शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे आज असते, तर अजित पवारांना भाजपसोबत घेतलं असतं का?; धनंजय मुंडे म्हणाले...
2
माझी लाडकी बहीण योजना बंद होण्याची चर्चा; अदिती तटकरेंनी केला खुलासा 
3
Bhagyashree Navtake IPS: १२०० कोटींचा घोटाळा, सीबीआयचा गुन्हा; कोण आहेत भाग्यश्री नवटके?
4
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी शिवसेनेत, जेलमधून परतताच पक्षप्रवेश
5
IND A vs Pak A : 'हायहोल्टेज' मॅच! युवा टीम इंडियानं दिला पाकिस्तान 'अ' संघाला दणका
6
Maharashtra Election 2024: नितीन गडकरींच्या घरी फडणवीस-बावनकुळेंचे 2 तास खलबते
7
IND vs PAK : कॅचेस विन मॅचेस! Ramandeep Singh च्या अफलातून कॅचनं फिरली मॅच (VIDEO)
8
Noel Tata: नोएल टाटांची पत्नी कोण? त्यांना कोणत्या गोष्टींची आहे आवड?
9
Navya Haridas: प्रियंका गांधींविरोधात भाजपाचा उमेदवार ठरला! नव्या हरिदास कोण?
10
राजेंद्र शिंगणेंच्या हाती तुतारी; पुतणीने शरद पवारांना विचारला खरमरीत सवाल!
11
‘वंचित’कडून विधानसभेसाठी आणखी १६ उमेदवारांची घोषणा; साताऱ्यातील २ जागांचा समावेश!
12
अखेर रणजीतसिंह मोहिते पाटलांचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा; लवकरच पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
13
ठाकरेंना कोणत्या जागा हव्यात, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गाडा फसलाय?
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोहोळ, पंढरपूर अन् माढ्याचं गणित चुकल्यास पवारांचं राजकारण बिघडणार
15
Jharkhand Election 2024: भाजपाची पहिली यादी आली! झारखंडमधील ६६ उमेदवारांच्या नावाची घोषणा
16
वडील बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची संतप्त पोस्ट; शायरीतून रोख कुणाकडे?
17
भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!
18
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
19
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
20
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...

आंबोली धरणातील पाणी सोेडण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 2:20 AM

दहा किमीतील गावांना फायदा : पाणीटंचाई कमी करण्यासाठी उपाययोजनांची गरज

मुरुड जंजिरा : तालुक्यातील आंबोली ग्रामपंचायत हद्दीत सुमारे २० कोटी रुपये खर्च करून धरण बांधण्यात आले. आंबोली धरणात मोठा पाणीसाठा असूनही धरणाच्या आजूबाजूला दहा कि.मी. परिसरात असणाऱ्या गावांना तीव्र पाणीटंचाई जाणवते.

धरणातून कालवे काढण्याची मागणी आमदार पंडित पाटील यांनी अनेकदा शासनाकडे केली आहे. मात्र, निधी उपलब्ध न झाल्याने कालव्यांची कामे रखडली आहेत. पाणीटंचाई दूर करायची असले तर अस्तित्वात असलेल्या कालव्यातून पाणी सोडणे आवश्यक आहे. हे पाणी सोडल्यास ते जमिनीत मुरेल आणि विहिरी व व कूपनलिकांद्वारे नागरिकांना उपलब्ध होईल. त्यामुळे आंबोली धरणातील कालव्यांची कामे व अस्तित्वात असलेल्या कालव्यांमधून पाणी सोडण्याची मागणी शेकापचे तालुका चिटणीस व नगरसेवक मनोज भगत यांनी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आंबोली येथील धरणातील कालव्यांची कामे रखडली आहेत. तसेच मुबलक पाणी असूनसुद्धा पाणी न सोडल्यामुळे या धरणातील आजूबाजूच्या गावात मोठ्या भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

आंबोली धरण हे हेटवणे लघु पाटबंधारे विभाग रायगड याच्या अंतर्गत येते; परंतु या विभागाचे धरणाकडे दुर्लक्ष झाले असून या ठिकाणी अधिकारी वर्ग फिरकतच नाही, त्यामुळे लोकहिताचे निर्णयही घेता आलेले नाहीत. मुबलक पाणीसाठा असताना पाणी न सोडल्याने येथील विहिरी व कूपनलिका कोरड्या पडल्या असून, ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. चरणातील पाणी कालव्याद्वारे सोडल्यास, पाणी आंबोली ते तेलवडे व माझेरी, खोकरी भागापर्यंत उपलब्ध होण्यास मदत होईल. यासाठी लवकरच मुरु ड तहसीलदार यांची भेट घेणार असून धरणाचे पाणी सोडण्याची मागणी करणार असल्याचे नगरसेवक मनोज भगत यांनी सांगितले.

टॅग्स :RaigadरायगडWaterपाणी