शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live: रतन टाटांचे पार्थिव वरळीच्या स्मशानभूमीत दाखल, थोड्या वेळात अंत्यसंस्कार
2
मदरश्यांमधील शिक्षकांच्या मानधनात वाढ, खासगी विद्यापीठांना मंजुरी, राज्य मंत्रिमंडळात निर्णयांचा धडाका
3
"रतन टाटांसारख्या व्यक्तीला खरं तर हयात असतानाच 'भारतरत्न'ने सन्मानित करायला हवं होतं"
4
"या पराभवाला खूप गंभीरपणे..."; हरयाणा विधानसभा निकालावर अशोक गेहलोत यांचं मोठं विधान
5
२० वर्षांपासून असलेल्या नोकराने घात केला; भाजपा मंत्र्याच्या ५० लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला
6
PAK vs ENG : मुल्तानमध्ये इंग्लंड 'सुल्तान'! ऐतिहासिक आकडा अन् विश्वविक्रम; भारताचा विक्रम मोडला
7
रिस्क घ्यायची नसेल तर 'या' सरकारी स्कीममध्ये गुंतवा पैसा; रिटायरमेंटपर्यंत व्हाल २,२६,९७,८५७ रुपयांचे मालक
8
इंग्लंड-पाक नव्हे भारत-श्रीलंका लढतीत सेट झालाय कसोटीतील सर्वोच्च धावसंख्येचा वर्ल्ड रेकॉर्ड
9
रतन टाटांसह त्यांच्या भावानेही लग्न केले नाही; सावत्र भाऊ सांभाळतो व्यवसाय, कुटुंबात कोण..?
10
Dussehra 2024: दसर्‍याला आठवणीने करा 'हे' एक काम; वास्तुमध्ये सदैव राहील सुख, संपत्ती, समाधान!
11
PAK vs ENG Live : इंग्लंड ७ बाद ८२३! पाकिस्तानी चाहत्यांना वेदना देणारी 'कसोटी', हॅरी ब्रूकच्या ३१७ धावा
12
एक पंखा, दोन बल्ब आणि टीव्ही..., विजेचं बिल आलं १.९ लाख रुपये, त्रस्त युवकानं उचललं टोकाचं पाऊल  
13
टाटांची जादू : टाटांच्या 'या' शेअरनं १ लाखांचे केले ₹३५ कोटी; गुंतवणूकदार झाले कोट्यधीश
14
सर्वाधिक १० श्रीमंत उमेदवारांमध्ये ७ पुरुष, ३ महिला; सर्व पुरुष हरले, महिला जिंकल्या
15
Riyan Parag ची नौटंकी; अजब-गजब ॲक्शन अन् पंचांकडून थेट कारवाईची रिॲक्शन (VIDEO)
16
Jio नव्हे, रतन टाटांनी दूरसंचार क्षेत्र बदलले; कॉलसह इंटरनेट स्वस्त केले
17
कार नको, सायकल वापर... ऐकताच चालत गेले; जर त्याच क्षणी मनावर ताबा ठेवला नसता तर 'रतन टाटा' बनले नसते
18
भारत बनवणार अण्वस्त्रांनी सुसज्ज दोन पाणबुड्या! केंद्राची ४० हजार कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी
19
एक लाखाचं बक्षीस… विकत होता भंगार; भारतात परतताच जावेदला दिल्ली विमानतळावर अटक!
20
भयंकर! बायकोला मिळालेल्या योजनेच्या पैशातून नवरा प्यायला दारू अन् उचललं टोकाचं पाऊल

महाड दुर्घटनेतील एसटी बसचे अवशेष सापडले

By admin | Published: August 06, 2016 12:30 PM

सावित्री नदीतील शोधकार्याच्या चौथ्या दिवशी एसटी बसचे अवशेष हाती लागले आहेत. घटनास्थळापासून 3 किमी अंतरावर विसावा हॉटेलजवळ एसटीचे अवशेष सापडले आहेत

ऑनलाइन लोकमत - 
महाड, दि. 6 - सावित्री नदीतील शोधकार्याच्या चौथ्या दिवशी एसटी बसचे अवशेष हाती लागले आहेत. घटनास्थळापासून तीन किमी अंतरावर विसावा हॉटेलजवळ एसटीचे अवशेष सापडले आहेत. पुल पडल्यानंतर एसटी बस वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर शोधकार्य सुरु करण्यात आलं होतं, मात्र एसटी बसचा काहीच पत्ता लागत नव्हता. अखेर चौथ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी बसचे काही अवशेष सापडले आहेत. 
 
