शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे आज असते, तर अजित पवारांना भाजपसोबत घेतलं असतं का?; धनंजय मुंडे म्हणाले...
2
माझी लाडकी बहीण योजना बंद होण्याची चर्चा; अदिती तटकरेंनी केला खुलासा 
3
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी शिवसेनेत, जेलमधून परतताच पक्षप्रवेश
4
IND A vs Pak A : 'हायहोल्टेज' मॅच! युवा टीम इंडियानं दिला पाकिस्तान 'अ' संघाला दणका
5
Maharashtra Election 2024: नितीन गडकरींच्या घरी फडणवीस-बावनकुळेंचे 2 तास खलबते
6
IND vs PAK : कॅचेस विन मॅचेस! Ramandeep Singh च्या अफलातून कॅचनं फिरली मॅच (VIDEO)
7
Navya Haridas: प्रियंका गांधींविरोधात भाजपाचा उमेदवार ठरला! नव्या हरिदास कोण?
8
राजेंद्र शिंगणेंच्या हाती तुतारी; पुतणीने शरद पवारांना विचारला खरमरीत सवाल!
9
‘वंचित’कडून विधानसभेसाठी आणखी १६ उमेदवारांची घोषणा; साताऱ्यातील २ जागांचा समावेश!
10
अखेर रणजीतसिंह मोहिते पाटलांचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा; लवकरच पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
11
ठाकरेंना कोणत्या जागा हव्यात, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गाडा फसलाय?
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोहोळ, पंढरपूर अन् माढ्याचं गणित चुकल्यास पवारांचं राजकारण बिघडणार
13
Jharkhand Election 2024: भाजपाची पहिली यादी आली! झारखंडमधील ६६ उमेदवारांच्या नावाची घोषणा
14
वडील बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची संतप्त पोस्ट; शायरीतून रोख कुणाकडे?
15
भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!
16
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
17
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
18
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...
19
'वादळवाट', 'आभाळमाया' मालिकांचे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "...तर महाराष्ट्रात पडसाद उमटतील", बाबासाहेब देशमुखांनी ठाकरेंची चिंता वाढवली!

वादळाने ७३३ घरे, गोठ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 12:40 AM

पोलादपूर तालुक्यातील तीन विभागांचे पंचनामे बाकी : ३६ लाख ९९ हजार ८२९ रुपयांचे नुकसान

प्रकाश कदम।

पोलादपूर : कोकणात ३ जून रोजी आलेल्या चक्रीवादळाने किनारपट्टीलगतच्या गावांत होत्याचे नव्हते करून टाकले होते, त्याचप्रमाणे या वादळी वाऱ्याचा फटका पोलादपूर तालुक्याला बसल्याने ७३३ घरे व गोठ्यांचे नुकसान झाले असून, ३६ लाख ९९ हजार ८२९ रुपयांची वित्तहानी झाली आहे. यामध्ये तीन सजा निहाय गावाचे पंचनामे होणे बाकी असल्याने बाधितांची संख्या वाढणार आहे.तालुक्यातील १४ सजा निहाय पंचनामे करण्यात येत असून ११ गावचे पंचनामे करण्यात आले आहेत. या पैकी २ गावचे पंचनामे प्रत्यक्षदाखल झाले असल्याची माहितीप्राप्त झाली आहे. या मध्ये सर्वाधिक नुकसान लोहरे विभागात झाले असून ५६ घरे, गोठे याची सुमारे १७ लाख ६६ हजार ३३५ रुपयांचे नुकसान झाले आहे.

या खालोखाल उमरठ तलाठी सजा अंतर्गत ७६ ठिकाणचे पंचनामे करण्यात आले असून जवळपास १६ लाख ३७ हजार पोलादपूर तलाठी सजा निहाय ५३ नुकसान ग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे आले असून १० लाख २ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे.तुर्भे बु तलाठी सजा निहाय १३ घरे /गोठा याचे नुकसान झाले असून २९ हजार ८१९ रुपये ,धारवली ३० ठिकाणे नुकसान ७८ हजार रुपये, चांभारगणी बु तलाठी सजा अंतर्गत ६२ जणांचे सुमारे २ लाख ७५ हजार २२०, देवळे तलाठी सजामधील ५५ जणांचे नुकसान झाले असून सुमारे २ लाख ३६ हजार ३८० रुपये तर सर्वाधिक पडझड कोंढवी व कोतवाल बु गावात झाली असून यामध्ये अनुक्रमे १९२ व ११२ जणांचे नुकसान झाले आहे.या गावातील नुकसानग्रस्तांमध्ये काही घराचे पत्रे व कौले उडाली आहेत. कोंढवीमध्ये ७ लाख ६५ हजार ५२५ तर कोतवालमध्ये ४ लाख ९० हजार ५० रुपयांचे नुकसान झाले आहेत.पंचनामे करण्यात अडचणीच्तालुक्यातील तीन तलाठी सजा पळचिल, देवपूर, वाकन येथील पंचनामे बाकी असल्याने नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तालुक्यातील घरे/गोठे मिळून एकूण ८३८ ठिकाणी नुकसान झाल्याचे तहसील कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.च्संपूर्ण तालुका दुर्गम असल्याने पाच दिवसांनंतरही पंचनामे करण्यात अडचणी येत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच काही गावांतील वीजपुरवठा पाचव्या दिवशी सुरळीत झाल्याने गावातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

टॅग्स :Raigadरायगड