शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

चाकरमान्यांनो, गणपतीसाठी आता बिनधास्त जा बोटीने; उद्यापासून रेवस-भाऊचा धक्का सेवा सुरू!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 9:02 AM

हवामानाचा अंदाज घेऊन आणि जसजशी प्रवासीसंख्येत वाढ होईल तशी लाँचेसच्या फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्क, उरण : पावसाळी हंगामात गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेली रेवस-भाऊचा धक्का या सागरी जलमार्गावरील बोटसेवा दि. १ सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. तसेच उरण-भाऊचा धक्कादरम्यान वाढविण्यात आलेल्या तिकीटदरात १५ रुपयांची कपात केली आहे. यामुळे गणपतीसाठी काेकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा मिळणार आहे. 

दरवर्षी पावसाळी हंगामात भाऊचा धक्का-उरण या मार्गावरील प्रवासी तिकीटदरात वाढ केली जाते. त्यामुळे दि. २६ मेपासून भाऊचा धक्का-उरण या सागरी मार्गावरील तिकीट दरात ८० रुपयांवरून १०५ अशी १५ रुपयांनी वाढ केली होती. पावसाळी हंगामानंतर १ सप्टेंबरपासून उन्हाळी हंगामासाठी तिकीट दरात १५ रुपये कपात केली आहे. १ सप्टेंबरपासून या मार्गावरील तिकीट दर प्रौढांसाठी ८०, तर लहानांसाठी ३९ रुपये आकारण्यात येणार आहे.

वारंवार बदलणारे वादळी व खराब हवामान, पाऊस, समुद्रातील उंच लाटामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून पावसाळी हंगामासाठी दरवर्षी रेवस-भाऊचा धक्का या सागरी जलमार्गावरील प्रवासी वाहतूक जून ते ऑगस्ट अशी बंद ठेवण्यात येते. ही प्रवासी बोटसेवाही १ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.  

हवामानाचा अंदाज घेऊन आणि जसजशी प्रवासीसंख्येत वाढ होईल तशी लाँचेसच्या फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. - जमीर बामणे, सचिव, मुंबई जलवाहतूक संस्था

टॅग्स :Ganpati Festivalगणेश चतुर्थी २०२४Ganesh Mahotsavगणेशोत्सव