शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

जलसंपत्ती भक्कम करणे आवश्यक

By admin | Published: January 16, 2016 12:28 AM

देशामधील सर्वात जास्त ४० टक्के धरणं महाराष्ट्रात आहेत. पण आज महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे. धरणामध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. कोकणची जलसंपत्ती त्यामानाने

पेण : देशामधील सर्वात जास्त ४० टक्के धरणं महाराष्ट्रात आहेत. पण आज महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे. धरणामध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. कोकणची जलसंपत्ती त्यामानाने चांगली आहे. ही अधिक भक्कम करण्यासाठी पडणाऱ्या पावसाचा थेंबन्थेंब अडवून तो जमिनीत जिरवायचा असेल तर त्यासाठी गावकऱ्यांनी, युवा-युवतींनी, विद्यार्थ्यांनी या कामांसाठी स्वत:हून तयार व्हायला पाहिजे, असे प्रतिपादन विश्व जलशांती यात्रा अंतर्गत कोकण परिक्रमेचे मुख जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी पेण येथील कार्यक्रमप्रसंगी केले.कोकणात उपजत आढळणारी जैवविविधता, दरवर्षी ३०७० मिमीपेक्षा जास्त पडणारा पाऊस, डोंगरदऱ्यांच्या विस्तीर्ण रांगा, लालबुंद माती, ७२० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून, निसगाने कोकणावर कृपादृष्टी केली असतानाही कोकणात मागासलेपणा कायम आहे. चांगला पाऊस पडूनसुद्धा वाया जाणाऱ्या पावसाचे पाणी अडविण्यावर आजपर्यंत भर दिला नाही, असे राजेंद्र सिंह म्हणाले. जंगल, जमीन, प्राणी हे तीन नैसर्गिक घटकांचे महत्त्व मानवी जीवनासाठी आवश्यक आहे. भौतिक श्रीमंतीच्या मागे धावाल तर अपणच आपले अहित करतो याचे भान ठेवा. नैसर्गिक घटकांचे संरक्षण करण्याची शपथ घ्या, यातूनच कोकणची प्राकृतिक संपदा बहरेल व त्या अनुषंगाने जगातले अनेक देशोदेशींचे पर्यटक कोकणला, येथील नैसर्गिक वनसंपदेला भेटी देतील. त्यातूनच गावातच तुम्हाला आर्थिक समृद्धीचा भक्कम स्रोत उपलब्ध होईल, असे वक्तव्य डॉ. राणा यांनी केले.कोकण जलपरिक्रमेंतर्गत जलचेतना मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन पेणच्या भाऊसाहेब नेने महाविद्यालयातर्फे करण्यात आले होते. यावेळी डॉ. राजेंद्रसिंह राणा यांचे व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. राजेंद्रसिंह यांनी राजस्थान व कोकण यांच्यामधील प्राकृतिक परिभाषा उलगडून फरक स्पष्ट क रताना कोकणातील प्राकृतिक संपदा अनुकूल असूनसुद्धा गावे ओस पडली, लोक शहराकडे गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. नव्या पिढीने शेतीचे ज्ञान घेतले नाही, त्यामुळे चंगळवादात वाढला आहे.यावेळी कोकण परिक्रमेचे प्रमुख संजय यादव, हिरवळ प्रतिष्ठानचे किशोर धारिया, बापूसाहेब नेने, डॉ. गोडबोले आदी उपस्थित होते.