शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
2
मुंबईत हायअलर्ट! धार्मिक स्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; पोलीस सतर्क, चोख बंदोबस्त
3
काँग्रेसच्या कटकटी थांबेना! जाहीरनाम्याच्या कार्यक्रमाकडे शैलजा-सुरजेवालांची पाठ
4
Tarot Card: देवीच्या आशीर्वादाने नवरात्रीचे चैतन्य अनुभवायला सज्ज व्हा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
5
'या' सरकारी कंपनीला १०० कोटी रुपयांची ऑर्डर; Adani समूहासाठी करणार काम
6
महिलांना दरमहा ₹2 हजार, 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार अन्...; हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा
7
Exclusive: दीड वर्षाच्या मुलासोबत कसं केलं शूट? प्रिया बापटने सांगितली 'रात जवां है'च्या सेटवरची धमाल-मस्ती
8
Sarva Pitru Amavasya 2024 : सर्वपित्री अमावस्येला श्राद्धविधी करायचे, पण सूर्य ग्रहणामुळे टाळा 'ही' वेळ!
9
निर्मला सीतारामन यांच्याविरोधात FIR दाखल करा; न्यायालयाचे आदेश, खंडणी प्रकरण काय?
10
"फायनलपर्यंत कोणती रास जाईल?"; राशीचक्रकार शरद उपाध्येंनी दिलं भन्नाट उत्तर
11
‘वंदे भारत’चा जगात डंका! ३ देशांकडून आग्रही मागणी, ‘या’ वैशिष्ट्यांमुळे ठरते वेगळी
12
मुलानं खरेदी केलं कोट्यवधीचं घड्याळ; मंत्री असलेल्या बापावर आली वाईट वेळ, काय घडलं?
13
"आम्ही योग्य बँकर निवडला नाही..," Paytm च्या फ्लॉप IPO वर शर्मा यांनी सांगितली कुठे झाली चूक
14
ENG vs AUS : ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव हाणून पाडला; इंग्लंडच्या बाजूने निर्णय लागला, इंग्लिस ट्रोल
15
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
16
पितृपक्ष: घरात पुरुष नाही, मग श्राद्ध कुणी करावे? महिलांना आहे का अधिकार? शास्त्र सांगते...
17
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
18
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
19
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
20
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर

नागोठणे रेल्वे स्थानकाला पुन्हा विशेष गाड्यांचा ठेंगा

By admin | Published: August 22, 2015 9:43 PM

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेकडून चार सप्टेंबरपासून पनवेल ते चिपळूण अशी विशेष गाडी चालू करण्यात येत आहे. ही गाडी पनवेलहून सुटल्यानंतर

नागोठणे : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेकडून चार सप्टेंबरपासून पनवेल ते चिपळूण अशी विशेष गाडी चालू करण्यात येत आहे. ही गाडी पनवेलहून सुटल्यानंतर थेट रोहे स्थानकावर थांबणार असल्याने पेण आणि नागोठणे यातून वगळल्याबद्दल प्रवाशांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या संबंधित गाडीला नागोठणेत थांबा मिळण्यासाठी, लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत, अशी मागणी प्रवासीवर्गातून होत आहे. नागोठणे स्थानक मध्य रेल्वेच्या दृष्टीने फार महत्त्वाचे गणले जाते. मालगाडीद्वारे दर महिन्याला लाखो टन मालाची चढ-उतार या स्थानकातून केली जात असल्याने रेल्वे प्रशासनाला त्यातून करोडो रु पयांचे उत्पन्न मिळत असते. या स्थानकातून दररोज पंचवीस ते तीस प्रवासी तसेच जलद गाड्या दिल्ली, गुजरात, राजस्थान, गोवा, कर्नाटक, केरळ राज्यांकडे जात असल्या तरी यातील एकही गाडी स्थानकात थांबत नाही. रोहा-दिवा, दादर-रत्नागिरी, सावंतवाडी - दिवा, दिवा - रोहा, दिवा - सावंतवाडी आणि रत्नागिरी - दादर या आठच प्रवासी गाड्या येथे थांबत असल्याने परराज्यातून आलेल्या प्रवाशांना पनवेल, रोहे किंवा माणगाव या स्थानकात उतरून नागोठणेत यावे लागत असते. दर महिन्याला साधारणत: पंधराशे प्रवाशांना हा द्राविडी प्राणायाम करायची वेळ येत असते.नियमित नोकरीधंदा तसेच शिक्षणासाठी दररोज पनवेल, ठाणे, मुंबईकडे जाणारे पासधारक ही खंत बोलून दाखवत असले, तरी रेल्वेने पनवेल - चिपळूण गाडीला येथे थांबा न देता पुन्हा एकदा नागोठणेकरांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. पाली, खांब, आमडोशी, सांबरी, कोलेटी, रिलायन्स निवासी संकुल आदी भागातील अनेक गावांमधील शेकडो प्रवासी जा - ये करण्यासाठी नागोठणे स्थानकाचाच वापर करीत असतात. ही विशेष गाडी या स्थानकात थांबविली तर शेकडो प्रवाशांना त्याचा लाभ होणार असल्याने प्रवासीवर्गाचे म्हणणे आहे. (वार्ताहर)- १९८६ या मार्गावर वाहतूक चालू झाल्यानंतर एकतीस वर्षे उलटूनही नागोठणेतील प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असले, तरी आम्ही कितीही बोंबा मारूनही रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करते. मात्र, कोणताही स्थानिक नेता आमच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला नसल्याची खंत प्रवासी व्यक्त करतात.