शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी तुटण्याच्या दिशेने?; भास्कर जाधव कडाडले, काँग्रेसला करून दिली आठवण
2
जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला; गांदरबल इथं गोळीबारात ३ मजूर ठार तर ५ जखमी
3
समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन; कपिल पाटील यांचा दिल्लीत पक्षप्रवेश
4
नाशिकमध्ये सीमा हिरेंच्या उमेदवारीला पक्षातच विरोध; महायुतीत बंडखोरीची शक्यता
5
"आमच्यात वाद नव्हताच..."; उमेदवारी न मिळालेल्या भाजपा आमदार अश्विनी जगपात यांचं विधान
6
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
7
पक्षफुटीनंतरही एकनिष्ठ राहिलेल्या आमदाराचा शरद पवारच करणार 'करेक्ट कार्यक्रम'?
8
कुटुंबवादामुळे तरुणांचे नुकसान; 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार, PM मोदींची घोषणा
9
Video - मोबाईलवर बोलत रेल्वे ट्रॅक ओलांडत होता 'तो'; अचानक समोरून आली ट्रेन अन्...
10
कडक सॅल्यूट! पतीचा मृत्यू झाला पण 'तिने' हार नाही मानली; ई-रिक्षा चालवून भरतेय कुटुंबाचं पोट
11
दारुण पराभवानंतर BCCI चा मोठा निर्णय; उर्वरीत मालिकेसाठी स्टार खेळाडूला मिळाली संधी
12
नात्याला काळीमा! नातवाने त्रिशूळाने वार करून केली आजीची हत्या, शिवलिंगावर रक्ताचा अभिषेक
13
मुंबईतल्या 'या' १४ जागांवर भाजपाचे उमेदवार ठरले; ३ विद्यमान आमदार प्रतिक्षेत 
14
ज्योती मेटे यांचा शरद पवार गटात प्रवेश, विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत म्हणाल्या...
15
महिलेशी मैत्री, हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं अन्...; कसा पकडला गेला शार्प शूटर सुक्खा?
16
जास्तीत जास्त मुले जन्माला घाला, अन्यथा..; CM चंद्रबाबू नायडूंचे आवाहन, कारण काय?
17
महाराष्ट्रात हरयाणामध्ये झालेल्या त्या चुका काँग्रेस टाळणार, राहुल गांधी घेताहेत अशी खबरदारी
18
शेलार बंधू विधानसभेच्या रिंगणात; आशिष शेलारांसह त्यांच्या मोठ्या भावालाही भाजपची उमेदवारी
19
दिल्लीतील प्रदूषणाला उत्तर प्रदेश आणि हरयाणा सरकारवर जबाबदार; CM आतिशी यांचा आरोप
20
Ranji Rrophy: रिंकूची चौकार-षटकारांची 'बरसात'; बॅटिंगमध्ये Yuzvendra Chahal ही ठरला 'फर्स्ट क्लास'

आगरदांडा बंदरातील रस्तेवाहतूक रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 10:48 PM

२७०० कोटींचा प्रकल्प : बंदराचे काम पूर्ण; चौपदरीकरणाचे काम धिम्या गतीने; अवजड वाहतुकीला ब्रेक

- संजय करडे 

मुरु ड जंजिरा : श्रीवर्धन तालुक्यातील दिघी व मुरु ड तालुक्यातील आगरदांडा येथे जेएनपीटीच्या धर्तीवर दोन मोठे बंदर विकसित करण्यात येत आहे. केंद्र व राज्य शासन व खासगी विकासकाच्या माध्यमातून सुमारे २७०० कोटी रु पये खर्च करून बंदराचे काम सुरू करण्यात आले आहे. पैकी श्रीवर्धन तालुक्यातील दिघी येथे बंदर विकसित झाले असून, या प्रकल्पाचा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण झाला आहे; परंतु मुरुड तालुक्यातील आगरदांडा येथील दुसऱ्या टप्प्याचे काम केवळ रस्त्याच्या अरुंदीकरणामुळे रखडले आहे.

परदेशातून येणार दगडी कोळसा व अन्य कच्चा माल नियोजित ठिकाणी नेण्यासाठी १२ चाकी ट्रेलरला वाहतुकीत बाधा येत आहे. केवळ वाहतूकसमस्येमुळे आगरदांडा येथील बंदराचा अंतिम टप्पा रखडला असून औद्योगिक प्रगती खुंटली आहे.

गेल्या पाच वर्षांपासून आगरदांडा बंदरातून मालाची वाहतूक होत नसल्याने स्थानिकांना रोजगार मिळू शकला नाही. जमीन खरेदी-विक्रीचे सर्व व्यवहार ठप्प झाल्याने आगरदांडा परिसर मागास राहिला आहे. स्थानिक तरुणांना या कंपनीत नोकºया मिळणार होत्या; परंतु बंदराचा विकासच न झाल्याने शेकडो तरुण रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत.

बंदराच्या विकासापूर्वी या ठिकाणी मोठी रेलचेल दिसून येत होती. स्थानिक विद्यार्थी पोर्टला आवश्यक असणाऱ्या जागांसाठी विविध ट्रेंडचे प्रशिक्षण घेण्यासाठीसुद्धा गेले होते; परंतु आगरदांडा बंदर सुरू न झाल्याने बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे.

आगरदांडा येथील बंदर विकासाचे काम पूर्ण झाले आहे; परंतु बोटीद्वारे माल उतरवला जात नसल्याने कर्मचारी नियुक्त झालेले नाहीत. आगरदांडा-इंदापूर रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, काम रखडल्याने त्याचा परिणाम आगरदांडा बंदरातील मालवाहतुकीवर होत आहे.कंपनी गेटपर्यंत भुयारी मार्गआगरदांडा बंदराचे पूर्ण काम झाले आहे. केवळ रस्ता रुंदीकरणाची कामे रखडल्याने बंदरातून मालवाहतूक होऊ शकत नाही. दिघी येथे जहाजांची रेलचेल सुरू असून या प्रकल्पाचा एक भाग सुरू आहे.आगरदांडा ते इंदापूर हा चौपदरी रस्ता मंजूर करण्यात आलेला असून जून २०१९ पर्यंत हा रस्ता बनवण्याची ठेकेदारांना अंतिम मुदत देण्यात आली आहे.आगरदांडा येथील लोकवस्तीला कोणताही त्रास होऊ नये म्हणून डोंगर फोडून अंतर्गत भुयारी मार्ग थेट कंपनी गेटपर्यंत रस्ता आणणार असल्याची माहिती सूर्यकांत साहू यांनी दिली. त्याबरोबरच रोहा ते आगरदांडा रेल्वेमार्गालाही मंजुरी मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. 

आगरदांडा बंदर लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न आहे. विदेशातून येणारा माल हा १२ ते १६ चाकी ट्रेलरने नियोजित ठिकाणी पोहोचवण्यासाठी रस्त्याची रुं दी खूप मोठी असणे आवश्यक आहे. मुळातच आगरदांडा येथील रस्ते हे खूप निमुळते व अरुं द असल्याने वाहतुकीची समस्या गंभीर आहे.- सूर्यकांत साहू, व्यवस्थापक, ठेकेदार कंपनी

टॅग्स :Raigadरायगड