शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

काँग्रेसला 60 वर्षांत अशी एकही आदिवासी व्यक्ती मिळाली नाही, जी देशाची राष्ट्रपती बनू शकेल; PM मोदींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2024 21:28 IST

"भारतीय जनता पक्ष (भाजप) गरीबांच्या कल्याणासाठी समर्पित आहे आणि पूर्ण प्रामाणिकपणे काम करतो. मात्र, काँग्रेसच्या दुकानात भय, भूक आणि भ्रष्टाचारच विकला जातो, असेही मोदी म्हणाले."

आदीवासी कल्ल्यानाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान मोदी म्हणाले, काँग्रेस पक्षाला आपल्या 60 वर्षांच्या शासन काळात आदिवासी समाजातून येणारी अशी एकही व्यक्ती मिळाली नाही, जी देशाची राष्ट्रपती बनू शकेल. एवढेच नाही, तर भारतीय जनता पक्ष (भाजप) गरीबांच्या कल्याणासाठी समर्पित आहे आणि पूर्ण प्रामाणिकपणे काम करतो. मात्र, काँग्रेसच्या दुकानात भय, भूक आणि भ्रष्टाचारच विकला जातो, असेही मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी आज बांसवाडा येथे भाजप उमेदवार महेंद्रजीत मालवीय यांच्या समर्थनार्थ एका प्रचार सभेला संबोधित करत होते. ते म्हणाले, ”आदिवासी समाजात क्षमता नव्हती का? जरा काँग्रेसच्या मानसिकतेचा विचार करा. 2014 मध्य आपण या सेवकाला आर्शीवाद दिला. आज या देशाची प्रथम नागरिक, देशाची राष्ट्रपती, आदिवासी समाजातील एक मुलगी आहे. हीच खरी भागीदारी आहे.”

मोदी म्हणाले, तत्कालीन अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळात पहिल्यांदाच आदिवासी समाजासाठी एक स्वतंत्र मंत्रालय तयार करण्यात आले. स्वतंत्र बजेट तयार केले होते. कोट्यवधी आदिवासी मुलं अणि मुलींपैकी काँग्रेसला 60 वर्षांत असं कुणीही मिळालं नाही जे देशाचा राष्ट्रपती बनू शकेल?”

“आज भारतात स्थिर आणि मजबूत सरकार असणे अत्यंत आवश्यक आहे. एक असे सरकार, जे सीमांचे संरक्षण करू शकेल आणि गरज पडल्यास, पाताळातूनही शत्रू शोधून त्याचा नाश करू शकेल. एवढेच नाही तर, देशाला एका अशा सरकारची आवश्यकता आहे, जे महिला, शेतकरी, गरीब, वंचित, आदिवासी आणि मागास, अशा सर्वच घटकांना सन्मान आणि समृद्धीकडे घेऊन जाईल, असेही मोदी म्हणाले." 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा