शहरं
Join us  
Trending Stories
1
रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली? शरद पवारांचं इंदापुरात मोठं विधान
2
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड
3
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
4
कोलकाता प्रकरणी मोठा खुलासा! "महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार..." CBI'ने चार्जशीट केले दाखल
5
Kapil Honrao : "मी १० वर्ष थिएटर, साडेतीन वर्ष सीरियल करून..."; सूरज जिंकताच अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष
6
"कुठे आहेत ते... त्यांना बोलवा", काँग्रेस आमदार मंचावरूनच सरकारी अधिकाऱ्यांवर संतापले
7
सांगलीत आजी-माजी खासदार समोरासमोर; भरसभेत जुंपली, तणाव वाढला, नेमकं काय घडलं?
8
ही भविष्यवाणी खरी झाल्यास २०२५ पासून होणार मानवाच्या अंताची सुरुवात, नेमकं काय घडणार
9
संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?
10
Gold Price: सोनं खरेदीच्या विचारात आहात? मग थोडं थांबा, ₹५००० पर्यंत घरण्याची शक्यता, 'या'वेळी येणार करेक्शन
11
पाकिस्तानातील हरवलेले मुख्यमंत्री सापडले! थेट विधासभेत लावली हजेरी, घटनाक्रमही सांगितला
12
अखेर भारत-मालदीवचा वाद मिटला; मुइज्जू यांच्या भेटीनंतर पीएम मोदींचे मोठे वक्तव्य, म्हणाले...
13
बोईंग 737 च्या रडर जॅममुळे DGCA चा ताण वाढला, सर्व विमान कंपन्यांना दिला इशारा
14
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पाहा १४ कॅरेट ते २४ कॅरेटपर्यंत आजची सोन्याची किंमत
15
"इस्लाम पर इल्जाम लगा रही हो, माफी मांगो...!"; पश्तून तरुणीच्या प्रश्नावर झाकीर नाईक भडकला
16
IND vs SA FINAL : पंतचा मास्टरप्लॅन! ३० चेंडूत ३० धावा हव्या असताना केलं 'नाटक', रोहितचा मोठा खुलासा
17
धक्कादायक! ६ वर्षे शिक्षिका शाळेत गेलीच नाही, तरीही मिळत होता महिन्याला पगार, कारण...
18
"वर्ल्ड कपची ट्रॉफी आली लवकरच ती पर्मनंट ट्रॉफी येणार...", कठीण प्रश्नावर 'सूर्या'ची जोरदार 'बॅटिंग'
19
दत्ता भरणेंविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! इंदापुरात जयंत पाटलांनी केली घोषणा
20
BSNL कडून ग्राहकांना मोठा दिलासा; स्पॅम कॉल्स टाळण्यासाठी नवीन फीचर लाँच 

कोणी नदी, कोणी तलाव, कोणी समुद्र किनाऱ्यावर बुडाले; महिन्यात १३ मृत्यू

By निखिल म्हात्रे | Published: June 30, 2024 3:23 PM

जिल्ह्यात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : पावसाळा सुरू झाल्यापासून रायगड जिल्ह्यात गेल्या एका महिन्यात सात अल्पवयीन मुलांसह १३ जणांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये सात पर्यटकांचा समावेश आहे. या घटनांमुळे जिल्ह्यात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

अलिबाग तालुक्यातील मुनवली गावात २३ जून रोजी दोन किशोरवयीन मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाला, तर २२ जून रोजी दादली गावातील २१ वर्षीय तरुणाचा सावित्री नदीत पाय घसरून बुडाल्याने मृत्यू झाला. त्याच दिवशी काल नदीत पोहताना ३२ वर्षीय व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला. खालापूर तालुक्यातील पोखरवाडी धरणात २१ जून रोजी मुंबईतील १७ ते २६ वयोगटातील चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. अलिबाग समुद्रात पोहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत. अशाच एका २७ वर्षांच्या तरुणचा १३ जून रोजी समुद्रात बुडून मृत्यू झाला.

उरण तालुक्यातील पिरकोन गावात ९ जून रोजी हृदयद्रावक घटनेत २५ वर्षीय महिला आणि तिच्या ७ वर्षांच्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही महिला तलावात कपडे धुवत असताना ही घटना घडली होती. या आधी २८ मे रोजी मुंबईतील एका व्यक्तीचा काशीद समुद्रकिनारी समुद्रात बुडून मृत्यू झाला, तर २५ मे रोजी भिरा गावात एका पर्यटकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. पोहण्यासाठी गेलेल्या १३ जणांना गेल्या महिनाभरात जीव गमवावा लागला. अतिउत्साहीपणा न करता पाण्याचा अंदाज घेऊन नागरिकांनी पोहण्यासाठी उतरावे. पर्यटकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.- सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलिस अधीक्षक

पर्यटकांना समुद्राच्या पाण्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे दुर्घटना होत आहेत. समुद्रावर असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे. अनेकांना समुद्राच्या उधाणाचा अंदाज येत नाही. पोहण्यासाठी जाण्याआगोदर त्या स्थळाविषयीची माहिती आवर्जून घ्यावी.- मंदार पावशे, नागरीक

टॅग्स :Raigadरायगड