शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
3
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
4
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
5
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
6
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
7
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
8
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
9
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
10
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
11
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
12
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
13
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
14
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
15
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
16
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
17
रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला मोठा धक्का? मार्केट कॅप २००९ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पातळीवर
18
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
19
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
20
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या

कोकणातील हजारांवर गावे दरडीच्या सावटाखाली ! आणखी ‘इर्शाळवाडी’ होऊ नये

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 11:42 IST

त्वरेने कार्यवाही होण्याची गरज

अलिबाग : निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्याबरोबरच  सह्याद्रीतील डोंगररांगांचा मोठा वारसा लाभलेल्या कोकणपट्ट्यात त्या पर्वतरांगेच्या पायथ्यांशी लाखो नागरिक निवारा घेत आहेत. या विभागातील २० टक्क्याहून अधिक  म्हणजे तब्बल १,०५० गावे   दरडप्रवण क्षेत्रात आहेत. गेल्या बुधवारी खालापुरातील इर्शाळवावडीत घडलेली दुर्घटना लक्षात घेता, ही गावेही दरडीच्या सावटाखाली असल्याने  ‘दुसरी इर्शाळवाडी’ घडण्यापूर्वी संबंधित गावातील रहिवाशांचे तातडीने स्थलांतर करणे गरजेचे आहे. अन्यथा आणखी मोठ्या संभाव्य जीवितहानीचा धोका असल्याचे मत व्यक्त होत आहे. 

राज्य सरकारने केवळ घोषणा व आश्वासनापुरते काम न करता संबंधित भागातील ग्रामस्थांच्या समस्यांचा पूर्ण विचार करून सुरक्षित ठिकाणी त्यांच्या पुनर्वसनाचा कार्यक्रम  राबविला  पाहिजे, अन्यथा दरवर्षी अशा दुर्घटनांना सामोरे जावे लागू शकेल, अशी भीती संबंधितांतून व्यक्त होत आहे. 

महाराष्ट्रात दरवर्षी  सर्वाधिक म्हणजे सरासरी ३ हजार मि. मी. पाऊस  कोकणात  पडतो.  त्यामुळे साहजिकच या विभागाला मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो. त्यातही प्रामुख्याने मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात कमी कालावधीत जास्त पाऊस  होतो आणि भरतीची वेळ त्याच कालावधीत असल्यास जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होत असते.  त्यामुळे डोंगराळ भागात राहात असलेल्या नागरिकांना दरडीचा धोका कायम सतावत राहिला  आहे. 

आपत्ती व्यवस्थापनावर भर देण्याची गरज

कोकण विभागात गेल्या ५ वर्षात सरासरी २,२०० ते २,८०० मि. मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   विभागात एकूण ७ जिल्हे असून, ५० तालुके आणि ६ हजार ३५३ गावे आहेत.   नैसर्गिक आपत्तीमध्ये उष्णकटिबंधीय चक्रीवादळ, पूर, दुष्काळ, वणवा, चक्रीवादळ, उष्णतेच्या लाटांना सामोरे जावे लागत आहे. त्याला प्रतिबंध करण्यासाठी पर्यावरणीय समतोल साधण्याबरोबरच आपत्ती व्यवस्थापन, निवारण  व जनजागृती प्राधान्याने व  मोठ्या प्रमाणात करण्याची गरज आहे. 

कोकण विभागात १,०५० दरडग्रस्त गावे 

कोकण विभागात एकूण ६ हजार ३५३ लहान - मोठी गावे आहेत. शासनानेच केलेल्या सर्वेक्षणात त्यापैकी तब्बल १,०५० दरडग्रस्त गावे आहेत. त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील १०३ गावांचा समावेश आहे. यात मुसळधार पाऊस किंवा वादळी वारा झाल्यास याठिकाणी दरडी कोसळण्याची भीती व्यक्त केली आहे. या ठिकाणी अनेक नागरिक राहात आहेत. एकाचवेळी त्यांचे पुनर्वसन शक्य नसले तरी त्याबाबत धोक्याच्या श्रेणीनुसार त्याबाबत कालबद्ध निश्चित कार्यक्रम राबविण्याची गरज आहे.