शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
2
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 
3
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...
4
विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा
5
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
6
Badlapur Sexual Assault Case: मोठी बातमी! बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना झटका; कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला
7
रोहित की गंभीर? कानपूर टेस्टमध्ये ट्विस्ट आणण्यात नेमकं कुणाचं डोकं?
8
सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट
9
“भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका
10
"विमानांप्रमाणे आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी’’, भरत गोगावले यांची घोषणा
11
Irani Cup 2024 : मैं हूँ ना! मुंबईचा खडतर प्रवास; पण अजिंक्य रहाणेचा 'संयम', अय्यर-सर्फराजची चांगली साथ
12
'घड्याळ' चिन्हाबाबत आजही सुनावणी झालीच नाही; सुप्रीम कोर्टाने दिली पुढची तारीख
13
“आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मनोज जरांगे असतील”; तिसऱ्या आघाडीतील नेत्याचे मोठे विधान
14
जय पवार की अजित पवार, बारामतीतून कोण लढणार? प्रदेशाध्यक्षांनी गोंधळ संपवला
15
"तुझ्या भावाकडून सुंदर मूल हवंय"; दिरासोबत पळून गेली बायको, नवरा म्हणतो, मला वाचवा कारण...
16
'219 मंदिरांची विटंबना, मूर्तींची तोडफोड', उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा धक्कादायक दावा
17
"लव्ह जिहाद, व्होट जिहाद म्हणून फडणवीस यांनी केला समतेच्या मूल्याचा अपमान, जाहीर माफी मागा’’, काँग्रेसची मागणी 
18
जय शाहांचा वारसदार कोण होणार? BCCI सचिव पदासाठी आशिष शेलारांसह 'ही' ४ नावं चर्चेत
19
धक्कादायक! वाराणसीमधील १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती, समोर आलं असं कारण
20
"तुम्ही लोक एखाद्याला...", पत्रकाराचा 'तो' प्रश्न ऐकताच पाकिस्तानी खेळाडू इफ्तिखार संतापला!

कोकणातील जंगल वणवे रोखण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 3:10 AM

कोकणात सर्वत्र वर्षानुवर्षे डोंगर भागात वणवे लागून मोठ्या प्रमाणात नैसर्गिक वनसंपत्ती व वन्यजीवांची मोठी हानी होत असते. वनविभाग वा अन्य कोणतीही शासन यंत्रणा वणवे थांबविण्याकरिता कोणतीही उपाययोजना करण्यासाठी पुढे येताना दिसत नाही.

