शहरं
Join us  
Trending Stories
1
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
2
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
3
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका सरमर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
5
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
6
हरयाणात भाजपची सत्ता जाते आहे, कारण..
7
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
8
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
9
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
10
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
11
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
12
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक
13
माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन
14
नाेकऱ्या अन् पगारवाढही! पण, उत्पादन क्षेत्रातील वाढ नीचांकावर
15
मराठीला अभिजात दर्जासाठी अवघ्या 26 आमदारांनीच दाखविला रस
16
मानवरहित सौर ऊर्जा बोटीद्वारे कचरा संकलन; समुद्र होणार चकाचक
17
आहारामुळे विद्यार्थ्यांची आबाळ; शिक्षणमंत्री मध्यरात्री आले; झोपलेल्या मुलांना उठवून गेले
18
माणूस असो वा प्राणी, सत्तासंघर्ष अटळ, तो घडतच राहणार..
19
‘एमएमआरडीएचे अधिकारी संवेदनशील का नाहीत?’ आयुक्तांनी उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे
20
देहविक्रयासाठी थायलंडच्या मुलीचा पाच हजारांत सौदा; ठाण्यात चौघांना अटक

केंद्रात सत्तेत आल्यास जातनिहाय जनगणना - गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 8:14 AM

राजस्थानातील सभेत राहुल गांधी यांचा शब्द

बुंदी/दौसा : देशात जातनिहाय जनगणना न केल्याबद्दल केंद्रातील सरकारवर टीका करताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी येथे सभेत लोकांना शब्द दिला की, केंद्रात काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यास जातनिहाय जनगणना केली जाईल. बुंदी येथील सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, गरीब, शेतकरी आणि मजूर ही भारत माता आहे. जातनिहाय जनगणनेबद्दल ते म्हणाले की, केंद्रातील सरकार जातनिहाय जनगणना करू शकत नाही. हे काम काँग्रेसच करू शकते.

राजस्थानमध्ये भाजपची सत्ता आल्यास गेहलोत सरकारने सुरू केलेल्या सर्व लोककल्याणकारी योजना बंद केल्या जातील. राहुल गांधी म्हणाले की, कन्याकुमारी ते काश्मीर या भारत जोडो यात्रेदरम्यान आपण हजारो तरुणांशी संवाद साधला. या तरुणांनी त्यांना आयएएस अधिकारी व्हायचे असल्याचे सांगितले. ९० आयएएस अधिकाऱ्यांसह देश चालविला जात असून, त्यापैकी केवळ तीनच ओबीसी अधिकारी असल्याचा दावा राहुल यांनी केला. त्यामुळे जात जनगणना ही देशाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची आहे  आणि आम्ही ती करू, असे राहुल म्हणाले.

शेतकरी, मजुरांचे सरकार बनवा

आदिवासींबद्दल बोलताना राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेस त्यांना आदिवासी म्हणते; पण केंद्र सरकारमधील सत्ताधारी त्यांना वनवासी म्हणतात.

राजस्थानमध्ये गरीब, शेतकरी, मजूर आणि छोटे व्यापारी यांचे सरकार बनवा. मी तुम्हाला हमी देतो की, केंद्रात सत्तेत आल्यास जातनिहाय गणना केली जाईल.

इंग्रजी माध्यमातील शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना राहुल गांधी म्हणाले की, राजस्थान सरकारने राज्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळा उघडल्या आहेत. जेणेकरून गरीब, शेतकरी आणि मजुरांच्या मुलांना त्यात शिक्षण घेता येईल. गरिबांच्या मुलांना इंग्रजी माध्यमात शिक्षण मिळावे, असे भाजपला वाटत नाही. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीRajasthanराजस्थानElectionनिवडणूक