शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
4
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
5
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
6
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
7
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
8
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
9
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
10
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
12
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
13
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
14
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
15
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
16
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
17
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
19
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
20
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार

‘झाप’ व्यवसायावर मंदीचे सावट

By admin | Published: March 29, 2017 5:10 AM

रायगड जिल्ह्यातील मुरुड आणि अलिबाग तालुक्यातील परिसर हा निसर्गरम्य नारळी-पोफळीच्या बागांनी

बोर्ली-मांडला/मुरुड : रायगड जिल्ह्यातील मुरुड आणि अलिबाग तालुक्यातील परिसर हा निसर्गरम्य नारळी-पोफळीच्या बागांनी नटलेला आहे. वाऱ्यावर डोलणाऱ्या नारळी-पोफळीच्या बागा हे या ठिकाणचे वैशिष्ट्य होय. मात्र वृक्षाच्या झावळीपासून झाप तयार करण्याच्या व्यवसायावर प्लॅस्टिकच्या ताडपत्रीमुळे मंदी आली आहे. प्लॅस्टिकचा सर्वत्र वाढलेला वापर प्रमुख कारण आहे.प्लॅस्टिकच्या पिशव्यांमुळे पर्यावरणाला असलेला धोका लक्षात घेऊन विविध शहरात प्लास्टिक हटाव मोहीम हाती घेण्यात आली आहे. कारण या प्लॅस्टिकचा पर्यावरणावर परिणाम होऊन मानवी जीवनाला हानिकारक आहे. त्याचा फटका ग्रामीण भागातील नारळाच्या झाडापासून झाप विणणाऱ्या कारागिरांना बसला आहे. मुख्य करून झापाचा उपयोग उपाहारगृहे, रस गुऱ्हाळे हे व्यावसायिक करीत असत. याशिवाय शुभकार्याच्या वेळी मंडपासाठी देखील याचा उपयोग होत असे. पेंढ्याच्या राशी, पावसाळ्यातील वापरण्यात येणारा जळाऊ लाकूडफाटा आणि थेट रेवस मांडवापासून मुरु ड जंजिरापर्यंतच्या समुद्रकिनाऱ्यावर ठेवण्यात येणाऱ्या नौका झाकण्यासाठी झापांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असे. तसेच सुपारी सुकविण्यासाठी या झापाचा वापर असे. त्या ठिकाणी प्लॅस्टिक आणि ताडपत्र्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. त्यामुळे झापांचा खप कमी झाला आहे. त्यामुळे कारागीर रोजगारापासून वंचित झाले. (वार्ताहर)वृक्षाच्या झावळीपासून झाप तयार करण्याच्या व्यवसायावर  मंदी आली आहे. प्लॅस्टिकच्या ताडपत्रीच्या वापराचा फटका ग्रामीण भागातील नारळाच्या झाडापासून झाप विणणाऱ्या कारागिरांना बसत आहे.सुपारी सुकविण्यासाठी या झापाचा वापर असे. त्या ठिकाणी ताडपत्र्यांचा वापर होऊ लागला आहे. एक झाप बनविले की आम्हाला पाच रु पये मिळायचे, आम्ही दिवसाला चाळीस ते पन्नास झाप बनवत असू. मालक मात्र एका झापाची विक्र ी ही वीस ते पंचवीसप्रमाणे करीत असे. आता मात्र एका झापाची किंमत ही तीस ते पस्तीस एवढी आहे. मात्र झापाचा वापर आज काही ठरावीकच लोक करीत आहे. - रामचंद्र आगरी, कारागीर