शहरं
Join us  
Trending Stories
1
गणपती निघाले गावाला... मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, पालघरला विसर्जनासाठी सर्व यंत्रणा सज्ज
2
निसर्गोपचाराला हिरवा कंदील, राज्यात सुरू होणार पहिले नॅचरोपॅथी कॉलेज, आजरा येथे ६० बेडच्या हॉस्पिटललाही मंजुरी
3
‘राजपुत्र’ विधानसभेत नशीब अजमावणार? विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली
4
अवघड गणित होणार सोपे! शिक्षण विभाग शाळांमध्ये राबविणार गणित सात्मीकरण प्रणाली
5
राहुल गांधींवर वादग्रस्त वक्तव्य भोवलं, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल
6
भाजपचे ८५ जागांवर विशेष लक्ष, जागांची आता ए,बी,सी कॅटेगरी; विधानसभेसाठी पक्षाची रणनीती
7
रसायनशास्त्राच्या शिक्षणाचा वापर एमडी ड्रग्ज बनविण्यासाठी; बदलापुरात केमिस्ट्रीतील उच्चशिक्षिताचा कारखाना उद्ध्वस्त
8
‘कुनो’मध्ये परदेशी पाहुण्यांची होतेय हेळसांड; सिंहांच्या पुनर्वसनासाठी कोणतेच प्रयत्न झाले नाहीत
9
पृथ्वीलाही होते शनीसारखे कडे! छुप्या खड्ड्यांनी उलगडले रहस्य
10
"राहुल गांधींचे शिक्षक..."; भगवंत मान यांचं काँग्रेस नेत्याच्या शिक्षणावर भाष्य करत मोठं विधान
11
"तर कायदेशीर कारवाई करेन", सलमान खानची इन्स्टाग्रामवर ऑफिशियल पोस्ट, प्रकरण काय?
12
VIDEO: वंदे भारताला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी बाचाबाची, भाजप आमदार ट्रेनसमोर पडल्या
13
Chirag Paswan : "मी कोणालाच घाबरत नाही..."; पंतप्रधान मोदींसोबतच्या नात्याबद्दल चिराग पासवान यांचा खुलासा
14
माझी प्रचंड खिल्ली उडवली गेली, पण मी गप्प राहिलो; कारण..., पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले
15
'फक्त 5 तासांचा कार्यक्रम, 10 दिवस काय केले?' BJP नेत्याची राहुल गांधींच्या US दौऱ्यावर टीका
16
Shikhar Dhawan Video: गब्बर इज बॅक!! निवृत्तीनंतर पुन्हा एकदा शिखर धवनच्या हाती बॅट, केली तुफान फटकेबाजी
17
CM शिंदे दक्ष, नाराजांवर लक्ष! विधानसभेआधी तीन नेत्यांचे राजकीय पुनर्वसन
18
"बासरीने काम चालणार नाही, सुदर्शन चक्र..."; असं का म्हणाले योगी आदित्यनाथ? कुणाचं नाव घेतलं?
19
Rohit Sharma Virat Kohli, IND vs BAN 1st Test: विराटचा केवळ २ गोलंदाजांसह सराव, रोहितचा तर वेगळाच प्लॅन! दिग्गजांच्या डोक्यात नक्की काय?
20
मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, लोकसभेत तिकीट कापलेल्या हेमंत पाटलांना मंत्रिपदाचा दर्जा

हा कोणत्या सरकारचा मूर्खपणा, महामार्गावर पेव्हर ब्लॉक; राज ठाकरे यांचा हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 6:21 AM

जगात कुठेही गेला तरी रस्ते काँक्रिटचेच असतात असे सांगत किती पैसे खायचे यालाही मर्यादा असतात, असा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोलाड येथील सभेत रविवारी केला.  

रोहा : गेली पंधरा वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गामुळे संताप व्यक्त होत असताना मनसेने रविवारपासून कोकण जागर यात्रेचा प्रारंभ केला. हा कोणत्या सरकारचा मूर्खपणा हे माहीत नाही. या महामार्गावर पेव्हर ब्लॉक टाकले आहेत. जगात कुठेही गेला तरी रस्ते काँक्रिटचेच असतात असे सांगत किती पैसे खायचे यालाही मर्यादा असतात, असा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोलाड येथील सभेत रविवारी केला.  

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह पत्नी शर्मिला ठाकरे व मुलगा अमित ठाकरे हे यात्रेत सहभागी झाले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पदयात्रा हा आंदोलनाचा सभ्य मार्ग असल्याचे सांगत, सरकारला जाग आणण्यासाठी हे आंदोलन करीत आहोत. रस्त्यावर पडलेला खड्डा भरता येतो, पण गेलेलं माणसाचं आयुष्य परत मिळत नाही, अशी भावनिक साद घालत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडपट्टीवर ते म्हणाले, जी माणसे तुम्हाला लुटत आली त्यांच्या हातात तुम्ही सत्ता देत आहात. तुम्ही जागृत राहा. 

कोकणी बांधवांना गेली अनेक वर्षे खड्डे सहन करावे लागतात. याचा तुम्हाला राग कसा येत नाही, असे आवाहनही त्यांनी केले. आंदोलन करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिस स्टेशनमध्ये अंडरवेअरवर बसवलं. सरकार कोणतंही असो, आजचं असो किंवा कालचं.  सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही आलेले नसते, असा इशाराही त्यांनी दिला.

मुंबई-पुणे रस्ता देशाला दिशादर्शक१९९५ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई-पुणे रस्ता दोन तासांत पार करता येईल, असा रस्ता तयार करा, असे आवाहन केले होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने मुंबई-पुणे रस्ता बनवला. तो देशाला दिशादर्शक रस्ता झाला आहे. या रस्त्यानंतरच चांगले रस्ते होऊ लागल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

तुम्ही भूमिहीन ते कोट्यधीशमुंबई-गोवा महामार्ग वेळेत व नीट न करण्याचे कारण म्हणजे अत्यंत कमी किमतीत कोकणी बांधवांच्या जमिनी विकत घेत आहेत. ज्यावेळी हा रस्ता होईल, त्यावेळी १०० पट किमतीन तुमच्या जमिनी व्यापाऱ्यांना हे लोक विकणार. त्यामुळे कोणीही जमिनी विकू नका, असे आवाहन त्यांनी केले. आपल्याकडे कुंपनच शेत खात असल्याचे सांगत आपलेच लोक आपल्या लोकांकडून कमी किमतीने जमिनी घेऊन जास्त किमतीने व्यापाऱ्यांना विकत असल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरे