शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

शेलू येथे उल्हास नदीमध्ये दोघे बुडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 00:06 IST

शेलू गावातील केबिके नगरमध्ये राहणारे रहिवासी उल्हास नदीमध्ये पोहण्यासाठी गेले असता त्यातील दोघांचा बुडून मृत्यू झाला.

नेरळ : शेलू गावातील केबिके नगरमध्ये राहणारे रहिवासी उल्हास नदीमध्ये पोहण्यासाठी गेले असता त्यातील दोघांचा बुडून मृत्यू झाला. उल्हास नदीमध्ये पोहण्यासाठी गेल्यानंतर बुडण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मंगळवार २८मे रोजी नेरळजवळील शेलू गावाच्या मागे असलेल्या उल्हास नदीमध्ये सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास पोहायला गेलेल्या तांबे कुटुंबातील आयुष हा १४ वर्षांचा मुलगा पाण्यात उडी मारल्यानंतर तळाशी गेला. त्याला शोधण्यासाठी तेथे असलेले शंकर काळे (४५)यांनी पाण्यात उडी मारून आयुष तांबे याला शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शंकर काळे हे देखील पाण्यातून बाहेर येत नाही हे बघून आयुषचे वडील सूर्यकांत तांबे यांनी देखील उल्हास नदीच्या त्या डोहात उडी घेतली. मात्र सूर्यकांत तांबे देखील पाण्याबाहेर येत नसल्याचे बघून तेथे असलेल्या महिलांनी आपल्याकडे कपडे धुण्यासाठी आणलेल्या साड्या पाण्यात सोडल्या त्याला पकडून सूर्यकांत तांबे हे सुखरूप बाहेर आले. मात्र आयुष तांबे आणि शंकर काळे यांचा बुडून मृत्यू झाला. सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास घटना घडल्यानंतर अर्ध्या तासात पोहचलेले पोलीस पाटील मनोज पाटील यांनी विश्वास मसणे, पुंडलिक मुकणे, दिनेश कालेकर, योगेश कालेकर यांच्या मदतीने तासाभरात आयुष आणि शंकर काळे यांचे मृतदेह बाहेर काढले. आयुष तांबेचा मृतदेह १० फूट खोल पाण्यातून बाहेर काढला असून घटनास्थळी नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शेडगे तसेच पोलीस कर्मचारी वैशाली परदेशी आणि अशोक पाटील हे हजर होते. त्याचवेळी महसूल विभागाचे मंडळ अधिकारी माणिक सानप हे देखील घटनास्थळी पोहचले होते. त्यानंतर उल्हास नदी परिसरात २००-३०० फुटांचा परिसर शोधल्यानंतर तब्बल सहा तासानंतर शंकर काळे यांचा मृतदेह शोधण्यात यश मिळाले आहे.