शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
4
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
5
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
6
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
7
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
8
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
9
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
10
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
11
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
12
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
13
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
14
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
15
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
16
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
17
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
18
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
19
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
20
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?

शिवराज चौहान, रमन सिंह यांच्यानंतर आता वसुंधरा राजेंची बारी; राजस्थानात CM कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 08:05 IST

भाजपाला बहुमत मिळाल्यानंतर ८ दिवस झाले तरी मुख्यमंत्रिपदावर निर्णय झाला नाही. आजच्या भाजपा विधिमंडळ बैठकीत यावर निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. 

नवी दिल्ली - मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तीन राज्यात ३ डिसेंबरच्या निकालात भाजपाची सत्ता आली. त्यानंतर राज्यात मुख्यमंत्री कोण होणार याचीच चर्चा सुरू झाली. छत्तीसगड आणि मध्य प्रदेश इथं भाजपा नेतृत्वानं दिग्गज नेत्यांना धक्के देत नवे नेतृत्व पुढे आणले. जी नावे चर्चेत होती त्यातील कुणालाही संधी न देता भाजपाने नवीन चेहऱ्यांना मुख्यमंत्री म्हणून घोषित केले. भाजपा नेतृत्वाच्या या निर्णयानं अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. 

छत्तीसगडमध्ये भाजपानं आदिवासी नेत्याला मुख्यमंत्री बनवले तर मध्य प्रदेशात तिसऱ्यांदा निवडून आलेल्या आमदाराच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घातलीय. आता राजस्थानमध्ये भाजपा असाच काही निर्णय घेणार का हे पाहावे लागेल. विधिमंडळ भाजपा आमदारांची आज महत्त्वपूर्ण बैठक होईल यात मुख्यमंत्रिपदाची घोषणा होऊ शकते. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात भाजपानं आश्चर्यचकीत करणारी नावे आणली तसेच राजस्थानात घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

२०१३-१८ या काळात भाजपा नेत्या वसुंधरा राजे या मुख्यमंत्रिपदाच्या चेहरा होत्या. त्यामुळे भाजपात त्यांचे पारडे जड मानले जात होते. परंतु ज्यारितीने पक्षाने छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात बदल केले तसेच काही चित्र राजस्थानात दिसू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ३ डिसेंबरला आलेल्या निकालात भाजपानं ११५ जागांवर विजय मिळवत राज्यात बहुमताचा आकडा गाठला तर काँग्रेसला केवळ ६९ जागांवर विजय मिळाल्याने त्यांच्या हातून राजस्थानची सत्ता गेली. भाजपाला बहुमत मिळाल्यानंतर ८ दिवस झाले तरी मुख्यमंत्रिपदावर निर्णय झाला नाही. आजच्या भाजपा विधिमंडळ बैठकीत यावर निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. 

वसुंधरा राजेंचे CM पदासाठी लॉबिंगराजस्थानात निवडणूक निकाल लागल्यापासून वसुंधरा राजेंनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. अनेक आमदार वसुंधरा राजेंच्या भेटीला गेले. सोमवारीही काही आमदारांनी वसुंधरा राजेंची भेट घेतली. छत्तीसगडमध्ये आदिवासी, मध्य प्रदेशात ओबीसी आणि राजस्थानात सामान्य प्रवर्गातून मुख्यमंत्री बनवले जाईल असं बोलले जाते. तर रविवारी वसुंधरा राजेंनी भाजपा अध्यक्ष जे.पी नड्डा यांच्याशी फोनवरून संवाद साधला. किमान १ वर्षासाठी मुख्यमंत्रिपद मिळावे अशी मागणी वसुंधरा राजेंनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर नड्डा यांनी वसुंधरा राजेंना आमदारांशी संवाद न साधण्याचा सल्ला दिला आहे. राजस्थानात वसुंधरा राजेंसोबतच बालकनाथ योगी, गजेंद्र सिंह शेखावत, दीया कुमारी, अश्विनी वैष्णव यांची नावे मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत आहेत.  

टॅग्स :ElectionनिवडणूकRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकBJPभाजपा