शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाकडून मनधरणी? रात्री २ वाजता खलबते; राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट
2
"बाहेरच्या पक्षातून आमच्याकडे आलेल्यांना..."; चाकणकरांनी रुपाली पाटील ठोंबरेंना सुनावलं
3
न्यायमूर्ती संजीव खन्ना होणार देशाचे ५१ वे सरन्यायाधीश?; इलेक्टोरल बॉण्ड्सपासून VVPAT पर्यंत घेतलेत महत्त्वाचे निर्णय
4
जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्तीसोबत हातमिळवणी? मुकेश अंबानी आता वाटणार कर्ज; पाहा संपूर्ण प्लॅन
5
माजी केंद्रीय मंत्र्याच्या मुलीची साडेतीन कोटींची फसवणूक, व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल
6
हाहाकार! आंध्र प्रदेशात पावसाचे थैमान; कंबरभर पाण्यातून निघाली अंत्ययात्रा
7
Diwali 2024: दिवाळीसाठी उरले अवघे काही दिवस; यंदा साजरा करणार आहोत दीपोत्सव 'सप्ताह'!
8
Baba Siddique : रेकी, यूट्यूबवरुन ट्रेनिंग, फिल्मी स्टाईलने पळण्याचं प्लॅनिंग; बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी नवा खुलासा
9
तूळ संक्रांती: ७ राशींवर सूर्य कृपा, ५ राशींनी राहावे अखंड सावध; ‘हे’ उपाय उपयुक्त! पाहा
10
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचा थेट लॉरेन्स बिश्नोईला मेसेज, म्हणते- "मला तुझ्याशी झूम कॉलवर बोलायचं आहे..."
11
Valmiki Jayanti 2024: रामायण रचेते महर्षि वाल्मिकी यांची आज जयंती; जाणून घ्या त्यांची पार्श्वभूमी!
12
कोट्यवधींचं घबाड! ज्युनिअर ऑडिटर निघाला धनकुबेर; नोटा मोजण्यासाठी मागवल्या मशीन
13
हिटमॅन Rohit Sharma चा फ्लॉप शो; तो 'क्लीन बोल्ड' झाल्यावर कोचची 'गंभीर' रिअ‍ॅक्शन व्हायरल
14
Vasundhara Oswal Arrest :कोण आहे अब्जाधीशाची मुलगी वसुंधरा, जिला युगांडात झालीये अटक, काय प्रकरण, कुटुंबाची संपत्ती किती?
15
हॉटेलच्या बाल्कनीमधून कोसळून अवघ्या ३१ वर्षीय गायकाचा दुर्दैवी मृत्यू, संगीतप्रेमींवर शोककळा
16
IND vs NZ 1st Test : टीम इंडियाच्या Playing XI मध्ये एन्ट्री झाली, पण Sarfaraz Khan च्या पदरी पडला भोपळा
17
"आम्ही हे खपवून घेणार नाही!" सलमाननंतर गायिका नेहा कक्करला मिळाली धमकी! नेमकं काय घडलं?
18
"या देशात असा विचार..."; न्यायदेवतेच्या नव्या मूर्तीविषयी शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
19
पाकिस्तानच्या जमिनीवरूनच भारताने सुनावले खडेबोल; दहशतवाद, फुटीरतावाद ठरतोय अडथळा : जयशंकर
20
गुडन्यूज! ३९व्या वर्षी गरोदर आहे राधिका आपटे, रेड कार्पेटवर फ्लॉन्ट केला बेबी बंप

कोकणात ‘बारसू’वरून रणकंदन!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2023 5:22 AM

उद्धव ठाकरेंकडून समर्थकांचा समाचार, राज ठाकरे यांनी टोचले कोकणवासीयांचे कान

महाड (रायगड) :  ऐतिहासिक महाड क्रांतिभूमीत शनिवारी झालेल्या सभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्ष सोडून गेलेल्यांचा समाचार घेत देशाला दिशा देणारा महाराष्ट्र वाचवला पाहिजे. देशाला हुकूमशाही विचारातून वाचवले पाहिजे. यासाठी भाजपला तडीपार करा, असे आवाहन केले. कोकण उद्ध्वस्त होत असेल तर बारसूसारखा प्रयोग होऊ देणार नाही, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

“बजरंग दल ही देशभक्तांची संघटना, बंदी घालून काँग्रेसचा मतं मिळवण्याचा प्रयत्न”

चांदे क्रीडांगणावर झालेल्या सभेत व्यासपीठावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते सुभाष देसाई, खासदार चंद्रकांत खैरे, खासदार अरविंद सावंत आदी उपस्थित होते.  उद्धव यांनी गद्दारांचे डिपॉझिट जप्त केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा निर्धार बोलून दाखवत आधी कोकणच्या माणसांची चाचणी करा, मग मातीची चाचणी करा. ऐकले नाही तर बारसूमध्ये महाराष्ट्र उतरवू, असा इशारा त्यांनी दिला.

फटाके थांबता थांबेनात

भाषण सुरू झाले आणि लावलेले फटाके थांबता थांबेनात. अखेर ठाकरे यांनी भाषण थांबवून ‘अरे, जरा पाणी ओता’ असे म्हणत ‘आधी विजय, मगच फटाके वाजवू’, असे सांगितले. शिवसैनिक पेटले की ऐकत नाहीत. मैदानात वाजणारे फटाके उद्या त्यांच्या बुडाखाली वाजतील, असा टोला हाणला.

महाडचे माजी आमदार दिवंगत माणिकराव जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप, पुत्र श्रेयस जगताप आणि बंधू हनुमंत जगताप यांच्यासह महाड तालुक्यातील शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.

तुमच्या जमिनींचा होतोय व्यापार, जागे राहा...

तुमचे लोकप्रतिनिधी व्यापारी आहेत. कोकणात कोणत्या भागात प्रकल्प येणार आहे, हे त्यांना माहिती असते. ते कवडीमोलाने तुमच्या जमिनी घेतात आणि हजारपट दराने विकतात. तुम्हाला कळतच नाही का? अशा कोणालाही जमिनी विकू नका, जागे राहा, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोकणवासीयांचे कान टोचले.

शनिवारी रत्नागिरीतील जाहीर सभेत राज यांनी कोकण विकासाच्या मुद्द्यावरून सध्याच्या आणि आधीच्या सरकारवर ताशेरे ओढले. याआधी एन्रॉन, अणुऊर्जा यांसारखे प्रकल्प येण्याआधीच कोकणी लोकांनी व्यापाऱ्यांना आपल्या जागा विकल्या. आता नाणार, बारसूबाबतही तेच होत आहे. जमिनी पायांखालून जात आहेत, तरीही कोकणी माणसाला कळत कसे नाही, असा प्रश्न करून ते म्हणाले, की नाणारमध्ये होणारा प्रकल्प अचानक बारसूत कसा गेला? कुठून आले हे नाव? असे प्रश्न त्यांनी केले.

पक्ष नसलेल्या पक्षाचे अध्यक्ष कोण

पक्ष नसलेल्या पक्षाचे अध्यक्ष आज येऊन गेले, असा टोला उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता राज यांनी लगावला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाला मी विरोध करत असल्याचे शरद पवार यांनी पसरवले. मात्र या पवार यांनी आजपर्यंत एकदाही आपल्या भाषणात शिवछत्रपतींचे नाव घेतलेले नाही. आपला विरोध शिवछत्रपतींच्या स्मारकाला असूच शकत नाही, असेही राज म्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेShiv Senaशिवसेना