मंगळवारी रात्री म्हणजे 2 ऑगस्ट रोजी ११.३०च्या सुमारास महाड-पोलादपुरला जोडणारा सावित्री नदीवरील जुना ब्रिटीशकालीन पूल कोसळला. यावेळी पुलावर असलेल्या दोन एसटी बससह काही वाहने वाहून गेली असल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. 
 
एसटीची रत्नागिरी आगाराची जयगड- मुंबई आणि राजापूर आगाराची राजापूर- बोरिवली या दोन बस चिपळूण बसस्थानकातून मंगळवारी रात्री सव्वानऊ वाजता सुटल्या होत्या. चिपळूणमध्ये या दोन्ही बसचे चालक- वाहक बदलून चिपळूण आगाराचे कर्मचारी देण्यात आले. महाड बसस्थानकावर या बस रात्री बारा वाजता पोचणे अपेक्षित होते. मात्र, त्या पोचल्या नाहीत. त्यामुळे या दोन्ही बस पुलावरून कोसळून नदीत बुडाल्याच्या शक्‍यतेने खळबळ उडाली होती.
 
दरम्यान  शनिवारी शोधकार्य सुरु केलं असता दोन मृतदेह सापडले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा 24 वर पोहोचला आहे. गुरुवारी म्हणजेच दुर्घटनेच्या दुस-या दिवशी एकूण १४ मृतदेह हाती लागले होते. तर शुक्रवारी 8 मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळालं होतं. मृतांचा आकडा 22 वर पोहोचला असून आज तो वाढण्याची शक्यता आहे. कालपासून सुरु असलेल्या पावसामुळे आजही शोधकार्यात अडथळे येत आहेत. 
 

शनिवारी सकाळी शोधकार्य सुरु केल्यावर म्हाप्रळच्या खाडीत मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह तवेरा गाडीतून प्रवास करणाऱ्या दिनेश कांबळी यांचा असल्याची माहिती मिळाली आहे. आतापर्यंत एकूण 24 मृतदेह आतापर्यंत सापडले आहेत. एका कारचे अवशेषही शुक्रवारी नौदल आणि एनडीआरएफच्या हाती लागले होते. गाडीचे अवशेष तवेरा कारचे असल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र, अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या कारसोबत एक चटई आणि इतर सामानही हाती लागलं आहे.

गुरुवारी महाड पट्ट्यात आणि समुद्र किना-यांवर दुर्घटनाग्रस्तांचे मृतदेह सापडले होते. तर शुक्रवारी  केंबुर्ली, वावे, गोरेगाव, दादली खाडीपर्यंत वाहून गेलेले मृतदेह सापडले. नदीच्या जोरदार प्रवाहामुळे इतर बेपत्ता व्यक्ती कदाचित समुद्रापर्यंत वाहत गेल्या असाव्यात, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
 
(महाड पूल दुर्घटना - लोकमतने ३ वर्षांपूर्वीच दिला होता इशारा)
 
महाड-पोलादपूरला जोडणा-या या पुलाच्या दुरावस्थेकडे लोकमतने तीनवर्षापूर्वीच लक्ष वेधले होते. नडगाव-राजेवाडी दरम्यानचा हा ब्रिटीशकालीन पूल अखेरची घटका मोजत असून, हा पूल धोकादायक बनला आहे असे वृत्त लोकमतने ३ सप्टेंबर २०१३ च्या हॅलो रायगड पुरवणीत दिले होते.  
(महाड दुर्घटनेतील कांबळे यांच्यावर अंत्यसंस्कार)
 
राष्ट्रीय महामार्ग विभागाचे त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे वृत्त लोकमतने दिले होते. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ वरील या पुलाची मुदत संपल्याचे ब्रिटीश एजन्सीने संबंधित यंत्रणेला सूचित केल्याच्या वृत्ताला त्यावेळी संबंधिक अधिका-यांनी दुजोरा दिला होता. पुलाच्या दगडी बांधकामामध्ये पिंपळाच्या झाडाचे साम्राज्य पसरले होते.