शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
3
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
4
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
5
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
6
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
7
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
8
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
9
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
10
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
11
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
12
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
13
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
14
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
15
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
16
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
17
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
18
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
19
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
20
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
Daily Top 2Weekly Top 5

PM Modi Rajasthan Visit: नकारात्कम विचाराच्या लोकांना देशाचा विकास नकोय; राजस्थानमधून पीएम मोदींचा काँग्रेसवर प्रहार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 14:41 IST

PM Modi Rajasthan Visit: नकारात्मकतेने भरलेले लोक राजकीय स्वार्थापलीकडे विचार करू शकत नाहीत.

राजसमंद: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज(बुधवारी) राजस्थानच्या एक दिवसीय दौऱ्यावर असून त्यांनी यावेळी नाथद्वारातील श्रीनाथजी मंदिरात दर्शन घेतले. यानंतर पीएम मोदी दामोदर स्टेडियमवर पोहोचले आणि 5500 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक प्रकल्पांची पायाभरणी केली. राजस्थान हे भारताच्या शौर्याचे, वारशाचे आणि संस्कृतीचे वाहक आहे आणि राजस्थानचा जितका विकास होईल तितका भारताच्या विकासाला गती येईल, असे मोदी यावेळी म्हणाले. 

केंद्र सरकार राज्यात रस्ते, रेल्वे, कनेक्टिव्हिटी आणि डिजिटल सुविधांचा समावेश असलेल्या आधुनिक पायाभूत सुविधांवर भर देत असल्याचे ते म्हणाले. राज्यांच्या विकासातून देशाच्या विकासाच्या मंत्रावर आमच्या सरकारचा विश्वास असल्याचे मोदींनी आपल्या भाषणात सांगितले. पंतप्रधान म्हणून मोदी पहिल्यांदाच श्रीनाथजी मंदिरात पोहोचले होते. आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचे मानले जात आहे.

राज्यांच्या विकासातून देशाच्या विकासावर विश्वास ठेवणाऱ्या आमच्या सरकारला राजस्थानच्या विकासामुळे देशाच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात व्यक्त केला. ते म्हणाले की, लोकांचे जीवन सुसह्य करणे हे आमच्या सरकारचे प्राधान्य आहे. केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देताना ते म्हणाले की, आज देशात अभूतपूर्व गुंतवणूक होत आहे, सर्व कामे अभूतपूर्व गतीने होत आहेत आणि आमचे सरकार रेल्वे, महामार्ग, विमानतळ अशा प्रत्येक क्षेत्रात जलद गतीने काम करत आहे.

'नकारात्मक विचारा असलेल्यांना विकास नकोय'यावेळी काँग्रेसवर निशाणा साधत पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपल्या देशातील काही लोक इतके नकारात्मकतेने भरलेले आहेत की, त्यांना देशात काहीही चांगले घडलेले आवडत नाही. शाश्वत विकासासाठी मूलभूत व्यवस्थेसोबत आधुनिकतेचा समावेश करणे आवश्यक आहे. जे लोक प्रत्येक गोष्ट मतांच्या तराजूने तोलतात, ते देशाचे भविष्य लक्षात घेऊन कल्याणकारी योजना करू शकत नाहीत. या नकारात्मक विचारसरणीमुळे पायाभूत सुविधांच्या उभारणीला प्राधान्य दिले गेले नाही. 

पंतप्रधान पुढे म्हणाले की, जर आपल्या देशात वैद्यकीय महाविद्यालये आधीच सुरू झाली असती तर डॉक्टरांची कमतरता भासली नसती, रेल्वे मार्गांचे आधीच विद्युतीकरण झाले असते तर आज हजारो कोटी रुपये खर्च करावे लागले नसते, जर आधी पाणी आले असते, तर आज जल जीवन मिशन सुरू करण्याची गरज नाही. नकारात्मकतेने भरलेले लोक राजकीय स्वार्थापलीकडे विचार करू शकत नाहीत, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRajasthanराजस्थानBJPभाजपाcongressकाँग्रेस