शहरं
Join us  
Trending Stories
1
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
2
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
3
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
4
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
5
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
6
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
7
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
8
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
9
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
10
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
11
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
12
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
13
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
14
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
15
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
16
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
17
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
18
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
19
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
20
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात

श्रमदानातून तरुणांनी काढला बंधाऱ्यातील गाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 12:22 AM

नेरळ गावातील तरुण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी एकत्र झाले आणि त्यांनी १५ वर्षांपासून माती आणि दगडात पूर्ण भरून गेलेल्या बंधा-यातील गाळ काढण्यासाठी श्रमदान केले.

नेरळ : नेरळ गावातील तरुण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी एकत्र झाले आणि त्यांनी १५ वर्षांपासून माती आणि दगडात पूर्ण भरून गेलेल्या बंधा-यातील गाळ काढण्यासाठी श्रमदान केले. त्यामुळे त्या बंधाºयाने मोकळा श्वास घेतला असून या पावसाळ्यात कोमलवाडीमधील पाणीटंचाई काही प्रमाणात दूर होण्यास मदत होणार आहे.नेरळ गावातील मानव अधिकार संस्थेचे कार्यकर्ते आणि तरुण यांनी नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील कोमलवाडीमध्ये निर्माण होणारी पाणीटंचाई दूर करण्यासाठी काय करावे अशी माहिती कोमलवाडीमधील आदिवासी ग्रामस्थांना विचारून घेतली. स्थानिक कार्यकर्ते सुनील कांबडी यांनी वाडीच्या मागे असलेल्या ओहोळातील बंधारा दगड, माती आणि गाळाने भरला असल्याची माहिती दिली. त्यानुसार मानव अधिकार संस्थेचे कार्यकर्ते असलेले प्रमोद डबरे, विकास कराळे, दिनकर बदे, रोहित गोरे, जगदीश साळुंके, सोनू शेख, कमलेश कराडकर, जयेश कदम,रवींद्र खांबल आणि रवींद्र मिसाळ यांनी स्थानिक आदिवासींना सोबत घेऊन २५ मे रोजी श्रमदान सुरू केले. प्रमोद डबरे यांनी श्रीफळ वाढवून श्रमदानास सुरुवात केली,त्यावेळी स्थानिक आदिवासी देखील या तरुणांच्या मदतीला आले. दिवसभर श्रमदान करून काढण्यात आलेली माती आणि दगड स्थानिक कार्यकर्ते यांनी तेथे आणून माती आणि दगड डम्परमधून टाकून नेले. त्यामुळे १५ वर्षांपूर्वी पावसाळ्यात माती आणि दगडात गाडला गेलेला सिमेंट बंधारा पुन्हा मोकळा झाला. बंधाºयातून किमान २० डम्पर माती बाहेर काढण्यात तरुणांना आणि आदिवासी यांना यश आले.>दरवर्षी भासते पाणीटंचाईमाथेरान डोंगरात २००५ मध्ये भूस्खलन झाले होते. यात मोठ्या प्रमाणात दगड आणि माती खाली येऊन अनेक नाले आणि बंधारे मातीने भरून गेले होते.त्यामुळे दरवर्षी या भागात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे दरवर्षी पाणी वरच्या वर वाहून जाणाºया त्या सिमेंट बंधाºयात यावर्षी पाण्याचा साठा होणार आहे.त्यामुळे त्या सिमेंट बंधाºयाच्या खाली असलेल्या कोमलवाडी ग्रामस्थांच्या विहिरीत पाणीसाठा अधिक प्रमाणात होणार आहे. त्याचवेळी ग्रामस्थांची पाण्याची टंचाई काही प्रमाणात कमी होणार आहे. त्याबद्दल कोमलवाडी ग्रामस्थ सुनील कांबडी यांनी मानव अधिकार मंडळाचे आभार मानले.