मॉडेल

ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सुब्रह्मण्यम यांनी  गावकऱ्यांनी ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियान हे गावकरी आणि शासन  यांनी एकत्न येऊन तयार केलेले विकासाचे नवे मॉडेल ठरावे व त्याची सुरु वात रायगड जिल्ह्यात व्हावी, असे चांगले काम करावे , असे आवाहन केले.

आणि जिल्हाधिकारी बनले चित्रकार

ग्रामस्थांशी संवाद साधल्यानंतर उपस्थित मान्यवरांनी गावातील जि.प. शाळेच्या रंगकामात सहभाग दिला. यावेळी शाळेच्या भिंती रंगवण्यासाठी  मोठ्या प्रमाणावर सेवाभावी कार्यकर्त व जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे विद्यार्थी गावात आले होते. त्यांच्या मदतीने शाळेचे रंगकाम सुरु  होते.  रंग दे महाराष्ट्र  या अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील मुठवली येथील शाळेच्या भिंती आज रंगल्या. हे रंगकाम एरवीच्या रंगकामापेक्षा वेगळे होते. शालेय विद्यार्थ्यांना अधिक आकलन व्हावे यासाठी या भिंतींवर शैक्षणकि चित्ने चितारण्यात आली. या अभियानात  स्वत: जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी आणि ग्रामिण सामाजिक परिवर्तन अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सुब्रह्मण्यम हे ही सहभागी झाले होते. दुपारनंतर या पथकाने सुधागड तालुक्यांतील महागाव व नवघर या गावातील कामांची पाहणी करु न ग्रामस्थांशी संवादही साधला.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस