शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

हे तर टिष्ट्वटरवर चालणारे सरकार

By admin | Published: August 18, 2015 2:57 AM

गेल्या दहा महिन्यांपूर्वी राज्यात सत्तेवर आलेल्या सरकारमध्ये सामान्य जनतेचे प्रश्न समजावून घेण्याबाबत प्रचंड अभाव असून हे ट्विटरवर चालणारे सरकार असल्याची

महाड : गेल्या दहा महिन्यांपूर्वी राज्यात सत्तेवर आलेल्या सरकारमध्ये सामान्य जनतेचे प्रश्न समजावून घेण्याबाबत प्रचंड अभाव असून हे ट्विटरवर चालणारे सरकार असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांनी केले. पक्षाच्या संघटनात्मक कोकण दौऱ्यावर जाताना शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर आज १५ वर्षांनंतर प्रथमच राज्यात आणि केंद्रात विरोधी पक्ष म्हणून पक्षाला सामोरे जावे लागत असले तरी एक प्रबळ विरोधी पक्ष म्हणून जनतेच्या प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघर्ष करणार असल्याचे तटकरे यांनी सांगताना दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पंधराशे रुपये नुकसानभरपाई देण्याची शासनाने केलेली घोषणा म्हणजे बळीराजाची क्रूर चेष्टा असल्याचा आरोप तटकरे यांनी केला. काही महापालिका हद्दीत एलबीटी रद्द करण्याच्या निर्णयाचा फटका ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांना बसणार आहे. याचा कुठलाही विचार राज्य शासनाने केला नाही. त्यामुळे महापालिकेला आपले स्वत:चे आर्थिक स्रोत गमवावे लागले आहे. अशा महापालिकांना निधी कसा उपलब्ध करुन देणार याबाबत राज्य शासनाने निर्णयात स्पष्टता केली नसल्याचे तटकरे यांनी सांगितले. आर्थिक घोटाळाप्रकरणी आज अटक केलेल्या मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. रमेश कदम यांच्यावर पक्ष काय कारवाई करणार, याबाबत विचारणा केली असता कदम यांना पक्ष पाठीशी घालणार नसल्याचे तटकरे यांनी सांगितले. कदम यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. ग्रामीण भागातील प्रश्नांबाबत उपाययोजना करण्याची सरकारमध्ये धमकच नाही, अशी टीकाही तटकरे यांनी केली. (वार्ताहर)