जयंत धुळप अलिबाग : कोकणात सर्वत्र वर्षानुवर्षे डोंगर भागात वणवे लागून मोठ्या प्रमाणात नैसर्गिक वनसंपत्ती व वन्यजीवांची मोठी हानी होत असते. वनविभाग वा अन्य कोणतीही शासन यंत्रणा वणवे थांबविण्याकरिता कोणतीही उपाययोजना करण्यासाठी पुढे येताना दिसत नाही. मात्र, भिवघरच्या तरुणांनी याकामी गेल्या २००७ मध्ये पुढाकार घेवून जंगल वणव्यांपासून आपल्या गावाचे आणि नैसर्गिक संपत्तीसह वन्यजीवांचे रक्षण करण्याचे धाडसी काम सुरू केले आणि आज त्यातून मोठे यश प्राप्त झाले आहे.महाड तालुक्यात अत्यंत दुर्गम डोंगर भागात वसलेले भिवघर हे जेमतेम तीन हजार लोकसंख्येचे गाव. सारेच शेतकरी. डोंगराच्या कुशीत विसावलेल्या या गावाच्या शेजारील डोंगरावर २०१२ मध्ये एक मोठा जंगल वणवा लागला आणि पाहतापाहता तो खाली गावात येवून पोहोचला. त्यात जंगलाशेजारी राहणाऱ्या आदिवासींच्या १० ते १२ झोपड्या त्यातील संसारासह जळून भस्मसात झाल्या. त्या आदिवासी कुटुंबांचे संसार उघड्यावर आले. याच दुर्दैवी घटनेअंती ग्रामस्थ आणि काही तरुणांनी यापुढे वणवा लागूच द्यायचा नाही आणि लागलाच तर पुन्हा आपल्या गावापर्यंत पोहचू द्यायचा नाही असा पक्का निर्धार केला आणि त्या कामाला सुरुवात केल्याचे वणवा आणि वृक्षतोड प्रतिबंध उपक्रम अमलात आणलेल्या भिवघर वनप्रेमी संघटनेचे प्रमुख किशोर पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.जंगलातील जाळ रेषा व पाण्याच्या टाक्यांतूनवणवे नियंत्रण मिळवण्यात यशवणवा आणि वृक्षतोड प्रतिबंध उपक्रमाचे स्वरूप सांगताना पवार म्हणाले, उन्हाळ्याच्या दिवसात गावापासून जवळच असलेल्या डोंगरावर ४ ते ५ किलोमीटरची पायपीट करून तरुण मंडळी जातात. जाताना डोक्यावर पाण्याचे ड्रम घेवून जातात. तेथे संभाव्य वणव्याच्या जाळरेषा आखल्या जातात. जाळरेषा म्हणजे, वणवा लागलाच तर इतरत्र पसरू नये यासाठी डोंगरमाथ्यावरील वाढलेले गवत एका ठरावीक अंतरावर कापले जाते. तेथे पडलेला सुका पालापाचोळा उचलला जातो. त्यामुळे वणवा पेटलाच तर पुढे पसरत नाही. शिवाय तेथे छोट्या पाण्याच्या साठवण टाक्या बांधल्या आहेत त्यात सोबत नेलेल्या ड्रममधील पाणी साठवून ठेवले जाते. चुकून कधी वणवा लागलाच तर तो विझवण्यासाठी त्या पाण्याचा वापर करता येतो.उन्हाळ्याच्या पाणीटंचाईच्या दिवसात वरच्या जंगल भागात वावरणाºया वन्यजीवांची तहान या साठवण टाक्या भागवतात आणि ते वन्यप्राणी गावांत येत नाहीत. तरुणांच्या या अभिनव उपक्रमामुळे वणवे रोखले जावून वनसंपदा टिकून राहिली आहे. या भागातील लोक जंगलातून आंबे(कैरी) आणून विक्रीचा व्यवसाय करतात. वणवे रोखल्यामुळे जंगलभागात पिकणारा रानमेवाही वाचला आहे. त्यातून स्थानिकांना चांगला रोजगारही उपलब्ध झाला आहे. गेल्या बारा वर्षातील सातत्यपूर्ण प्रयत्नांती दिसेनासे झालेले प्राणी-पक्षी जंगलात पुन्हा वास्तव्यास आले आहेत.वनविभाग वा शासकीय यंत्रणेस मात्रकल्पना नाहीसद्यस्थितीत भिवघरचा संपूर्ण परिसर हिरवळीने नटलेला दिसतो. मोर, ससे, भेकर यासारखे प्राणी, असंख्य पक्षी पुन्हा या परिसरात दिसू लागले आहेत. संपूर्ण परिसर रान, वृक्ष, वेलींनी भारून गेला आहे. विहिरी, तलावांची पाण्याची पातळी वाढली, आदिवासी बांधवांना रोजगार मिळू लागला. ही निसर्गाची कृपा असली तरी खरी किमया या तरुणांच्या वणवा विरोधी अभियानाचीच आहे, याची दखल मात्र अद्याप वनविभाग वा कोणत्याही शासकीय यंत्रणेने घेतलेली नाही.नैसर्गिक जलपातळीत वाढ, पाणी टँकर बंदवणवे आणि वृक्षतोड थांबल्याने जमिनीतील नैसर्गिक जलपातळी वृद्धिंगत होवून, गावातील विहिरींच्या जलपातळीत वाढ झाली आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत विहिरींना पाणी असते. परिणामी उन्हाळी पाणीटंचाई अंतर्गत गावाला टँकरने पाणीपुरवठा करावा लागत नसल्याचे भिवघर वनप्रेमी संघटनेचे श्याम गायकवाड यांनी सांगितले.गेल्या पाच वर्षांत जंगलात वणवा नाहीकिशोर पवार आणि श्याम गायकवाड या जिद्दी तरुणांच्या सोबतीने गावातील तरुण व आदिवासी यांची वनप्रेमी संघटना उभी राहिली आणि वणव्याशी झुंज सुरू झाली. रात्री ९ ते १२ या वेळेस जंगलात जावून जाळ रेषा मारून वणवा पसरण्याची प्रक्रिया त्यांनी खंडित केली. आता वणवा पूर्णपणे थांबला आहे. मध्येच कधी वणवा लागला तर गावांतील आदिवासी व तरुण तत्काळ जंगलात धावत जावून त्यावर नियंत्रण मिळवितात. गेल्या पाच वर्षांपासून जंगल वणव्यापासून दूर ठेवून या तरुणांनी एक आगळा आदर्शच निर्माण केला.