शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! नागपूर जिल्ह्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; पती-पत्नीसह दोन मुलांनी घेतला गळफास
2
कधीकाळी जिगरी दोस्त होते इराण-इस्रायल; जानी दुश्मन कसे बनले? सद्दामच्या इराकवर केलेला हल्ला
3
१९७१ आम्ही विसरलो नाही, आधी माफी मागा; बांगलादेशने पाकिस्तानला करून दिली आठवण
4
ख्रिस गेलचा PM मोदींना 'नमस्कार'! भारतीयांना ती शैली भावली; 'युनिव्हर्सल बॉस'ची लक्षवेधी पोस्ट 
5
Sarva Pitru Amavasya 2024: 'या' ठिकाणी करता येते जिवंतपणी श्राद्ध; मात्र हा तोडगा कोणासाठी? वाचा!
6
"रोहित पवार, रोहित पाटील, टोपेंसह ५० उमेदवारांना पाडणार", लक्ष्मण हाकेंची यादी तयार!
7
अजित पवारांनी तटकरे, पटेलांसह घेतली अमित शाहांची भेट, कोणत्या मुद्द्यावर चर्चा?
8
Raj Thackeray : "कितीही बेताल वक्तव्य केली तरी..."; गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी वाचाळवीरांना फटकारलं
9
कमाल! WhatsApp ची मोठी घोषणा, Video कॉलचा आनंद द्विगुणित; बदलणार चॅटिंगचा एक्सपीरियन्स
10
T20 WC 2024 : भारताचा विजयरथ! न्यूझीलंड, आफ्रिकेविरुद्ध 'भारी' सराव; गुरुवारपासून स्पर्धेचा थरार
11
फक्त 6 तास अ्न मोसाद इराणचे 100000 हून अधिक सीक्रेट न्यूक्लिअर डॉक्यूमेन्ट घेऊन 'भूर्र'; माजी राष्ट्रपतींचा दावा
12
गोविंदा गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी व्यक्त केला संशय
13
मुलगी झाली हो..! खुशबू तावडे आणि संग्राम साळवी दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
14
गुरु-शनी गोचर: ८ राशींचा सुवर्णकाळ, धनलक्ष्मी भरभरुन देईल; नवदुर्गा कृपा करेल, दसरा शुभ होईल!
15
इराण-इस्रायल या दोन्ही दैशांपैकी भारताचा सर्वात जवळचा मित्र कोण?; जाणून घ्या
16
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय तरी काय? आता Babar Azam चा कर्णधारपदाचा राजीनामा!
17
गोविंदाला कधी मिळणार डिस्चार्ज? अभिनेत्याच्या तब्येतीविषयी पत्नी सुनिता आहुजा यांनी दिली माहिती
18
"शिवसेनेमुळे माझा पराभव झाला", समरजित सिंह घाटगेंचं मोठं विधान
19
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
20
Irani Cup 2024 : अजिंक्य रहाणेचे शतक थोडक्यात हुकले! पण सर्फराजने गड गाठलाच; ऋतुराजचा संघ अडचणीत

“भाजपवाले घाबरलेत, जनतेला पुन्हा काँग्रेसचेच सरकार हवेय”; अशोक गेहलोत यांना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 2:03 PM

CM Ashok Gehlot: भाजपकडे सांगण्यासारखे काही राहिलेले नाही. म्हणूनच ते असे खोटे आरोप करत आहेत, अशी टीका अशोक गेहलोत यांनी केली.

CM Ashok Gehlot: राजस्थानात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेस सरकार कायम राहण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. तर भाजप काँग्रेसला चितपट करण्यासाठी ताकद पणाला लावताना दिसत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. यातच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजपवर टीका केली असून, राजस्थानमधील जनतेला पुन्हा एकदा काँग्रेसचे सरकार हवे आहे. काँग्रेसचा विजय होणार आहे, असा विश्वास व्यक्त केला आहे. 

जयपूर येथे बोलताना अशोक गेहलोत म्हणाले की, स्थानिक प्रश्न आणि विकासावर निवडणूक लढवत आहोत. भाजप आमच्या धोरणांवर बोलत नाही. ते केवळ खोटे आरोप करत आहेत. मला वाटते की, भाजपवाले घाबरलेत. जनतेला पुन्हा हेच सरकार निवडून द्यायचे आहे. जनता याच सरकारची पुनरावृत्ती करण्याच्या मनस्थितीत आहे. आम्ही हमीभाव, विकास, सुशासन आणि शेतकऱ्यांसाठी केलेले क्रांतिकारी कायदे या मुद्द्यांवर निवडणूक लढवत आहोत. मात्र, यावर भाजपकडे उत्तर नाही. भाजपकडे सांगण्यासारखे काही राहिलेले नाही. म्हणूनच ते असे खोटे आरोप करत आहेत, या शब्दांत अशोक गेहलोत यांनी हल्लाबोल केला.

गेल्या ३० वर्षांत गांधी घराण्यातील कोणीही पंतप्रधान झाला नाही 

गेल्या ३० वर्षांत गांधी घराण्यातील कोणीही पंतप्रधान झाला नाही. हे कुटुंब ३० वर्षांपासून कोणत्याही पदाशिवाय आहे, ते फक्त काँग्रेस पक्ष सांभाळत आहेत, असे असताना त्यांच्या पोटात का दुखत आहे? गांधी कुटुंबाला टार्गेट का करता? त्यांनी आम्हाला टार्गेट करावे, आम्ही येथे काम करतो. ते गांधी परिवाला का घाबरतात? याचाच अर्थ असा की, गांधी कुटुंबाची विश्वासार्हता देशात सर्वाधिक आहे, असे अशोक गेहलोत यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकांत काँग्रेस पाचपैकी चार राज्यांत विजयी होण्याची शक्यता आहे, असा दावा सचिन पायलट यांनी केला आहे. २०२४ साली लोकसभा निवडणुकांत देशात वारे कोणत्या दिशेने वारे वाहत आहेत याचे दर्शन विधानसभा निवडणूक निकालांतून होणार आहे, असेही सचिन पायलट म्हणाले.

 

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकAshok Gahlotअशोक गहलोत